शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

कापसाला ६ हजार रूपये क्विंटल दराची प्रतिक्षा

By admin | Updated: March 1, 2017 00:02 IST

खरीप हंगामाच्या शेवटी पांढऱ्या सोन्याच्या दरात वाढ होईल, ही शक्यता फेब्रुवारीच्या अखेरीस मावळली आहे.

कापूस घरीच : ५,७०० वर स्थिरावला दरअमरावती: खरीप हंगामाच्या शेवटी पांढऱ्या सोन्याच्या दरात वाढ होईल, ही शक्यता फेब्रुवारीच्या अखेरीस मावळली आहे. जिल्ह्याचा विचार करता शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही हजारो क्विंटल विक्री विना पडला असून शेतकऱ्यांना २०० ते ३०० प्रतिक्विंटल दर वाढीची अपेक्षा आहे. तुर्तास खुल्या बाजारात कापसाचा प्रतिक्विंटल दर ५ हजार २०० ते ५ हजार ७०० आसपास आहे.यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने कापसाचे उत्पादन वाढेल तदवतच दरामध्येही वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गामधून व्यक्त होऊ लागली होती.कापसाचे सरासरी उत्पादन वाढले खरे मात्र दरात अपेक्षेनुरूप वाढ झाली नाही. यंदा सहा हजारावर पोहचेल अशी अपेक्षा होती.तथापी २८ फेब्रुवारी ला अमरावती शहर बाजारात कापसाची खरेदी प्रतिक्विंटल ५ हजार ७२५ रूपयांनी करण्यात आली.यात सुमारे दोनशे ते अडीचशे रूपयाची वाढ अपेक्षीत आहे.कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या हाती येत असलेला कापसाचा दर हमी भावापेक्षा अधिक असल्याने यंदा ओरड झाली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी ५ हजार ९०० रूपया प्रमाणे कापूस विकला आहे.५ हजार ९०० रूपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या भाव वाढीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढण्याची अपेक्षा कापूस विक्रीला ब्रेक दिला आहे.ही तेजी आणखी किती दिवस राहील याचा नेम नाही. यामुळे असलेला भाव पुन्हा वाढेल कि पडेल या बाबतहीसाशंकता आहे. परिणामी शेतकऱ्यांनी कापसाला सहा हजार रूपये दराची अपेक्षा अद्याप तरी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. खासगीत सध्या कापसाला ५ हजार ८०० रूपये दर आहे. कापसाची कमी भावात विक्री यंदा कापसाचे पीक समाधानकारक झाले आहे. शेतकऱ्यांना पैशाचीचणचण असल्यामुळे त्यांची अडचण लक्षात घेत व्यापारी अगदी कमी भावात कापुस खरेदी करित आहेत. जिल्ह्यात शासकीय कापुस खरेदी केंद्रही कमी आहेत. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना घरून कापुस विकतात. शेतकऱ्याकडून घेतलेला कापूस ५,२०० ते ५, ५०० रूपयात घेतलेला कापूस बाजारात यापेक्षाही चढयादराने विकतात त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गळचेपी होत आहे. सध्या कापसाला सध्या असलेला ५ हजार ८०० रूपये भाव हमीभावा पेक्षा उत्तम आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकावा.उन्हाळा सुरू झाल्याने कापसातील ओलावा कमी होवून वजन घटणार आहे. त्यामुळे भविष्यात भाव वाढले तरी आर्थिक नुकसान होऊ शकते.- एन.पी. हिराणीअध्यक्ष, कापूृस पणन महासंघशासकीय खरेदी शून्यबाजारात कापसाला मिळत असलेला दर हमीभावापेक्षा अधिक आहे. यामुळे शासकीय खरेदीला अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी कापूस पणन महासंघ आणि सीसीआयची खरेदी अवघ्या काही क्विंटलवर स्थिरावली आहे.घराघरात कापसाच्या गंज्याजिल्ह्यातील काही सधन शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतिक्षेत कापुस अद्याप घरीच ठेवला आहे. त्यांना कापसाला येत्या दिवसात सहा हजार रूपये दर मिळतील अशी अपेक्षा आहे.