शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

प्रभाग रचना, आरक्षणावर २६ आक्षेप

By admin | Updated: July 17, 2016 00:05 IST

जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या प्रभाग रचना व आरक्षण यावर १४ जुलैपर्यंत आक्षेप व हरकती जिल्हा प्रशासनाने मागविल्या होत्या.

नऊ पालिका : जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष १९ जुलैपासून सुनावणीअमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या प्रभाग रचना व आरक्षण यावर १४ जुलैपर्यंत आक्षेप व हरकती जिल्हा प्रशासनाने मागविल्या होत्या. अंतिम मुदतीपर्यंत ७ नगरपरिषदेत २६ आक्षेप दाखल झालेत तर २ नगरपरिषद निरंक आहेत. यावर १८ ते २२ जुलैदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी होऊन प्रारूप रचनेला अंतिम स्वरुप देण्यासाठी आराखडे विभागीय आयुक्तांकडे जाणार आहे.जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, धामणगाव, दर्यापूर, वरूड, शेंदूरजनाघाट या नगरपंचायतींचा कालावधी १६ डिसेंबर २०१६ या कालावधीत संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी सार्वत्रिक निवडणूका होत आहे. त्याअनुषंगाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाद्वारे विविध प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या नऊही नगरपरिषदांमध्ये २०११ मधील जनगणनेच्या आधारावर प्रभाग रचना करण्यात आली व २ जुलै रोजी प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले, प्रभाग रचना व सदस्यपदांचे आरक्षण यावर ४ ते १४ जुलै या कालावधीत आक्षेप मागविण्यात आले होते. या १० दिवसात २६ आक्षेप नगर विकास कार्यालयास प्राप्त झाले आहे. यामध्ये अचलपूर नगरपरिषदेसाठी ३ आक्षेप, अंजनगाव सुर्जी ८, चांदूरबाजार २, चांदूररेल्वे ३, मोर्शी ३, शेंदूरजनाघाट ४, दर्यापूर ३ व धामणगाव नगरपरिषदसाठी ३ आक्षेप दाखल झाले आहेत. वरूड व शेंदूरजनाघाट येथे आक्षेप निरंक आहेत. या सर्व ठिकाणी १८ ते २२ जुलै दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी होणार आहे. यासाठी पुराव्यासह उपस्थित रहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)आक्षेपांवर मंगळवारपासून सुनावणीजिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागात नऊ नगरपरिषदांसाठी रीतसर आक्षेप नोंदविण्यात आले. याची सुनावणीसाठी नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत. सुनावणी ही अचलपूरसाठी २२ जुलै, अंजनगाव सुर्जी २० जुलै, चांदूरबाजार १८ जुलै, चांदूररेल्वे २१ जुलै, मोर्शी १९ जुलै, दर्यापूर १९ जुलै व धामणगाव रेल्वे २१ जुलै रोजी राहणार आहे.गुगल मॅपद्वारे प्रभाग रचनाजिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेसाठी यावेळी प्रथमच गुगल मॅपचा वापर करण्यात आला. त्यामुळे प्रभागातील गट आणि त्यानुसार केलेली रचना यामुळे आक्षेपांची संख्या कमी झाली. केवळ ७ नगरपरिषदांमध्ये २६ आक्षेप दाखल झाले तर २ नगरपरिषदांमध्ये आक्षेप निरंक आहेत.