शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

पाणीचोरांच्या मुसक्या आवळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:23 IST

सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह १५ महसूल मंडळांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला. किंबहुना जिल्ह्यातच दुष्काळस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जलाशये, प्रकल्पांमधून अनिर्बंंध पाणी उपसा करणाऱ्यांच्या मुसक्या आता आवळल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासननिर्देश : अनिर्बंध पाणी उपशावर दंडात्मक अन् फौजदारी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह १५ महसूल मंडळांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला. किंबहुना जिल्ह्यातच दुष्काळस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जलाशये, प्रकल्पांमधून अनिर्बंंध पाणी उपसा करणाऱ्यांच्या मुसक्या आता आवळल्या जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण नोव्हेंबरमध्येच जाहीर केले. यानंतर जलसंपदा विभागाद्वारे भरारी पथकांच्या माध्यमातून पाणीचोरांवर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे.दुष्काळस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हिवाळ्यातच काही गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. मार्चनंतर पाणीटंचाईची दाहकता आणखी वाढेल. त्यामुळे अनिर्बंध पाणी उपसा करणाºयांवर आता पथकाचा ‘वॉच’ राहणार आहे. दंडात्मक कारवाईसह फौजदारीदेखील केली जाणार आहे.दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या निकषानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दुसरा ट्रिगर लागू झाला. शासनाने या तालुक्यांमध्ये दुष्काळस्थिती जाहीर केली आहे. त्यापैकी मोर्शी तालुक्यात गंभीर स्वरूपाचा, तर अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा व वरूड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. आता जून ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानापेक्षा ७५ टक्के कमी आणि एकूण पर्जन्यमान ७५० मिमीपेक्षा कमी झाल्याने १६ महसूल मंडळांमध्ये आता दुष्काळस्थिती जाहीर करण्यात आली. यामध्ये अमरावती तालुक्यातील शिराळा व नांदगावपेठ, भातकुली तालुक्यातील पूर्णानगर, आष्टी व आसरा, चांदूर रेल्वे तालुक्यात आमला, तिवसा तालुक्यातील कुऱ्हा, दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर, सामदा व थिलोरी, चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव, आसेगाव, तळेगाव व शिरजगाव तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचोली व अंजनसिंगी या मंडळांचा समावेश दुष्काळबाधित यादीत समावेश आहे.भूजल उपशावर नियंत्रण महत्त्वाचेजिल्ह्यातील काही भागातील भूशास्त्रीय व भौगोलिक परिस्थिती तसेच रबी हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर उपसा होण्याची शक्यला लक्षात घेता, जलस्रोतावर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रामुख्याने मोर्शी व वरूड तालुक्यात भूजलाचा अनियंत्रित उपसा होत आहे. महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ अन्वये यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. जे तलाव पाणीपुरवठा योजनांचे स्रोत आहेत, त्यांच्या बुडीत क्षेत्रातील विहिरींच्या उपशावर बंदी घालणे आवश्यक आहे.उपशावर बंदीची ‘जीएसडीए’ची शिफारसजिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने १२ तालुक्यांतील भूजलात तूट आली आहे. साधारणपणे ४५५ गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली असल्याने अधिनियमाचे कलम २५ अन्वये टंचाईक्षेत्र जाहीर करणे व ज्या पाणीपुरवठा योजनेचे स्रोत तलावाच्या बुडीत क्षेत्रात आहे, अशा तलावांतील पाणी उपशावर बंदी घालण्याची शिफारस भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात केली आहे.असे राहणार भरारी पथकशासननिर्देशानुसार दुष्काळी भागात अमर्याद पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथक गठित होणार आहे. भरारी पथकात जलसंपदा विभागासह महावितरणचे शाखा अभियंता, मंडळ अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी आदींचा समावेश राहणार आहे. या पथकाद्वारे अनिर्बंध उपसा करणाऱ्यांवर आता दंडात्मक व फौजदारी कारवाई जाईल. या पथकावर जिल्हाधिकाºयांचे मॉनिटरिंग राहणार आहे.