शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत नव्या ‘एटीसी’ची प्रतीक्षा; सात प्रकल्प अधिका-यांवर नियंत्रण कुणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 15:33 IST

आदिवासी विकास विभागाच्या अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयात (एटीसी) पदाची खुर्ची रिकामी आहे.

गणेश वासनिकअमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयात (एटीसी) पदाची खुर्ची रिकामी आहे. गत दीड महिन्यापासून प्रभारीवरच कारभार सुरू असल्याने विकासकामे, उपक्रम, योजना अंमलबजावणीचा वेग मंदावला आहे. सात प्रकल्प अधिकाºयांवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.तत्कालीन एटीसी पी. चंद्रन यांची १६ जुलै रोजी नाशिक येथे अतिरिक्त अधिकारी म्हणून बदली झाली. ते नाशिक येथे रूजूदेखील झाले आहेत. मात्र, राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने अमरावतीत कायमस्वरूपी एटीसी दिले नाही, अशी माहिती मंत्रालयातून सूत्रांनी दिली आहे. सध्या अमरावती एटीसीपदाचा कारभार नागपूरचे एटीसी विनोद पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, एकाचवेळी अमरावती आणि नागपूर असा दोन एटीसीपदाचा कारभार हाताळणे अवघड आहे. विनोद पाटील यांच्याकडे नागपूर एटीसीपदाची धुरा असल्यामुळे ते नागपूरला विशेष प्राधान्य देत असून, ते अमरावतीला पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाज खोळंबले आहे. धारणीपासून तर औरंगाबादपर्यंत असा अमरावती एटीसी कार्यालयाचा विस्तार आहे. अमरावती एटीसी कार्यालयात दरदिवशी आदिवासी बांधव, आश्रमशाळांचे शिक्षक व एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी कामानिमित्त येतात. परंतु, येथे कायमस्वरूपी एटीसी नसल्याने प्रश्न, गाºहाणी, समस्या कोणाकडे मांडाव्यात, असा सवाल उपस्थित झाला आहे. कायमस्वरूपी एटीसी नसल्याने सातही प्रकल्प अधिकाºयांवर नियंत्रण कुणाचे हा प्रश्न अनुत्तरीत आहे.बॉक्समुख्यमंत्र्यांनी केली नव्या एटीसीच्या फाईलवर स्वाक्षरीअमरावतीत नवीन एटीसी कोण असणार याबाबत अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. १६ जुलैपासून एटीसीपद रिक्त असून, शासनाने नागपूरचे विनोद पाटील यांच्याकडे प्रभार सोपविला आहे. मध्यंतरी विनोद पाटील यांनी अमरावतीत आढावासुद्धा घेतला आहे. अमरावतीत एटीसीपदासाठी अनेक जण इच्छूक असले तरी विनोद पाटील यांनाच अमरावती एटीसीपदावर कायम ठेवले जाणार आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाईलवर स्वाक्षरी केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून मिळाली. बॉक्सअमरावती एटीसी कार्यालयाचे पाचशे कोटींचे बजेटअमरावती एटीसी कार्यालयाचा कारभार अकोला, धारणी, पांढकवडा, कळमनुरी, औरंगाबाद, पुसद व किनवट अशा सात एकात्मिक प्रकल्प कार्यालयांतर्गत चालतो. सुमारे ५०० ते ५५० कोटी रुपयांची दरवर्षी बजेटमध्ये तरतूद केली जाते. आदिवासींचा विकास, शिक्षण, रोजगार आदी महत्त्वाचे उपक्रम एटीसींच्या माध्यमातून राबविले जातात. त्यामुळे अमरावतीत एटीसीपदी आयएएस अधिकारी मिळावा, अशी आदिवासी बांधवांकडून मागणी आहे.