शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

नागपूर, अमरावती विभागावर ‘जलसंकट’ ; राज्यात ७१ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 16:46 IST

वार्षिक पर्जन्यमानात तूट आल्याने नागपूर आणि अमरावती विभागावर जलसंकट गडद होण्याची दुचिन्हे आहेत.

ठळक मुद्देमराठवाड्यावरचे मळभ दूर

आॅनलाईन लोकमतअमरावती : वार्षिक पर्जन्यमानात तूट आल्याने नागपूर आणि अमरावती विभागावर जलसंकट गडद होण्याची दुचिन्हे आहेत. उर्वरित विभागाच्या तुलनेत या दोन्ही शेजारी विभागात सरासरी ५० टक्के जलसाठा शिल्लक असल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.२ डिसेंबरअखेर राज्यातील ३,२४२ मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांत ७१.१५ टक्के पाणीसाठा असून गतवर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत त्यात ४ टक्क्यांनी तूट नोंदविली गेली आहे. सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने धरणक्षेत्रात पुरेसा जलसंचय होऊ शकला नाही. त्यामुळे अमरावती व नागपूर विभागातील पाणीसाठा संकुचित झाला आहेत.अमरावती विभागातील ४४३ मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांत केवळ ३८.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील ३८५ एकूण प्रकल्पांमध्ये केवळ ३५.३६ टक्के जलसंचय आहे.कोकण प्रदेशातील १७५ प्रकल्पांमध्ये ८५.१० टक्के, नाशिक प्रदेशातील ५५८ प्रकल्पांमध्ये ८१.७१ टक्के, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये ८६.३९ टक्के, तर मागील वर्षी भीषण दुष्काळ अनुभवलेल्या मराठवाडा विभागात ६५.६१ टक्के असा समाधानकारक जलसाठा आहे.राज्यातील १४० मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण ७६.२० टक्के पाणीसाठा आहे. त्यात कोकण, नाशिक, पुणे, मराठवाडामध्ये सरासरी ८५ टक्के पाणीसाठा असताना अमरावती विभागात ३९.४६ टक्के, तर नागपूर विभागातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३२.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यात एकूण २५७ मध्यम प्रकल्प असून अमरावती विभागातील २४ प्रकल्पांत ४६.२४, कोकणात ८१.५३ टक्के, नागपूरमधील ४२ प्रकल्पांत ४८.०९ टक्के, नाशिकमध्ये ७५.७६, पुणे विभागात ७६.४३ व मराठवाड्यातील ८१ मध्यम प्रकल्पात ५८.७१ टक्के पाणीसाठा आहे.अमरावती विभागातील ४०९ लघु प्रकल्पांमध्ये ३१.०८ टक्के, कोकणातील १५७ प्रकल्पांत ७५.७६, नागपुरातील ३२६ लघु प्रकल्पांमध्ये ४१.६६ टक्के, नाशिकमधील ४८२ प्रकल्पात ६०.७७ टक्के, पुणे ५५.४३ व मराठवाड्यातील ८३२ प्रकल्पात ५१.२७ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणी