शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प ठरणार विदर्भासाठी उपलब्धी, हैदराबादच्या राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 16:11 IST

अमरावती- पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भात अतितुटीच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला प्रकल्प विदर्भासाठी संजीवनी ठरणार आहे.

गजानन मोहोडअमरावती- पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भात अतितुटीच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला प्रकल्प विदर्भासाठी संजीवनी ठरणार आहे. ना. नितीन गडकरी यांच्या अखत्यारीतील मंत्रालयांतर्गत ४४० किमी लांबीचा हा प्रकल्प विदर्भातील सहा जिल्ह्यांत मार्गक्रमित होऊन बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात सोडण्याचे प्रस्तावित आहे.२५ राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार १९१२ दलघमी पाणी विचारात घेऊन वैनगंगा ते नळगंगा नदी जोड कालव्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल हैदराबाद येथील राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण (एनडब्लूडीए)द्वारा तयार करण्यात येत आहे. एकूण ४४० किमी लांबीचा हा जोड कालवा गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या तिरावरून सुरू होऊन त्याची संरेखा भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व अकोला या जिल्ह्यांतून मार्गक्रमित होऊन शेवटी बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पस्थळी सोडण्याचे नियोजन आहे. यापूर्वीच झालेल्या एनडब्लूडीएचे मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीत विदर्भातील जलसंपदा विभागाच्या बैठकीत या जोड कालवा प्रकल्पाला अंशत: मान्यता देण्यात आली आहे.गोसीखुर्द ते काटेपूर्णा प्रकल्पापर्यंतच्या ३०८ किमीच्या जोड कालव्याचे सर्वेक्षण एनडब्लुडीएद्वारा पूर्ण झालेले आहे. या जोड कालव्याची अमरावती जिल्ह्यात लांबी ९० किमीची आहे. यामध्ये निम्न वर्धा प्रकल्पाजवळ ५० किमीची लिफ्ट प्रस्तावित आहे, तर २३८ ते ४४० किमी दरम्यानची लांबी अकोला व बुलडाणा जिल्ह्यात आहे. यामध्ये काटेपूर्णा प्रकल्पाजवळ २७ मीटर उंचीची लिफ्ट राहणार आहे. या प्रकल्पात अमरावतीच्या जिल्ह्यात ९० किमी लांबीच्या दरम्यान आठ साठवण तलाव प्रस्तावित आहेत. या साठवण तलावामध्ये ४६२. ७८ दलघमी साठ्याच्या माध्यमातून अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील २०२ किमी लांबीच्या अंतरात सहा साठवण तलावांतील ३९६.३७ दलघमी साठ्याच्या माध्यमातून ३४ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.३०८ किमी लांबीचे संरेखा सर्वेक्षण पूर्णराष्ट्रीय जलविकास प्राधिकरण, हैदराबादद्वारा साखळी क्रमांक ३०८ किमी पर्यंतच्या जोड कालव्याच्या साखळी क्र. ३०८ पर्यंतचे संरेखा सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४४० किमीपर्यंत म्हणजेच नळगंगापर्यंतच्या संरेखाला ७ जानेवारीला झालेल्या मुख्य अभियंत्याच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. जोड कालव्याच्या बाजूला असलेल्या कालव्यातून उपलब्ध होणा-या पाण्यामधून रबीच्या सिंचनासाठी पाणीसाठा निर्माण करण्यासाठी मंडळांतर्गत सर्वेक्षण अन्वेषण विभागास मानचित्र तयार करून स्थळे निश्चितीसाठी सांगण्यात आले आहे.केंद्राच्या अखत्यारीतील हा नदीजोड प्रकल्प पश्चिम विदर्भासाठी नवसंजीवनी देणारा असल्याची चर्चा रविवारी ना.नितीन गडकरी यांच्याशी झाली. प्रकल्पाची किंमतवाढ झाल्याने यावर तोडगा काढला जाईल, गडकरी यांनी सांगितले.- निवेदिता चौधरी,प्रदेश सचिव, भाजपा

टॅग्स :Amravatiअमरावती