शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

अचलपूरमध्ये कोरोना रुग्ण बेडच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 05:00 IST

घरी परतलेल्या या रुग्णांंसह त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शहरी भागासह ग्रामीण भागात मुक्त संचार सुरू आहे. कोरोनाचा प्रसार करण्यास ते कारणीभूत ठरत आहेत.  अचलपूर तालुक्यातील परतवाडा शहरातील डेडिकेटेड कोविड रुगणालयात ७० बेड, आंबेडकर वसतिगृहात ८० बेड आणि धारणी रोडवरील बुरडघाट येथील कोविड सेंटरमध्ये १०० बेड आहेत. पण, वाढत्या रुग्णांपुढे ही व्यवस्था कमी पडत आहे. यात कोरोना रुग्ण बेड न मिळाल्यामुळे भटकत आहेत. औषधोपचारापासून वंचित राहत आहेत.

ठळक मुद्देरुणालयात खाटांच्या अनुपलब्धतेेने संक्रमितांचा मुक्त संचार, लस घेऊनही वैद्यकीय अधिकारी बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा :  अचलपूर तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज शहरी आणि ग्रामीण मिळून शंभर ते सव्वाशे रुग्ण निघत आहेत. यात अस्तित्वात असलेली आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. आपल्याला बेड मिळेल, या आशेने कोविड रुग्णालयासह  कोविड सेंटरवर ते गर्दी करीत आहेत. बेडकरिता त्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रतीक्षेनंतरही बेड न मिळाल्यामुळे नाईलाजाने त्यांना घरी परतावे लागत आहे. घरी परतलेल्या या रुग्णांंसह त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शहरी भागासह ग्रामीण भागात मुक्त संचार सुरू आहे. कोरोनाचा प्रसार करण्यास ते कारणीभूत ठरत आहेत.  अचलपूर तालुक्यातील परतवाडा शहरातील डेडिकेटेड कोविड रुगणालयात ७० बेड, आंबेडकर वसतिगृहात ८० बेड आणि धारणी रोडवरील बुरडघाट येथील कोविड सेंटरमध्ये १०० बेड आहेत. पण, वाढत्या रुग्णांपुढे ही व्यवस्था कमी पडत आहे. यात कोरोना रुग्ण बेड न मिळाल्यामुळे भटकत आहेत. औषधोपचारापासून वंचित राहत आहेत.दरम्यान, कोविड रुग्णालयासह कोविड सेंटरला औषधांचा तुटवडा जाणवत आहे. आवश्यक त्या औषधी रुग्णांना मिळत नाहीत. दिल्या जात नाहीत, तर औषधांचा पुरवठा मागणीनुसार केला जात नाही.   यामुळे औषध कमी पडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी हयगय त्यांच्या जिवावर उठणारे ठरू शकते. 

तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सुन्नअचलपूर नगर परिषदेच्या यंत्रणेकडून शहरातील संक्रमितांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. नुसता बोलाचाच भात नि बोलाचीच कढी अन् प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलला नगर परिषदेची कुठलीच यंत्रणा कार्यरत नाही.  कोविड रुग्णालयात किंवा कोविड सेंटरला रुग्ण पाठवताना त्या ठिकाणी बेड उपलब्ध आहेत किंवा नाही, याची खातरजमा संबंधित यंत्रणेकडून केली जात नाही. ही यंत्रणा सरळ कोरोना रुग्णांना चिठ्ठी देऊन केंद्रावर किंवा रुग्णालयात पाठविते.  कशी तरी व्यवस्था करून ते रुग्ण ती चिठ्ठी घेऊन त्या रुग्णालयात किंवा कोविड सेंटरला पोहोचतात. पण, तेथे त्यांना बेड उपलब्ध होत नाहीत.  

पालिकेचे क्वारंटाईन सेंटर केव्हा?नगरपालिकेने या कोरोना महामारीत अद्याप आपले क्वारंटाईन सेंटर सुरू केलेले नाहीत. कोरोनाच्या पहिल्या टर्ममध्ये अचलपूर नगर परिषदेकडून तीन क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले होते. आज हे क्वारंटाईन सेंटर नव्याने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातच अचलपूर तालुका वैद्यकीय अधिकारी दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित झाल्या. कोरोना लसींचे दोन डोज झाल्यानंतर त्या कोरोना संक्रमित आल्या आहेत. यात त्या २३ मेपर्यंत सुटीवर असल्याची  सूत्राची माहिती आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या