शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

नांदुरा येथे संत चापालाल महाराजांची यात्रा

By admin | Updated: March 1, 2015 00:21 IST

मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गडाच्या पायथ्याशी वसलेल्या नांदुरा येथे २३ व २४ फेब्रुवारी रोजी संत चापालाल महाराजांची यात्रा भरली होती.

अमरावती : मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गडाच्या पायथ्याशी वसलेल्या नांदुरा येथे २३ व २४ फेब्रुवारी रोजी संत चापालाल महाराजांची यात्रा भरली होती. यामध्ये अमरावती व वर्धा जिल्ह्यातील ३६ तांड्यांचे बंजारा भाविक सहभागी झाले. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.विदर्भात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांची उत्पत्ती राजस्थानातील असल्याचे जाणकारांचे मत आहे. शेकडो वर्षांपूर्वी वऱ्हाड प्रांतात येताना 'लदणी' लादत डफडी वाजवीत त्यांचे आगमन झाले. त्यानंतर तांडे करून हा समाज विविध ठिकाणी वास्तव्य करू लागला. गोपालन त्यांचा मुख्य व्यवसाय. गरांना ज्या भागात चाऱ्याची सोय होऊ शकेल अशा ठिकाणी जावे लागत असल्याने या समाजाला भटक्या जमातीत स्थान मिळाले. त्यांचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज व संत चापालाल महाराज होय. हे दोन्ही संत एकाच शतकात विदर्भात वास्तव्याला आले होते. त्यांचा व्यवसाय गोपालन व रसद पुरविणे हा होता. तेव्हा संत चापालाल महाराज गाई चारत असत. कालांतराने त्यांची संत सेवालाल महाराजांशी भेट झाली. विशेष म्हणजे हे दोन्ही संत सन्याशी होते. त्यांनी केवळ समाजाच्या सेवार्थ कार्य केले. त्यामुळे समाजाचे ते दैवत बनले. त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित राहण्यासाठी संत सेवालाल व संत चापालाल महाराजांनी सीमा आखून दिली होती. ती अशी की, बेंबळा नदीच्या पलीकडील भागातील बंजारा समाज हा संत सेवालाल तीर्थस्थळी पोहरा देवी (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) येथील नियोजित कार्यक्रमात सहभागी होतील, तर बेंबळा नदीच्या अलीकडील भागात वास्तव्याला असलेला बंजारा समाज संत चापालाल महाराजांच्या पुन्यतिथी-जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होणार, असे ठरविण्यात आले होते. त्यानुसार रामनवमीच्या दिवशी संत सेवालाल महाराजांची जयंती पोहरा देवी येथे साजरी केली जाते. बंजारा संस्कृतीतील विविध कार्यक्रम पार पडतात. त्याचप्रमाणे मोर्शी तालुक्यतील पिंगळादेवी गडाच्या पायथ्याशी वसलेले नांदुरा येथे संत चापालाल महाराजांची पुण्यतिथी महाशिवरात्रीनंतर पाचव्या दिवशी आयोजित करण्यात येते. येथे पहिल्या दिवशी भजनी दिंड्यांचे आगमन, भजन कार्यक्रम होते. महाप्रसादाचा कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी बोकड पूजेचा कार्यक्रम नियमित होतो. येथे बोकडांचा बळी देऊन देवाचे नवस फेडण्याची परंपरा आजही कायम आहे. या दोन दिवसांत येथे हजारो नागरिकांची उपस्थिती राहत असून मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजात एकोप्याची भावना कायम राहावी. या उद्देशाने तिवसा मतदार संघाच्या आ. यशोमती ठाकूर यांनी या ठिकाणी भाविकांना सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून मोठे समाजभवन उभारले आहे. पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच मोर्शीचे आ. अनिल बोंडे यांनीकेधील विकास कार्य केले आहेत. तसेच कार्यक्रमाचे नियोजन ठेवण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. चिरोडीचे रमेश राठोड ट्रस्टचे अध्यक्ष, तर उपाध्यक्ष म्हणून शेंदोळा येथील जग्गू महाराज आहेत. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असताना कुठलीही अनुचित घटना घडली नाही. भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.