शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

विदर्भावर जलसंकट, साठा २५ टक्क्यांवर, ७० गावांत टँकरवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:04 IST

फेब्रुवारीच्या तिस-या आठवड्यात विदर्भातील जलसाठा सरासरी २५ टक्क्यांवर स्थिरावल्याने जलसंकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

अमरावती : फेब्रुवारीच्या तिस-या आठवड्यात विदर्भातील जलसाठा सरासरी २५ टक्क्यांवर स्थिरावल्याने जलसंकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. नागपूर व अमरावती वगळता राज्यातील अन्य चार प्रदेशांतील जलप्रकल्पांची पातळी समाधानकारक आहे. दरम्यान, अमरावती विभागातील ७० गावांमध्ये ५६ टँकर्स ग्रामस्थांची तहान भागवित आहेत.          अमरावती प्रदेशातील ४४३ जलप्रकल्पांमध्ये १७ फेब्रुवारीअखेर केवळ  २७.८७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर नागपूर प्रदेशातील ३८५ प्रकल्पांमध्ये २३.९३ टक्के अर्थात ११२५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. कोकण प्रदेशातील १७५ प्रकल्पांमध्ये ६५.५५ टक्के, नाशिक प्रदेशातील ५६१ प्रकल्पांमध्ये ५७.४८ टक्के, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये ६६.५२, तर मराठवाडा प्रदेशातील ९५७ प्रकल्पांमध्ये ४७.१९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अन्य चारही विभागामध्ये सरासरी ६० ते ६२ टक्के जलसाठ्याच्या तुलनेत अमरावतीत २७.८७, तर नागपूरमधील २३.९३ टक्के जलसाठा वैदर्भीयांच्या चिंतेत भर पाडणारा आहे. राज्यातील ३२४६ प्रकल्पांमध्ये ५२.८३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.अमरावती प्रदेशातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये २६.२८  टक्के, २४  मध्यम प्रकल्पांमध्ये ३७.५५ टक्के, ४०९ लघू प्रकल्पांमध्ये २५.३९ टक्के जलसाठा आहे, तर नागपूर प्रदेशातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२.११, ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये ३०.३४ व ३२६ लघू प्रकल्पांमध्ये २८.६३ टक्के जलसाठा असल्याने यावर्षी विदर्भाला भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावतीच्या तुलनेत नागपूर प्रदेशातील जलपातळी अधिक घसरली असताना, तेथे टँकरवारी सुरू झालेली नाही.राज्यात २४९ गाव-वाड्या तहानल्या

राज्यातील २४५ गावे व चार वाड्यांमध्ये ५४ शासकीय व १६८ खासगी अशा एकूण २२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात नाशिक विभागातील ६९ गावांमध्ये ३८ टँकर, पुणे विभागातील एका गावात एक टँकर, औरंगाबाद विभागातील १०८ गाववाड्यांत १२७, तर अमरावती विभागातील ७० गावांमध्ये ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केली जात असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालय व पाणीपुरवठा कार्यालयाने दिली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ९० गाव-वाड्यांमध्ये एकूण ६८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

टॅग्स :Waterपाणी