शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वरूड-मोर्शीच्या मिरचीला रसायनांचा फटका, ‘तेजा’नेही केले घायाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:43 IST

शेतकऱ्यांना हिरवी मिरची उत्पादनातून समृद्धीची वाट दाखविणाऱ्या वरूड-मोर्शी भागात हे पीक शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे. निर्यातबंदी, नवे तिखट वाण तसेच त्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने या पिकाचे पेरणीक्षेत्र घटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

नरेंद्र निकम ।लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी (अमरावती) : शेतकऱ्यांना हिरवी मिरची उत्पादनातून समृद्धीची वाट दाखविणाऱ्या वरूड-मोर्शी भागात हे पीक शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे. निर्यातबंदी, नवे तिखट वाण तसेच त्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने या पिकाचे पेरणीक्षेत्र घटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.विदर्भातील कॅलिफोर्निया म्हणून परिचित असलेल्या वरूड व मोर्शी तालुक्यातील शेतकरी एक दशकापासून मिरची उत्पादनाकडे वळला आहे. अलीकडे या पिकाचे पारंपारिक बियाणे मोडित निघाले असून, सुधारित वाण व प्रगत तंत्रज्ञानामुळे वाढलेले उत्पादन विकण्यास राजुरा बाजारशिवाय अन्य सक्षम बाजारपेठ नसल्यामुळे तोडणीच्या चुकाºयासाठी वेगळी व्यवस्था लावावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक ओढाताण वाढली आहे. मिरचीला अपेक्षित दर नसल्याने अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील राजुराबाजारला लागून असलेल्या गावांतील सुमारे दोन हजार उत्पादक व १० ते १५ हजार मजूर वर्ग प्रभावित झाला. २००८ नंतर पहिल्यांदा दीड महीन्यापासून बाजारात मंदीचे सावट आहे. तोडे बंद होऊन मिरची लाल होण्याची वाट पाहिली जात आहे. त्यामुळे उत्पादन व उत्पन्न दोन्ही घटले आहे. मोर्शी तालुक्यात ८० ते ९० हेक्टरवर यावर्षी मिरचीची लागवड असून, पुढील वर्षी यात घट होण्याची शक्यता आहे. संकरित बियाणे, रासायनिक खते, औषधी व ड्रिप इरिगेशनमुळे एका हंगामात एकरी ३०० ते ४०० क्विंटल मिरची निघते. परंतु, बाजारपेठ नाही, निर्यात नाही, कमी दराची रेल्वे वाहतूक नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाला सध्या मिळत असलेला ६ रुपये किलोचा दर २० रुपयांपर्यंत जावा, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे.उत्पादन वाढले; बाजारपेठ तोकडीनवनवीन जाती सुधारित प्रगत तंत्रज्ञानाने मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले. एका एकरात ३० ते ४० क्विंटलचा तोडा १५ दिवसांत येतो. त्यानुसार लागवडीचे क्षेत्रही वाढले. वरूड तालुक्यातील राजुराबाजार ही मिरचीसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. तथापि, अन्य ठिकाणी स्वतंत्र बाजारपेठ नसल्याने उत्पादनाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.सुधारित बियाणे तेजकमी उत्पादन देणारे मिरचीचे पारंपरिक वाण जाऊन सुधारित बियाणे बाजारात मिळायला लागल्यामुळे नामशेष झाले. ब्लॅसिड, पंतनगर हे एवढे तिखट वाण नव्हते. त्यामुळे ते अधिक खपत होते. परंतु, सुधारित वाणाची एक मिरचीही खाणे शक्य नाही.मर्यादित वाहतूक क्षमतामिरचीच्या वाहतुकीसाठी राजुराबाजार येथून रेल्वे लाइनची मागणी होत आहे. रेल्वेअभावी देशाच्या कानाकोपºयात जाणारा माल जागीच पडून आहे. उलट आंध्रातून थेट मुंबईत मिरची येते. चिल्लर बाजारात मात्र तुलनेने तेजी असल्यामुळे मिरचीचे भाव पडल्याचे सर्वसामान्यांच्या लक्षातही येत नाही.रसायनांना परदेशात नकारमिरचीचा तोडा झाला की, शेतकरी कृषिनिविष्ठा विक्रेत्यांच्या उत्पादनवाढीच्या आमिषाला बळी पडून खताचे डोज, रासायनिक फवारणी करून दुसरा बार मिळवितो. परदेशात सेंद्रिय पिकांना मागणी आहे. त्यामुळे या आघाडीवर वरूड-मोर्शीची मिरची मागे पडते.नवीन तिखट वाणामुळे खपावर तसाही विपरीत परिणाम झाला. शासनाने निर्यातीवर बंधने लादून शेतकरी नामशेष करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सर्वच पारंपरिक बियाणे नामशेष झाली.- प्रदीप भोंडे, अडते, राजुराउत्पादन वाढले. तसा खर्चही वाढला. देशात सक्षम कृषीमाल खरेदी यंत्रणा नसल्यामुळे त्यांच्यावरही विस्थापीत होण्याची वेळ आली आहे.- विलास ठाकरे, शेतकरी, येरला, ता. मोर्शी.