शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

चांदूररेल्वे बाजार समितीवर वीरेंद्र जगताप गटाचे वर्चस्व

By admin | Updated: August 21, 2015 00:46 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीतील उमेदवारांची मतमोजणी बुधवारी पार पडली.

सर्वच १८ संचालक विजयी : परिवर्तन पॅनेलचा सफायाचांदूररेल्वे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीतील उमेदवारांची मतमोजणी बुधवारी पार पडली. यामध्ये सर्वच १८ संचालक काँग्रेसप्रणित आ. वीरेंद्र जगताप यांच्या समता पॅनेलचे विजयी झालेत. १५ वर्षांपासूनची सत्ता अबाधित राखण्यात या गटाला यश आले आहे. या बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-राकाँ यांनी एकत्र येऊन परिवर्तन पॅनेल तयार केला आहे. या पॅनेलचे नेतृत्व माजी आ. अरुण अडसड व दिलीप गिरासे यांचेकडे होते. या बाजार समितीच्या निवडणुकीत काही ज्येष्ठ सहकार नेत्यांनी उमेदवारी दाखल केली होती. परंतु या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने सेवा सहकारी, ग्रामपंचायत, व्यापारी मतदारसंघात एकास एक अशी सरळ लढत होती. यामुळे निवडणुकीत काय होणार व कोणाच्या बाजूने निकाल लागणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी के.पी. धोपे यांच्या उपस्थितीत आनंदराव सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला. हमाल व मोपारी मतदारसंघात प्रदीप गोविंदराव गुजर १९ मते घेऊन विजयी झाले. व्यापारी व अडते मतदारसंघात दिलीप मुंधडा, राजकुमार जालान विजयी झालेत. ग्रामपंचायत मतदारसंघात रविकांत देशमुख, वैशाली ठाकरे विजयी झाल्यात. अनुसूचित अनु. जमाती मतदारसंघात हरिभाऊ गवई, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघात भानुदास गावंडे विजयी झालेत. सेवा सहकारी कृषी पत संस्था मतदारसंघात अशोक चौधरी, प्रदीप वाघ, रवींद्र देशमुख, प्रभाकरराव वाघ, प्रदीप रामराव जगताप, अतुल चांडक, मंगेश धावडे हे उमेदवार विजयी झालेत. महिला राखीव मतदारसंघात सुनीता विनोद काळमेघ, सविता अनिल देशमुख व इतर मागासवर्ग मतदारसंघात प्रवीण घुईखेडकर, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात रमेश महात्मे विजयी झालेत. मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त होता. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती के.पी. धोपे यांच्या मार्गदर्शनात कावडकर, लेंदे, दहीकर, गायकवाड, वाघमारे यांनी चोख व्यवस्था सांभाळल्याने मतमोजणी शांततेत पार पडली. सर्वच १८ जागांवर विजय संपादन केल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत शहरातून फटाक्याच्या आतषबाजीत धडक मिरवणूक काढण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)