शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पीक विम्याची प्रतीक्षा

By admin | Updated: February 26, 2016 00:29 IST

सध्याची पीक विमा योजना प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या निकषांवर आधारित असून यातील निकष शेतकऱ्यांसाठी जाचक असल्याने केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय पीक विमा योजनेची घोषणा केली आहे.

परिपत्रक अद्याप निघाले नाही : कृषी अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये नव्या निकषांबाबत उत्सुकता अमरावती : सध्याची पीक विमा योजना प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या निकषांवर आधारित असून यातील निकष शेतकऱ्यांसाठी जाचक असल्याने केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय पीक विमा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची जाहिरातबाजी सुरू असली तरी प्रत्यक्षात याचे परिपत्रक अजूनही निघालेले नाही. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांसह शेतकरीही सुधारित राष्ट्रीय पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. नैसर्गिक लहरीत शेतीला हवामानाचा फटका बसतो. अशा स्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने कृषिपीक विमा योजना सुरू केली. मात्र योजनेचे निकष शेतकऱ्यांसाठी याचक व विमा कंपन्यासाठी पोषक असल्याचा आक्षेप आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तर हे निकष नेहमीच अडचणीचे ठरले आहेत. पिकांचे नुकसान एकूण सरासरीच्या ८० टक्कयांपेक्षा अधिक असल्याशिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हफ्त्यापोटी भरलेली रक्कमही बुडीत जाते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. या जाचक निकषांमुळे सन २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याने पीक विम्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज भरला नाही. रब्बी हंगामासाठी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत मुदत शेतकऱ्यांना होती. मात्र एकाही शेतकऱ्याने रबीसाठी अर्ज भरला नाही. दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराई आदी कारणांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकरी ज्या महसूल मंडळातील आहे. त्या मंडळाच्या सरासरी नुकसानीच्या आकडेवारीवर शेतकऱ्यांचे नुकसान अवलंबून होते. या पद्धतीमुळे एखाद्या शेतकऱ्यांचे ९० टक्के नुकसान झाले असले तरीही त्याला पीक विम्याचा फायदा होत नव्हता. यासाठी सुधारित राष्ट्रीय पीक विमा योजनेत प्रत्येक गावातील उंबरठानिहाय पाहणी केली जाईल. याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यासह शेतकरीही सुधारित पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)