शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भावर जलसंकट, साठा २५ टक्क्यांवर, ७० गावांत टँकरवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:04 IST

फेब्रुवारीच्या तिस-या आठवड्यात विदर्भातील जलसाठा सरासरी २५ टक्क्यांवर स्थिरावल्याने जलसंकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

अमरावती : फेब्रुवारीच्या तिस-या आठवड्यात विदर्भातील जलसाठा सरासरी २५ टक्क्यांवर स्थिरावल्याने जलसंकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. नागपूर व अमरावती वगळता राज्यातील अन्य चार प्रदेशांतील जलप्रकल्पांची पातळी समाधानकारक आहे. दरम्यान, अमरावती विभागातील ७० गावांमध्ये ५६ टँकर्स ग्रामस्थांची तहान भागवित आहेत.          अमरावती प्रदेशातील ४४३ जलप्रकल्पांमध्ये १७ फेब्रुवारीअखेर केवळ  २७.८७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर नागपूर प्रदेशातील ३८५ प्रकल्पांमध्ये २३.९३ टक्के अर्थात ११२५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. कोकण प्रदेशातील १७५ प्रकल्पांमध्ये ६५.५५ टक्के, नाशिक प्रदेशातील ५६१ प्रकल्पांमध्ये ५७.४८ टक्के, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये ६६.५२, तर मराठवाडा प्रदेशातील ९५७ प्रकल्पांमध्ये ४७.१९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अन्य चारही विभागामध्ये सरासरी ६० ते ६२ टक्के जलसाठ्याच्या तुलनेत अमरावतीत २७.८७, तर नागपूरमधील २३.९३ टक्के जलसाठा वैदर्भीयांच्या चिंतेत भर पाडणारा आहे. राज्यातील ३२४६ प्रकल्पांमध्ये ५२.८३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.अमरावती प्रदेशातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये २६.२८  टक्के, २४  मध्यम प्रकल्पांमध्ये ३७.५५ टक्के, ४०९ लघू प्रकल्पांमध्ये २५.३९ टक्के जलसाठा आहे, तर नागपूर प्रदेशातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२.११, ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये ३०.३४ व ३२६ लघू प्रकल्पांमध्ये २८.६३ टक्के जलसाठा असल्याने यावर्षी विदर्भाला भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावतीच्या तुलनेत नागपूर प्रदेशातील जलपातळी अधिक घसरली असताना, तेथे टँकरवारी सुरू झालेली नाही.राज्यात २४९ गाव-वाड्या तहानल्या

राज्यातील २४५ गावे व चार वाड्यांमध्ये ५४ शासकीय व १६८ खासगी अशा एकूण २२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात नाशिक विभागातील ६९ गावांमध्ये ३८ टँकर, पुणे विभागातील एका गावात एक टँकर, औरंगाबाद विभागातील १०८ गाववाड्यांत १२७, तर अमरावती विभागातील ७० गावांमध्ये ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केली जात असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालय व पाणीपुरवठा कार्यालयाने दिली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ९० गाव-वाड्यांमध्ये एकूण ६८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

टॅग्स :Waterपाणी