शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

वाघिणीची दहशत कायम, कामाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:20 IST

तालुक्यात दहशत परसरविणारी ‘सी-वन’ नावाची वाघीण नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या जंगलात तळ ठोकून आहे.

ठळक मुद्देशेतकºयांमध्ये संताप : बंदोबस्त करण्याची मागणी, अधिकारी म्हणतात आता भीती कसली ?

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यात दहशत परसरविणारी ‘सी-वन’ नावाची वाघीण नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या जंगलात तळ ठोकून आहे. मात्र संपूर्ण वरूड तालुक्यात अजूनही भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मागील सात दिवसांपासून शेतकरी शेताकडे फिरकलेच नाहीत. यामुळे सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांची वाताहत होत आहे. शेतकºयांचा संताप अनावर होत असून वाघिणीसह वन्यप्राण्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी केली जात आहे.बोर अभ्यारण्यातील नरभक्षी वाघीण आष्टीच्या जंगलातून वरूड तालुक्यात आली. गाय व कालवडीचा फडशा पाडल्यावर एका महिलेला ठार केले. यानंतर वनविभागाने याची गांभीर्याने दखल घेत 'सर्च आॅपरेशन' सुरू केले. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी हैदराबादवरून विशेष टीम बोलाविण्यात आली. या टीमचे नेतृत्व शेख नवाब अली खान हे करीत होते. या चमुकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असून नरभक्षी, पिसाळलेल्या वन्यपशुंना जेरबंद करण्यात त्यांचा हातखंडा आहे, असेही सांगण्यात आले. वरूड तालुक्यातील घोराड शेतशिवारात दोन दिवस वाघीण तळ ठोकून होती. या दोन दिवसांत वाघिणीला जेरबंद करण्यात अपयश आल्यानंतर शेतकºयांचा संताप उफाळून आला आहे. मागील सात दिवसांपासून घोराड, ढगा, डवरगाव शिवारातील शेतकरी शेतात जाण्यास धाजवत नाहीये. यामुळे सोयाबीनची मळणीची कामे अडकून पडलेली आहेत.विद्यार्थ्यांमध्ये भीती कायमवाघिणीने नागपूर जिल्ह्यात पलायन केले असले तरी तालुक्यातील शेतमजूर, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांच्या मनातून ती भीती निघालेली नसल्यामुळे भय कायमच आहे. यामुळे शाळामध्येसद्धा विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. सोमवारपासून या भागातील विद्यार्थी नियमित शाळेत येतील, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.ओलिताचा प्रश्न कायम !वाघिणीच्या भीतीने शेतकरी शेतात जात नाहीत. कपाशी, संत्रा, सोयाबीन, मिरची व अन्य भाजीपिकांना फटका बसत आहे. भारनियमनामुळे रात्री ओलित करणारे शेतकरी शेतात जात नसल्याने या भागात दिवसा वीज देण्याची मागणी होत आहे. जनावरे जंगलात चराईसाठी पाठविली जात नसल्याने चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.वाघिणीला मारणार नाही, हुसकवून लावणारमानवी वस्तीत शिरलेल्या वाघिणीला ठार करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर यासंदर्भात अनेक मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहे. तिला हुसकावून लावणे सर्वांत सोपे आहे. तिचे लोकेशन रस्क्यू पथकाला ट्रेस होत आहे. फटाके फोडून तिला पळवून लावण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे.वनविभागाचे रेस्क्यू पथक २४ तास लोकेशननुसार तिच्या मागावर असल्याने ती आपल्या तालुक्यात नाही. यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. तरीदेखील बचावाकरिता हातात काठी असू द्यावी. वन्यप्राणी आढळल्यास तत्काळ वनविभाग, पोलीस पाटील, तलाठी यांना माहिती द्यावी.- राजेंद्र बोंडे, सहायक वनसरंक्षक, वरूडवाघ जरी या परिसरात नसला तरीदेखील वाघाची दहशत कायम आहे. मजूर कामावर येण्यास नकार देत आहेत. शेतमजुरांच्या मनातील भीती निघालेली नाही. ही पिक ांची मळणी करण्याची वेळ आहे. त्यामुळे नुकसान होत आहे.उत्तम आलोडे, शेतकरीवाघाला लोकांना पाहिल्याने त्यांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वाघ परत येऊ शकतो. यातही एका महिलेला ठार केल्यामुळे भिती वाढली आहे. वाघीण मानसांचा शिकार करते ही घटना ताजी आहेच. वनविभागाने नागरिक ांना आश्वस्त करण्याची गरज आहे.- राजेंद्र पाटील, शेतकरी