शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

११ केंद्रांवर चणा खरेदीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 01:24 IST

चणा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक नाडवणूक टाळण्यासाठी नाफेडच्यावतीने नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात आली खरी; तथापि अद्यापही अचलपूर वगळता ११ केंद्रांवर चणा खरेदीस सुरुवात करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देकेवळ अचलपुरात सुरुवात : आॅनलाईन नोंदणी ९३०० क्विंटलवर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चणा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक नाडवणूक टाळण्यासाठी नाफेडच्यावतीने नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात आली खरी; तथापि अद्यापही अचलपूर वगळता ११ केंद्रांवर चणा खरेदीस सुरुवात करण्यात आलेली नाही. तुरीचा मोबदला अद्याप मिळाला नाही आणि चण्याचे माप झाले नसल्याने तोंडावर आलेला लग्नाचा हंगाम पार कसा पाडायचा, अशी विवंचना शेतकऱ्यांसमक्ष उभी ठाकली आहे.चण्याची आॅनलाईन नोंदणी करून शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील अचलपूर, दर्यापूर, तिवसा, धारणी, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, वरूड, धामणगाव रेल्वे, अमरावती व चांदूरबाजार या तालुक्यांच्या ठिकाणी खरेदी-विक्री संघामार्फत १२ केंद्रे सुरू करण्यात आली. महारष्टÑ राज्य सहकारी पणन महासंघ, अमरावती ( डीएमओ) व दि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, अमरावती या दोन संस्थांद्वारे ही केंदे्र १४ ते १८ मार्च दरम्यान सुरू करण्यात आली. २८ मार्चपर्यंत अचलपूर केंद्रावर १०९८, दर्यापूरमध्ये १०४४, तिवसा येथे ७३१, धारणी येथे १६४, चांदूररेल्वेत १२७३, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर ७५९, अंजनगाव सुर्जी केंद्रावर १५३० शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली, तर दि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, अमरावतीमार्फत सुरू करण्यात आलेल्या मोर्शी केंद्रावर ५८३, वरूडमध्ये ४७३, धामणगाव रेल्वेमध्ये ६७०, अमरावतीमध्ये ४२६ व चांदूर बाजार खरेदी केंद्रावर ५९१ अशा एकूण ९३४२ शेतकऱ्यांच्या चण्याची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. मात्र, अचलपूर खरेदी केंद्रावर ३० मार्चपर्यंत झालेल्या २१ शेतकऱ्यांच्या ४०४ क्विंटल चण्याव्यतिरिक्त अन्य ११ केंद्रांवर नोंदणीवरच शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. १२ खरेदी केंद्रांवर ३० मार्चपर्यत ९३४२ नोंदणी असताना, केवळ २१ शेतकऱ्यांच्या चण्याचे माप करण्यात आले. त्यामुळे तुरीप्रमाणे चणा उत्पादक शेतकऱ्यांनाही खरेदी व मोबदल्यासाठी वर्षभराची प्रतीक्षा करावी तर लागणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.तुरीची खरेदी रखडलीचणा खरेदीचा निव्वळ बागुलबुवा केला जात असताना, तब्बल २६ हजार शेतकºयांच्या तुरीचे माप व खरेदी रखडली आहे. जिल्ह्यातील १२ केंद्रांवर २० मार्चपर्यंत एकूण ३३ हजार २ शेतकऱ्यांनी त्यांच्या तुरीची आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र, ३० मार्चपर्यंत त्यापैकी केवळ ६९२२ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ७०९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. त्यामुळे आमच्या तुरीचे माप केव्हा, असा २६ हजार शेतकऱ्यांचा आर्त सवाल आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड