शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचना, आरक्षणावर २६ आक्षेप

By admin | Updated: July 17, 2016 00:05 IST

जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या प्रभाग रचना व आरक्षण यावर १४ जुलैपर्यंत आक्षेप व हरकती जिल्हा प्रशासनाने मागविल्या होत्या.

नऊ पालिका : जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष १९ जुलैपासून सुनावणीअमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या प्रभाग रचना व आरक्षण यावर १४ जुलैपर्यंत आक्षेप व हरकती जिल्हा प्रशासनाने मागविल्या होत्या. अंतिम मुदतीपर्यंत ७ नगरपरिषदेत २६ आक्षेप दाखल झालेत तर २ नगरपरिषद निरंक आहेत. यावर १८ ते २२ जुलैदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी होऊन प्रारूप रचनेला अंतिम स्वरुप देण्यासाठी आराखडे विभागीय आयुक्तांकडे जाणार आहे.जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, धामणगाव, दर्यापूर, वरूड, शेंदूरजनाघाट या नगरपंचायतींचा कालावधी १६ डिसेंबर २०१६ या कालावधीत संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी सार्वत्रिक निवडणूका होत आहे. त्याअनुषंगाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाद्वारे विविध प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या नऊही नगरपरिषदांमध्ये २०११ मधील जनगणनेच्या आधारावर प्रभाग रचना करण्यात आली व २ जुलै रोजी प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले, प्रभाग रचना व सदस्यपदांचे आरक्षण यावर ४ ते १४ जुलै या कालावधीत आक्षेप मागविण्यात आले होते. या १० दिवसात २६ आक्षेप नगर विकास कार्यालयास प्राप्त झाले आहे. यामध्ये अचलपूर नगरपरिषदेसाठी ३ आक्षेप, अंजनगाव सुर्जी ८, चांदूरबाजार २, चांदूररेल्वे ३, मोर्शी ३, शेंदूरजनाघाट ४, दर्यापूर ३ व धामणगाव नगरपरिषदसाठी ३ आक्षेप दाखल झाले आहेत. वरूड व शेंदूरजनाघाट येथे आक्षेप निरंक आहेत. या सर्व ठिकाणी १८ ते २२ जुलै दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी होणार आहे. यासाठी पुराव्यासह उपस्थित रहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)आक्षेपांवर मंगळवारपासून सुनावणीजिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागात नऊ नगरपरिषदांसाठी रीतसर आक्षेप नोंदविण्यात आले. याची सुनावणीसाठी नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत. सुनावणी ही अचलपूरसाठी २२ जुलै, अंजनगाव सुर्जी २० जुलै, चांदूरबाजार १८ जुलै, चांदूररेल्वे २१ जुलै, मोर्शी १९ जुलै, दर्यापूर १९ जुलै व धामणगाव रेल्वे २१ जुलै रोजी राहणार आहे.गुगल मॅपद्वारे प्रभाग रचनाजिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेसाठी यावेळी प्रथमच गुगल मॅपचा वापर करण्यात आला. त्यामुळे प्रभागातील गट आणि त्यानुसार केलेली रचना यामुळे आक्षेपांची संख्या कमी झाली. केवळ ७ नगरपरिषदांमध्ये २६ आक्षेप दाखल झाले तर २ नगरपरिषदांमध्ये आक्षेप निरंक आहेत.