शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

११ केंद्रांवर चणा खरेदीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 01:24 IST

चणा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक नाडवणूक टाळण्यासाठी नाफेडच्यावतीने नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात आली खरी; तथापि अद्यापही अचलपूर वगळता ११ केंद्रांवर चणा खरेदीस सुरुवात करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देकेवळ अचलपुरात सुरुवात : आॅनलाईन नोंदणी ९३०० क्विंटलवर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चणा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक नाडवणूक टाळण्यासाठी नाफेडच्यावतीने नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात आली खरी; तथापि अद्यापही अचलपूर वगळता ११ केंद्रांवर चणा खरेदीस सुरुवात करण्यात आलेली नाही. तुरीचा मोबदला अद्याप मिळाला नाही आणि चण्याचे माप झाले नसल्याने तोंडावर आलेला लग्नाचा हंगाम पार कसा पाडायचा, अशी विवंचना शेतकऱ्यांसमक्ष उभी ठाकली आहे.चण्याची आॅनलाईन नोंदणी करून शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील अचलपूर, दर्यापूर, तिवसा, धारणी, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, वरूड, धामणगाव रेल्वे, अमरावती व चांदूरबाजार या तालुक्यांच्या ठिकाणी खरेदी-विक्री संघामार्फत १२ केंद्रे सुरू करण्यात आली. महारष्टÑ राज्य सहकारी पणन महासंघ, अमरावती ( डीएमओ) व दि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, अमरावती या दोन संस्थांद्वारे ही केंदे्र १४ ते १८ मार्च दरम्यान सुरू करण्यात आली. २८ मार्चपर्यंत अचलपूर केंद्रावर १०९८, दर्यापूरमध्ये १०४४, तिवसा येथे ७३१, धारणी येथे १६४, चांदूररेल्वेत १२७३, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर ७५९, अंजनगाव सुर्जी केंद्रावर १५३० शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली, तर दि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, अमरावतीमार्फत सुरू करण्यात आलेल्या मोर्शी केंद्रावर ५८३, वरूडमध्ये ४७३, धामणगाव रेल्वेमध्ये ६७०, अमरावतीमध्ये ४२६ व चांदूर बाजार खरेदी केंद्रावर ५९१ अशा एकूण ९३४२ शेतकऱ्यांच्या चण्याची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. मात्र, अचलपूर खरेदी केंद्रावर ३० मार्चपर्यंत झालेल्या २१ शेतकऱ्यांच्या ४०४ क्विंटल चण्याव्यतिरिक्त अन्य ११ केंद्रांवर नोंदणीवरच शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. १२ खरेदी केंद्रांवर ३० मार्चपर्यत ९३४२ नोंदणी असताना, केवळ २१ शेतकऱ्यांच्या चण्याचे माप करण्यात आले. त्यामुळे तुरीप्रमाणे चणा उत्पादक शेतकऱ्यांनाही खरेदी व मोबदल्यासाठी वर्षभराची प्रतीक्षा करावी तर लागणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.तुरीची खरेदी रखडलीचणा खरेदीचा निव्वळ बागुलबुवा केला जात असताना, तब्बल २६ हजार शेतकºयांच्या तुरीचे माप व खरेदी रखडली आहे. जिल्ह्यातील १२ केंद्रांवर २० मार्चपर्यंत एकूण ३३ हजार २ शेतकऱ्यांनी त्यांच्या तुरीची आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र, ३० मार्चपर्यंत त्यापैकी केवळ ६९२२ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ७०९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. त्यामुळे आमच्या तुरीचे माप केव्हा, असा २६ हजार शेतकऱ्यांचा आर्त सवाल आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड