शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

कापसाला ६ हजार रूपये क्विंटल दराची प्रतिक्षा

By admin | Updated: March 1, 2017 00:02 IST

खरीप हंगामाच्या शेवटी पांढऱ्या सोन्याच्या दरात वाढ होईल, ही शक्यता फेब्रुवारीच्या अखेरीस मावळली आहे.

कापूस घरीच : ५,७०० वर स्थिरावला दरअमरावती: खरीप हंगामाच्या शेवटी पांढऱ्या सोन्याच्या दरात वाढ होईल, ही शक्यता फेब्रुवारीच्या अखेरीस मावळली आहे. जिल्ह्याचा विचार करता शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही हजारो क्विंटल विक्री विना पडला असून शेतकऱ्यांना २०० ते ३०० प्रतिक्विंटल दर वाढीची अपेक्षा आहे. तुर्तास खुल्या बाजारात कापसाचा प्रतिक्विंटल दर ५ हजार २०० ते ५ हजार ७०० आसपास आहे.यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने कापसाचे उत्पादन वाढेल तदवतच दरामध्येही वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गामधून व्यक्त होऊ लागली होती.कापसाचे सरासरी उत्पादन वाढले खरे मात्र दरात अपेक्षेनुरूप वाढ झाली नाही. यंदा सहा हजारावर पोहचेल अशी अपेक्षा होती.तथापी २८ फेब्रुवारी ला अमरावती शहर बाजारात कापसाची खरेदी प्रतिक्विंटल ५ हजार ७२५ रूपयांनी करण्यात आली.यात सुमारे दोनशे ते अडीचशे रूपयाची वाढ अपेक्षीत आहे.कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या हाती येत असलेला कापसाचा दर हमी भावापेक्षा अधिक असल्याने यंदा ओरड झाली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी ५ हजार ९०० रूपया प्रमाणे कापूस विकला आहे.५ हजार ९०० रूपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या भाव वाढीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढण्याची अपेक्षा कापूस विक्रीला ब्रेक दिला आहे.ही तेजी आणखी किती दिवस राहील याचा नेम नाही. यामुळे असलेला भाव पुन्हा वाढेल कि पडेल या बाबतहीसाशंकता आहे. परिणामी शेतकऱ्यांनी कापसाला सहा हजार रूपये दराची अपेक्षा अद्याप तरी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. खासगीत सध्या कापसाला ५ हजार ८०० रूपये दर आहे. कापसाची कमी भावात विक्री यंदा कापसाचे पीक समाधानकारक झाले आहे. शेतकऱ्यांना पैशाचीचणचण असल्यामुळे त्यांची अडचण लक्षात घेत व्यापारी अगदी कमी भावात कापुस खरेदी करित आहेत. जिल्ह्यात शासकीय कापुस खरेदी केंद्रही कमी आहेत. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना घरून कापुस विकतात. शेतकऱ्याकडून घेतलेला कापूस ५,२०० ते ५, ५०० रूपयात घेतलेला कापूस बाजारात यापेक्षाही चढयादराने विकतात त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गळचेपी होत आहे. सध्या कापसाला सध्या असलेला ५ हजार ८०० रूपये भाव हमीभावा पेक्षा उत्तम आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकावा.उन्हाळा सुरू झाल्याने कापसातील ओलावा कमी होवून वजन घटणार आहे. त्यामुळे भविष्यात भाव वाढले तरी आर्थिक नुकसान होऊ शकते.- एन.पी. हिराणीअध्यक्ष, कापूृस पणन महासंघशासकीय खरेदी शून्यबाजारात कापसाला मिळत असलेला दर हमीभावापेक्षा अधिक आहे. यामुळे शासकीय खरेदीला अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी कापूस पणन महासंघ आणि सीसीआयची खरेदी अवघ्या काही क्विंटलवर स्थिरावली आहे.घराघरात कापसाच्या गंज्याजिल्ह्यातील काही सधन शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतिक्षेत कापुस अद्याप घरीच ठेवला आहे. त्यांना कापसाला येत्या दिवसात सहा हजार रूपये दर मिळतील अशी अपेक्षा आहे.