शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जल, भूमी संधारण अभियान २०१९-२० पर्यंत राबविणार

By admin | Updated: June 21, 2015 00:26 IST

ग्रामीण भागातील जल, भूमी व इतर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये स्थायी स्वरुपात सुधारणा करण्यासाठी महात्मा फुले...

पाणी, मातीचे संवर्धन : लोकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभागअमरावती : ग्रामीण भागातील जल, भूमी व इतर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये स्थायी स्वरुपात सुधारणा करण्यासाठी महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान राज्यात १ मे २००२ पासून राबविण्यात येते. या अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याने जलयुक्त शिवार अभियान सुरू असतानाही हे अभियान २०१९-२० पर्यंत राबविण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. राज्यातील पर्जन्याधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे. पाणी व मातीचे संवर्धन करणे, रोजगार उपलब्धतेत वाढ करणे आणि पर्यायाने कृषी उत्पादनात वाढ करून मौल्यवान भूसंपत्तीमध्ये स्थायी स्वरुपाची सुधारणा करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. सन २०१४-१५ हे अभियान राबविण्यास शासनाने मान्यता दिली होती; तथापि जलयुक्त शिवार अभियान हे ५ वर्षे राबविण्यात येणार असल्याने व या अभियानात महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा समावेश असल्यामुळे या अभियानास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. परंतु अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता २०१९-२० पर्यंत हे अभियान राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)स्रोत संवर्धनासाठी करता येणारी कामेया अभियानांतर्गत पाण्याचे स्रोत संवर्धनासाठी पारंपरिक नाला बंडीग, ग्रबियन बंधारे, विहीर पुनर्भरण, वनराई बंधारे, मागील २५ वर्षांत विविध योजनेत निर्माण गावतलाव, पारंपरिक शिवकालीन व ब्रिटिशकालीन तलावांतील गाळ काढणे, सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे, विहिरींचे खोलीकरण करणे आदी कामे करता येतात. काढलेला गाळ शेतकऱ्यांना नि:शुल्कया अभियानांतर्गत तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. हा गाळ सुपीक व कसदार असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तसेच उत्पादन वाढविण्यासाठी मागणी केलेल्या शेतकऱ्यांना स्व:खर्चाने शेतात मोफत नेण्याची मुभा आहे.