शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

वऱ्हाडात जलसंकट, पाच वर्षांत प्रथमच प्रकल्प साठ्यात घट; 484 प्रकल्पात सरासरी 34 टक्केच साठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 15:44 IST

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जानेवारीतच प्रकल्प पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ४८४ प्रकल्पांमध्ये सध्या ३४ टक्केच साठा आहे. यामध्ये १० टक्के मृत साठा गृहीत धरता, आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.

गजानन मोहोड

अमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विभागात जानेवारीतच प्रकल्प पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ४८४ प्रकल्पांमध्ये सध्या ३४ टक्केच साठा आहे. यामध्ये १० टक्के मृत साठा गृहीत धरता, आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. ४५२ लघू प्रकल्पांमध्ये २४ टक्केच साठा असल्याने भीषण स्थिती ओढावणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत यंदा जानेवारीतच सर्वात कमी साठ्याची नोंद झाली आहे.

विभागात नऊ मुख्य प्रकल्प आहेत. यामध्ये सध्या ६०३.४५ दलघमी पाणीसाठा आहे. ही टक्केवारी ३९ आहे. यामध्ये अमरावतीच्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ६९ टक्के, तर अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ८९ टक्के साठा आहे. पूस १९.७७, अरुणावती १३.०७, बेंबळा १६.५९, काटेपूर्णा १३.८६, नळगंगा २९.१४ व पेनटाकळी प्रकल्पात २५.७१ टक्के साठा आहे. या सर्व  मुख्य प्रकल्पांमध्ये जानेवारी २०१७ मध्ये ५७२.२६ दलघमी, २०१६ मध्ये ७६८.०९ दलघमी, सन २०१५ मध्ये १०१७.६६ दलघमी, तर २०१४ मध्ये ७६४.७४ दलघमी साठा होता. त्या तुलनेत यंदा ६०३.४५ दलघमी साठा उपलब्ध आहे.

विभागात २३ मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत २५२.०६ दलघमी म्हणजेच ३८.३२ टक्के साठा आहे. अमरावती जिल्ह्यातील शहानूर ६० टक्के, चंद्रभागा ६१, पूर्णा ७४, सपन ७०, यवतमाळ जिल्ह्यात अधरपूस ५१, सायखेडा ६८, गोकी ११, वाघाडी १२, बोरगाव ११, नवरगाव ३७, अकोला जिल्ह्यात निगुर्णा ५८, मोर्णा १४, उमा ३, अडाण २१, सोनल ०.४१, एकबुर्जी २३, वाशिम जिल्ह्यात ज्ञानगंगा ४७, पलढग ७२,मस १४, कोराडी १४, मन १६, तोरणा २२, तर उतावळी प्रकल्पात २९ टक्के साठा आहे. या सर्व प्रकल्पांत २०१७ मध्ये ३१३, सन २०१६ मध्ये ३८७, सन २०१५ मध्ये ५१८ तर २०१४ मध्ये ४१० दलघमी साठ्याची नोंद आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जानेवारीतच सर्वात कमी साठा असल्याने आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.

५० टँकरने पाणीपुरवठा-विभागातील आठ तालुक्यांतील ६१ गावांमध्ये १३ शासकीय व ३७ खासगी अशा एकूण ५० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात ४१, यवतमाळ जिल्ह्यात ७ व बुलडाणा जिल्ह्यात २ टँकर लागले आहेत. यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी आॅक्टोबरमध्येच दोन मीटरपेक्षा अधिक खोल गेली. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात बसणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती