शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात जलसंकट, पाच वर्षांत प्रथमच प्रकल्प साठ्यात घट; 484 प्रकल्पात सरासरी 34 टक्केच साठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 15:44 IST

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जानेवारीतच प्रकल्प पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ४८४ प्रकल्पांमध्ये सध्या ३४ टक्केच साठा आहे. यामध्ये १० टक्के मृत साठा गृहीत धरता, आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.

गजानन मोहोड

अमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विभागात जानेवारीतच प्रकल्प पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ४८४ प्रकल्पांमध्ये सध्या ३४ टक्केच साठा आहे. यामध्ये १० टक्के मृत साठा गृहीत धरता, आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. ४५२ लघू प्रकल्पांमध्ये २४ टक्केच साठा असल्याने भीषण स्थिती ओढावणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत यंदा जानेवारीतच सर्वात कमी साठ्याची नोंद झाली आहे.

विभागात नऊ मुख्य प्रकल्प आहेत. यामध्ये सध्या ६०३.४५ दलघमी पाणीसाठा आहे. ही टक्केवारी ३९ आहे. यामध्ये अमरावतीच्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ६९ टक्के, तर अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ८९ टक्के साठा आहे. पूस १९.७७, अरुणावती १३.०७, बेंबळा १६.५९, काटेपूर्णा १३.८६, नळगंगा २९.१४ व पेनटाकळी प्रकल्पात २५.७१ टक्के साठा आहे. या सर्व  मुख्य प्रकल्पांमध्ये जानेवारी २०१७ मध्ये ५७२.२६ दलघमी, २०१६ मध्ये ७६८.०९ दलघमी, सन २०१५ मध्ये १०१७.६६ दलघमी, तर २०१४ मध्ये ७६४.७४ दलघमी साठा होता. त्या तुलनेत यंदा ६०३.४५ दलघमी साठा उपलब्ध आहे.

विभागात २३ मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत २५२.०६ दलघमी म्हणजेच ३८.३२ टक्के साठा आहे. अमरावती जिल्ह्यातील शहानूर ६० टक्के, चंद्रभागा ६१, पूर्णा ७४, सपन ७०, यवतमाळ जिल्ह्यात अधरपूस ५१, सायखेडा ६८, गोकी ११, वाघाडी १२, बोरगाव ११, नवरगाव ३७, अकोला जिल्ह्यात निगुर्णा ५८, मोर्णा १४, उमा ३, अडाण २१, सोनल ०.४१, एकबुर्जी २३, वाशिम जिल्ह्यात ज्ञानगंगा ४७, पलढग ७२,मस १४, कोराडी १४, मन १६, तोरणा २२, तर उतावळी प्रकल्पात २९ टक्के साठा आहे. या सर्व प्रकल्पांत २०१७ मध्ये ३१३, सन २०१६ मध्ये ३८७, सन २०१५ मध्ये ५१८ तर २०१४ मध्ये ४१० दलघमी साठ्याची नोंद आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जानेवारीतच सर्वात कमी साठा असल्याने आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.

५० टँकरने पाणीपुरवठा-विभागातील आठ तालुक्यांतील ६१ गावांमध्ये १३ शासकीय व ३७ खासगी अशा एकूण ५० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात ४१, यवतमाळ जिल्ह्यात ७ व बुलडाणा जिल्ह्यात २ टँकर लागले आहेत. यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी आॅक्टोबरमध्येच दोन मीटरपेक्षा अधिक खोल गेली. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात बसणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती