शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

वीरेंद्र जगताप, बच्चू कडूंची हॅट्ट्रिक

By admin | Updated: October 19, 2014 23:15 IST

यंदाची विधानसभा निवडणूक एकंदरच ऐतिहासिक ठरली. अमरावती जिल्ह्यातही अनेक विस्मयकारक घडामोडी घडल्या. ऐनवेळी बदललेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघातील अपक्ष

अमरावती : यंदाची विधानसभा निवडणूक एकंदरच ऐतिहासिक ठरली. अमरावती जिल्ह्यातही अनेक विस्मयकारक घडामोडी घडल्या. ऐनवेळी बदललेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बच्चू कडू आणि धामणगाव-चांदूररेल्वे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी केलेली विजयाची हॅट्ट्रिक आश्चर्यजनकच म्हणावी लागेल. यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी होती. महायुती-आघाडीत झालेली ताणातुणी आणि त्यानंतर सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय हे या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. युती-आघाडीची शकले पडली आणि पक्षांतराला पेव फुटले. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाने दुखावलेल्या अनेकांनी पक्षांतर केले. त्यामुळे निवडणुकीचा चेहराच स्पष्ट होत नव्हता. त्यात मोदींची लाट असल्याने भाजपच्या उमेदवारांमध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. अशा स्थितीत अचलपूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या बच्चू कडू यांच्यासाठी ही निवडणूूक काही सोपी नव्हती. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या सुरेखाताई ठाकरे, काँग्रेसच्या माजी मंत्री असलेल्या आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंंगणात उतरलेल्या वसुधा देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, भाजपचे अशोक बनसोेड यांचे आव्हान बच्चू कडूंना पेलायचे होते. एकंदरीत भाजपची लाट लक्षात घेता बच्चू कडूंना त्यांचा गड राखता येणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. पण, भाजपच्या अशोक बनसोड यांना कडवी झुंज देत अपक्ष बच्चू कडूंनी या मतदारसंघावर तिसऱ्यांदा आपला झेंडा रोवला. सोबतच कोणत्याही आमदाराला तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी न देण्याची या मतदारसंघाची परंपराही बच्चू कडू यांनी मोडीत काढली. (प्रतिनिधी)