शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

तीन हजार कुटुंबांना घरकुलांची प्रतीक्षा

By admin | Updated: April 22, 2016 01:34 IST

घरकुलाचे स्वप्न पाहणारे तालुक्यातील तीन हजार कुटुंब हक्काच्या निवाऱ्यासाठी भटकंती करीत आहेत़ तालुक्याच्या प्रतीक्षा

मोहन राऊत ल्ल धामणगाव रेल्वेघरकुलाचे स्वप्न पाहणारे तालुक्यातील तीन हजार कुटुंब हक्काच्या निवाऱ्यासाठी भटकंती करीत आहेत़ तालुक्याच्या प्रतीक्षा यादीच्या तुलनेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून मिळणाऱ्या घरकुलांची संख्या नाममात्र आहे. अनेक कुटुंबांना घरकुल मंजूर झालेत. मात्र, जागा उपलब्ध करून देण्याकरिता तोडगा काढण्याऐवजी महसूल प्रशासन कागदी घोडे नाचवित असल्याने या कुटूंबांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे़तालुक्यात इंदिरा आवास घरकूल योजनेची अवस्था बिकट आहे़ जिल्हा प्रशासनाकडून प्रतीक्षा यादीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे इतर मागासवर्गीय गटातील १ हजार ४४ कुटुंबांना हक्काचे घरकूल मिळाले नाही जळगाव आर्वी येथील २० कुटुंबांना आजही प्रतीक्षा करावी लागत आहे़ येथील सरपंच सोनाली धीरज मुडे यांनी ग्रामीण विकास यंत्रणेकडे पत्रव्यवहार करून या उपेक्षित लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे़ सावळा येथील ३० लाभार्थ्यांना घरकूल मिळावे म्हणून बाजार समितीचे संचालक अविन टेकाडे मैदानात उतरले असून वडगाव राजदी गावातील उपसरपंच नितीन काळे यांनी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे़ त्याचप्रमाणे रायपूर कासारखेड जुळ्या गावातील ३७ जणांना न्याय मिळावा म्हणून येथील सरपंच कीर्ती राऊत न्याय मागत आहेत. सोनेगाव खर्डा येथील सरपंच प्रवीण खैरकार यांनी ५० घरकुल प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना मिळावे म्हणून ग्रामीण विकासयंत्रणेच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे़ जळगाव मंगरूळ येथील २६ लाभार्थांना थेट जिल्हा प्रशासनाच्या दरबारात नेऊन उपसरपंच मनोज शिवणकर यांनी त्यांना हक्काचे घरकुल कधी देणार? असा सवाल प्रशासनाला विचारला आहेत़ गव्हा फरकाडे येथील सरपंच दुर्याेधन राघोर्ते यांनी ३६ लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी हक्काची लढाई लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे़ तळेगाव दशासर येथील सरपंच मनोज बानोडे यांनी ७४ लोकांना न्याय मिळावा म्हणून प्रशासनाला निवेदन दिले आहे़ वाढोणा येथील सरपंच महानंदा तितरे व चिंचोली येथील सरपंच तुषार सोरटकर यांनी त्यांच्या गावातील ओबीसी यादीतील घरकुलांचे लाभार्थी बिकट जीवन जगत असल्याचा पुरावा जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे़ मंगरूळ दस्तगीर येथील ६९ लाभार्थ्यांसाठी सरपंच अर्चना भोंगे उसळगव्हाणचे सरपंच नितीन कोेंडेकार, देवगाव येथील विशाल जयस्वाल, अंजनवतीचे विठ्ठल सपाटे तिवरा येथील रणजित घुसळकर, वाठोडाच्या स्रेहल जायले, विठाळ्याच्या मंगेश ठाकरे, हिंगणगाव येथील मंगला हगवणे, आसेगावच्या अनिता यादव, निंभोरा राज येथील जयंत बमनोटे, कासारखेड येथील उपसरपंच नितीन मेंढुले, उपसरपंचा नंदा सावंत, झाडगाव येथील सरपंचा ललिता रावेकर, तळणी येथील सरपंच रामेश्वर डहाके, कळाशीचे संदीप मिर्चापुरे, झाडा येथील शुभांगी चौधरी, पेठ रघुनाथपूर येथील विजय राऊत, चिंचपूरच्या उषा घटाळे, शेेंदुरजना खुर्द येथील वंदना देशमुख, वाघोलीचे सरपंच विजय गायकवाड, अशोकनगरच्या सरपंच सीमा गुल्हाने, निंबोलीच्या ज्योती पवार, वरूड बगाजी येथील उपसरपंच बिपीन दगडकर, हिरपूर येथील सरपंच रवी बिरे, दाभाडाच्या शशीकला नेवारे, पिंपळखुटा येथील शशीकला माळोदे, जुना धामणगावच्या प्रतीभा ढाकुलकर, जळकापटाचे येथील सरपंच अर्चना सातकर, वसाड येथील कांचन ढोमणे हे लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून जिल्हाप्रशासनाकडे न्याय मागताहेत़ (तालुका प्रतिनिधी)जागेचा प्रश्न प्रलंबित४तालुक्यातील अनेक गावांत जागा आहे. ग्रामपंचायतीने संबंधित जागेचा ठराव तालुका प्रशासनाला पाठविला आहे़ यासंदर्भात पंचायत समितीने अहवाल सादर केला़ परंतु ले-आऊट मंजूर करण्यात महसूल प्रशासनाची लेटलतीफची भूमिका आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जागेसंदर्भात प्रकरणच पाठविता येत नसल्याची माहिती आहे. जळगाव आर्वी येथील अनेकांचे घरकूल मंजूर आहेत़ गावात जागाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे मात्र, अनेक दिवसांपासून ही प्रकरणे महसूल विभागात धूळखात पडले आहेत. सभापती- उपसभापतींनी कंबर कसली४तालुक्यातील लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून पं.स.सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख वारंवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठपुरावा करीत आहेत. तालुक्यावर होणारा अन्याय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा दूर करीत नसेल तर या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा ईशारा राजनकर व देशमुख यांनी दिला आहे घरकूल पूर्ण होणार कसे ?४गोरगरिबांसाठी केंद्र शासनाने इंदिरा आवास योजना सुरू केली़ १२ बाय १२ च्या दोन खोल्या २६९ चौरस फूट बांधकामाकरिता ९५ हजार रूपये या योजनेंतर्गत दिले जातात. मात्र, या अल्प रकमेत घरकूल कसे साकारणार? हाच खरा प्रश्न आहे. शिवाय हे अनुदानसुध्दा वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे ४धामणगाव तालुका अनेक वर्षांपासून इंदिरा आवास तसेच इतर घरकूल योजनांपासून लाभार्थी वंचित आहेत़ हक्काच्या घरासाठी येथील लोकप्रतिनिधी लढत आहेत. अनेक दिवसांपासून बीपीएल यादीचा घोळ कायम आहे़ प्रतीक्षा यादी मोठी आणि तालुक्याला मिळणाऱ्या घरकुलांची संख्या कमी असल्याने आता पालकमंत्र्यांनी या तालुक्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे़