शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात जलसंकट, पाच वर्षांत प्रथमच प्रकल्प साठ्यात घट; 484 प्रकल्पात सरासरी 34 टक्केच साठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 15:44 IST

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जानेवारीतच प्रकल्प पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ४८४ प्रकल्पांमध्ये सध्या ३४ टक्केच साठा आहे. यामध्ये १० टक्के मृत साठा गृहीत धरता, आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.

गजानन मोहोड

अमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विभागात जानेवारीतच प्रकल्प पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ४८४ प्रकल्पांमध्ये सध्या ३४ टक्केच साठा आहे. यामध्ये १० टक्के मृत साठा गृहीत धरता, आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. ४५२ लघू प्रकल्पांमध्ये २४ टक्केच साठा असल्याने भीषण स्थिती ओढावणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत यंदा जानेवारीतच सर्वात कमी साठ्याची नोंद झाली आहे.

विभागात नऊ मुख्य प्रकल्प आहेत. यामध्ये सध्या ६०३.४५ दलघमी पाणीसाठा आहे. ही टक्केवारी ३९ आहे. यामध्ये अमरावतीच्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ६९ टक्के, तर अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ८९ टक्के साठा आहे. पूस १९.७७, अरुणावती १३.०७, बेंबळा १६.५९, काटेपूर्णा १३.८६, नळगंगा २९.१४ व पेनटाकळी प्रकल्पात २५.७१ टक्के साठा आहे. या सर्व  मुख्य प्रकल्पांमध्ये जानेवारी २०१७ मध्ये ५७२.२६ दलघमी, २०१६ मध्ये ७६८.०९ दलघमी, सन २०१५ मध्ये १०१७.६६ दलघमी, तर २०१४ मध्ये ७६४.७४ दलघमी साठा होता. त्या तुलनेत यंदा ६०३.४५ दलघमी साठा उपलब्ध आहे.

विभागात २३ मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत २५२.०६ दलघमी म्हणजेच ३८.३२ टक्के साठा आहे. अमरावती जिल्ह्यातील शहानूर ६० टक्के, चंद्रभागा ६१, पूर्णा ७४, सपन ७०, यवतमाळ जिल्ह्यात अधरपूस ५१, सायखेडा ६८, गोकी ११, वाघाडी १२, बोरगाव ११, नवरगाव ३७, अकोला जिल्ह्यात निगुर्णा ५८, मोर्णा १४, उमा ३, अडाण २१, सोनल ०.४१, एकबुर्जी २३, वाशिम जिल्ह्यात ज्ञानगंगा ४७, पलढग ७२,मस १४, कोराडी १४, मन १६, तोरणा २२, तर उतावळी प्रकल्पात २९ टक्के साठा आहे. या सर्व प्रकल्पांत २०१७ मध्ये ३१३, सन २०१६ मध्ये ३८७, सन २०१५ मध्ये ५१८ तर २०१४ मध्ये ४१० दलघमी साठ्याची नोंद आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जानेवारीतच सर्वात कमी साठा असल्याने आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.

५० टँकरने पाणीपुरवठा-विभागातील आठ तालुक्यांतील ६१ गावांमध्ये १३ शासकीय व ३७ खासगी अशा एकूण ५० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात ४१, यवतमाळ जिल्ह्यात ७ व बुलडाणा जिल्ह्यात २ टँकर लागले आहेत. यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी आॅक्टोबरमध्येच दोन मीटरपेक्षा अधिक खोल गेली. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात बसणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती