शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

वीरेंद्र जगताप, बच्चू कडूंची हॅट्ट्रिक

By admin | Updated: October 19, 2014 23:15 IST

यंदाची विधानसभा निवडणूक एकंदरच ऐतिहासिक ठरली. अमरावती जिल्ह्यातही अनेक विस्मयकारक घडामोडी घडल्या. ऐनवेळी बदललेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघातील अपक्ष

अमरावती : यंदाची विधानसभा निवडणूक एकंदरच ऐतिहासिक ठरली. अमरावती जिल्ह्यातही अनेक विस्मयकारक घडामोडी घडल्या. ऐनवेळी बदललेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बच्चू कडू आणि धामणगाव-चांदूररेल्वे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी केलेली विजयाची हॅट्ट्रिक आश्चर्यजनकच म्हणावी लागेल. यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी होती. महायुती-आघाडीत झालेली ताणातुणी आणि त्यानंतर सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय हे या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. युती-आघाडीची शकले पडली आणि पक्षांतराला पेव फुटले. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाने दुखावलेल्या अनेकांनी पक्षांतर केले. त्यामुळे निवडणुकीचा चेहराच स्पष्ट होत नव्हता. त्यात मोदींची लाट असल्याने भाजपच्या उमेदवारांमध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. अशा स्थितीत अचलपूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या बच्चू कडू यांच्यासाठी ही निवडणूूक काही सोपी नव्हती. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या सुरेखाताई ठाकरे, काँग्रेसच्या माजी मंत्री असलेल्या आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंंगणात उतरलेल्या वसुधा देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, भाजपचे अशोक बनसोेड यांचे आव्हान बच्चू कडूंना पेलायचे होते. एकंदरीत भाजपची लाट लक्षात घेता बच्चू कडूंना त्यांचा गड राखता येणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. पण, भाजपच्या अशोक बनसोड यांना कडवी झुंज देत अपक्ष बच्चू कडूंनी या मतदारसंघावर तिसऱ्यांदा आपला झेंडा रोवला. सोबतच कोणत्याही आमदाराला तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी न देण्याची या मतदारसंघाची परंपराही बच्चू कडू यांनी मोडीत काढली. (प्रतिनिधी)