शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीची दहशत कायम, कामाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:20 IST

तालुक्यात दहशत परसरविणारी ‘सी-वन’ नावाची वाघीण नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या जंगलात तळ ठोकून आहे.

ठळक मुद्देशेतकºयांमध्ये संताप : बंदोबस्त करण्याची मागणी, अधिकारी म्हणतात आता भीती कसली ?

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यात दहशत परसरविणारी ‘सी-वन’ नावाची वाघीण नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या जंगलात तळ ठोकून आहे. मात्र संपूर्ण वरूड तालुक्यात अजूनही भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मागील सात दिवसांपासून शेतकरी शेताकडे फिरकलेच नाहीत. यामुळे सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांची वाताहत होत आहे. शेतकºयांचा संताप अनावर होत असून वाघिणीसह वन्यप्राण्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी केली जात आहे.बोर अभ्यारण्यातील नरभक्षी वाघीण आष्टीच्या जंगलातून वरूड तालुक्यात आली. गाय व कालवडीचा फडशा पाडल्यावर एका महिलेला ठार केले. यानंतर वनविभागाने याची गांभीर्याने दखल घेत 'सर्च आॅपरेशन' सुरू केले. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी हैदराबादवरून विशेष टीम बोलाविण्यात आली. या टीमचे नेतृत्व शेख नवाब अली खान हे करीत होते. या चमुकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असून नरभक्षी, पिसाळलेल्या वन्यपशुंना जेरबंद करण्यात त्यांचा हातखंडा आहे, असेही सांगण्यात आले. वरूड तालुक्यातील घोराड शेतशिवारात दोन दिवस वाघीण तळ ठोकून होती. या दोन दिवसांत वाघिणीला जेरबंद करण्यात अपयश आल्यानंतर शेतकºयांचा संताप उफाळून आला आहे. मागील सात दिवसांपासून घोराड, ढगा, डवरगाव शिवारातील शेतकरी शेतात जाण्यास धाजवत नाहीये. यामुळे सोयाबीनची मळणीची कामे अडकून पडलेली आहेत.विद्यार्थ्यांमध्ये भीती कायमवाघिणीने नागपूर जिल्ह्यात पलायन केले असले तरी तालुक्यातील शेतमजूर, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांच्या मनातून ती भीती निघालेली नसल्यामुळे भय कायमच आहे. यामुळे शाळामध्येसद्धा विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. सोमवारपासून या भागातील विद्यार्थी नियमित शाळेत येतील, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.ओलिताचा प्रश्न कायम !वाघिणीच्या भीतीने शेतकरी शेतात जात नाहीत. कपाशी, संत्रा, सोयाबीन, मिरची व अन्य भाजीपिकांना फटका बसत आहे. भारनियमनामुळे रात्री ओलित करणारे शेतकरी शेतात जात नसल्याने या भागात दिवसा वीज देण्याची मागणी होत आहे. जनावरे जंगलात चराईसाठी पाठविली जात नसल्याने चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.वाघिणीला मारणार नाही, हुसकवून लावणारमानवी वस्तीत शिरलेल्या वाघिणीला ठार करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर यासंदर्भात अनेक मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहे. तिला हुसकावून लावणे सर्वांत सोपे आहे. तिचे लोकेशन रस्क्यू पथकाला ट्रेस होत आहे. फटाके फोडून तिला पळवून लावण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे.वनविभागाचे रेस्क्यू पथक २४ तास लोकेशननुसार तिच्या मागावर असल्याने ती आपल्या तालुक्यात नाही. यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. तरीदेखील बचावाकरिता हातात काठी असू द्यावी. वन्यप्राणी आढळल्यास तत्काळ वनविभाग, पोलीस पाटील, तलाठी यांना माहिती द्यावी.- राजेंद्र बोंडे, सहायक वनसरंक्षक, वरूडवाघ जरी या परिसरात नसला तरीदेखील वाघाची दहशत कायम आहे. मजूर कामावर येण्यास नकार देत आहेत. शेतमजुरांच्या मनातील भीती निघालेली नाही. ही पिक ांची मळणी करण्याची वेळ आहे. त्यामुळे नुकसान होत आहे.उत्तम आलोडे, शेतकरीवाघाला लोकांना पाहिल्याने त्यांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वाघ परत येऊ शकतो. यातही एका महिलेला ठार केल्यामुळे भिती वाढली आहे. वाघीण मानसांचा शिकार करते ही घटना ताजी आहेच. वनविभागाने नागरिक ांना आश्वस्त करण्याची गरज आहे.- राजेंद्र पाटील, शेतकरी