शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

जल, भूमी संधारण अभियान २०१९-२० पर्यंत राबविणार

By admin | Updated: June 21, 2015 00:26 IST

ग्रामीण भागातील जल, भूमी व इतर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये स्थायी स्वरुपात सुधारणा करण्यासाठी महात्मा फुले...

पाणी, मातीचे संवर्धन : लोकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभागअमरावती : ग्रामीण भागातील जल, भूमी व इतर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये स्थायी स्वरुपात सुधारणा करण्यासाठी महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान राज्यात १ मे २००२ पासून राबविण्यात येते. या अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याने जलयुक्त शिवार अभियान सुरू असतानाही हे अभियान २०१९-२० पर्यंत राबविण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. राज्यातील पर्जन्याधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे. पाणी व मातीचे संवर्धन करणे, रोजगार उपलब्धतेत वाढ करणे आणि पर्यायाने कृषी उत्पादनात वाढ करून मौल्यवान भूसंपत्तीमध्ये स्थायी स्वरुपाची सुधारणा करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. सन २०१४-१५ हे अभियान राबविण्यास शासनाने मान्यता दिली होती; तथापि जलयुक्त शिवार अभियान हे ५ वर्षे राबविण्यात येणार असल्याने व या अभियानात महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा समावेश असल्यामुळे या अभियानास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. परंतु अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता २०१९-२० पर्यंत हे अभियान राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)स्रोत संवर्धनासाठी करता येणारी कामेया अभियानांतर्गत पाण्याचे स्रोत संवर्धनासाठी पारंपरिक नाला बंडीग, ग्रबियन बंधारे, विहीर पुनर्भरण, वनराई बंधारे, मागील २५ वर्षांत विविध योजनेत निर्माण गावतलाव, पारंपरिक शिवकालीन व ब्रिटिशकालीन तलावांतील गाळ काढणे, सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे, विहिरींचे खोलीकरण करणे आदी कामे करता येतात. काढलेला गाळ शेतकऱ्यांना नि:शुल्कया अभियानांतर्गत तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. हा गाळ सुपीक व कसदार असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तसेच उत्पादन वाढविण्यासाठी मागणी केलेल्या शेतकऱ्यांना स्व:खर्चाने शेतात मोफत नेण्याची मुभा आहे.