शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

वणव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: May 15, 2016 23:59 IST

मागील आठवड्यात वादळी पाऊस कोसळला. दोन, चार दिवस वातावरणात गारवा जाणवला. मात्र, आता तापमान वाढले असून...

तापमान वाढले : जंगल, वन्यपशुंची काळजी घेण्याचे निर्देशअमरावती: मागील आठवड्यात वादळी पाऊस कोसळला. दोन, चार दिवस वातावरणात गारवा जाणवला. मात्र, आता तापमान वाढले असून पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार जाण्याच्या स्थितीत आहे. वाढत्या तापमानाचा फटका सर्वाधिक जंगल आणि वन्यपशुंना बसणार आहे. परिणामी वणव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात ‘अलर्ट’ जारी करण्यात आले आहे.मागील महिन्यात टिपेश्वर, ताडोबा, पेंच व वडाळी वनक्षेत्राच्या पोहरा जंगलात आग लागून मोठी हानी झाली होती. दोन-तीन दिवसांपासून तापमानात कमालिची वाढ झाली आहे. तप्त उन्हामुळे जीवाची काहिली होत असून जंगलांना आगी लागण्याची भीती वनविभागाने वर्तविली आहे. याच पार्श्वभूमीवर वणव्यावर सॅटेलाईटद्वारे नियंत्रण मिळविण्याची तयारी देखील करण्यात आली आहे.वनविभागाने आधुनिकतेची कास धरली असताना जंगलात लागणाऱ्या वणन्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही आधुनिक पद्धतीचा स्वीकार केला नाही. त्यामुळे दरवर्षी जंगलात लागणाऱ्या आगींवर पारंपरिक पद्धतीने वन कर्मचारी जीव मुठीत घेऊन नियंत्रण मिळवितात. परंतु मनुष्यबळाची वानवा ही खरी समस्या वणवा नियंत्रणासाठी कारणीभूत ठरु लागली आहे. मध्यंतरी दऱ्याखोऱ्यात लागणाऱ्या आगीत मौल्यवान वनस्पती, वन्यपशू, दुर्मीळ वनौषधी, झाडे खाक झाल्याचा घटना घडल्या आहेत. राज्यात दरवर्षी दोन लाख हेक्टरच्या जवळपास जंगल जळून खाक होत असल्याची वनविभागाच्या दप्तरी नोंद आहे. विशेषत: तेंदूचे वृक्ष हे मेळघाट, चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ वनक्षेत्रात सर्वाधिक आहे. या वनक्षेत्रात वणव्यामुळे लाखो रुपयांची तेंदू पाने जळून नष्ट होतात, अशी माहिती आहे. वनविभागाकडून वणव्याबाबत जनजागृती केली जाते. अतिरिक्त वनकर्मचारी नेमलेकाही दिवसांपूर्वी पोहरा जंगलात आग लागली होती. मात्र, या आगीत वन्यपशुंची हानी झाली नसली तरी वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्त वनकर्मचारी नेमण्यात आले आहेत. १५ जूनपर्यंत वणव्याच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला.जंगलातील आग नियंत्रण करण्यासाठी वनविभाग सज्ज आहे. यापूर्वीच जंगलात जाळ रेषा तयार करण्यात येणार आहे. फायर वॉचमनच्या नियुक्ती देखील झाल्या आहेत. आग नियंत्रणासाठी सयंत्र खरेदीची तरतूद असून ती तोकडी आहे.- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती.