शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वरूड-मोर्शीच्या मिरचीला रसायनांचा फटका, ‘तेजा’नेही केले घायाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:43 IST

शेतकऱ्यांना हिरवी मिरची उत्पादनातून समृद्धीची वाट दाखविणाऱ्या वरूड-मोर्शी भागात हे पीक शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे. निर्यातबंदी, नवे तिखट वाण तसेच त्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने या पिकाचे पेरणीक्षेत्र घटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

नरेंद्र निकम ।लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी (अमरावती) : शेतकऱ्यांना हिरवी मिरची उत्पादनातून समृद्धीची वाट दाखविणाऱ्या वरूड-मोर्शी भागात हे पीक शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे. निर्यातबंदी, नवे तिखट वाण तसेच त्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने या पिकाचे पेरणीक्षेत्र घटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.विदर्भातील कॅलिफोर्निया म्हणून परिचित असलेल्या वरूड व मोर्शी तालुक्यातील शेतकरी एक दशकापासून मिरची उत्पादनाकडे वळला आहे. अलीकडे या पिकाचे पारंपारिक बियाणे मोडित निघाले असून, सुधारित वाण व प्रगत तंत्रज्ञानामुळे वाढलेले उत्पादन विकण्यास राजुरा बाजारशिवाय अन्य सक्षम बाजारपेठ नसल्यामुळे तोडणीच्या चुकाºयासाठी वेगळी व्यवस्था लावावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक ओढाताण वाढली आहे. मिरचीला अपेक्षित दर नसल्याने अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील राजुराबाजारला लागून असलेल्या गावांतील सुमारे दोन हजार उत्पादक व १० ते १५ हजार मजूर वर्ग प्रभावित झाला. २००८ नंतर पहिल्यांदा दीड महीन्यापासून बाजारात मंदीचे सावट आहे. तोडे बंद होऊन मिरची लाल होण्याची वाट पाहिली जात आहे. त्यामुळे उत्पादन व उत्पन्न दोन्ही घटले आहे. मोर्शी तालुक्यात ८० ते ९० हेक्टरवर यावर्षी मिरचीची लागवड असून, पुढील वर्षी यात घट होण्याची शक्यता आहे. संकरित बियाणे, रासायनिक खते, औषधी व ड्रिप इरिगेशनमुळे एका हंगामात एकरी ३०० ते ४०० क्विंटल मिरची निघते. परंतु, बाजारपेठ नाही, निर्यात नाही, कमी दराची रेल्वे वाहतूक नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाला सध्या मिळत असलेला ६ रुपये किलोचा दर २० रुपयांपर्यंत जावा, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे.उत्पादन वाढले; बाजारपेठ तोकडीनवनवीन जाती सुधारित प्रगत तंत्रज्ञानाने मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले. एका एकरात ३० ते ४० क्विंटलचा तोडा १५ दिवसांत येतो. त्यानुसार लागवडीचे क्षेत्रही वाढले. वरूड तालुक्यातील राजुराबाजार ही मिरचीसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. तथापि, अन्य ठिकाणी स्वतंत्र बाजारपेठ नसल्याने उत्पादनाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.सुधारित बियाणे तेजकमी उत्पादन देणारे मिरचीचे पारंपरिक वाण जाऊन सुधारित बियाणे बाजारात मिळायला लागल्यामुळे नामशेष झाले. ब्लॅसिड, पंतनगर हे एवढे तिखट वाण नव्हते. त्यामुळे ते अधिक खपत होते. परंतु, सुधारित वाणाची एक मिरचीही खाणे शक्य नाही.मर्यादित वाहतूक क्षमतामिरचीच्या वाहतुकीसाठी राजुराबाजार येथून रेल्वे लाइनची मागणी होत आहे. रेल्वेअभावी देशाच्या कानाकोपºयात जाणारा माल जागीच पडून आहे. उलट आंध्रातून थेट मुंबईत मिरची येते. चिल्लर बाजारात मात्र तुलनेने तेजी असल्यामुळे मिरचीचे भाव पडल्याचे सर्वसामान्यांच्या लक्षातही येत नाही.रसायनांना परदेशात नकारमिरचीचा तोडा झाला की, शेतकरी कृषिनिविष्ठा विक्रेत्यांच्या उत्पादनवाढीच्या आमिषाला बळी पडून खताचे डोज, रासायनिक फवारणी करून दुसरा बार मिळवितो. परदेशात सेंद्रिय पिकांना मागणी आहे. त्यामुळे या आघाडीवर वरूड-मोर्शीची मिरची मागे पडते.नवीन तिखट वाणामुळे खपावर तसाही विपरीत परिणाम झाला. शासनाने निर्यातीवर बंधने लादून शेतकरी नामशेष करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सर्वच पारंपरिक बियाणे नामशेष झाली.- प्रदीप भोंडे, अडते, राजुराउत्पादन वाढले. तसा खर्चही वाढला. देशात सक्षम कृषीमाल खरेदी यंत्रणा नसल्यामुळे त्यांच्यावरही विस्थापीत होण्याची वेळ आली आहे.- विलास ठाकरे, शेतकरी, येरला, ता. मोर्शी.