शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

विनोद शिवकुमारचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:13 IST

परतवाडा (अमरावती) : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा जामीन ...

परतवाडा (अमरावती) : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा जामीन अर्ज शुक्रवारी अचलपूर येथील पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. के. मुनगीनवार यांच्या न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्याला अजूनही पुढील आदेशापर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

विनोद शिवकुमार याला जामीन मिळावा, यासाठी वकिलांतर्फे अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर गुरुवारी दोन्ही पक्षांच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी जामीन अर्जावर निर्णय ठेवला होता. त्यानुसार विनोद शिवकुमार हा गुगामल वन्यजीव विभागात वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होता. पळून जाताना त्याला अटक करण्यात आली. इतर साक्षीदारांवर दबाव आणू शकतो आणि पळून जाण्याची शक्यताही न्यायालयाने वर्तविली. त्यावरून जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून रिव्हाॅल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकरणाला विनोद शिवकुमार हा जबाबदार असल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याने विनोद शिवकुमारविरुद्ध गुन्हा दाखल करून तो नागपूर रेल्वे स्टेशनहून पळून जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, विनोद शिवकुमार एमसीआरपासून अमरावती जिल्हा कारागृहाच्या क्वाॅरंनटाईन सेंटरमध्ये आहे. कोरोनाकाळात १५ दिवसांपेक्षा अधिक काळ संपला आहे. आता तर त्याचा जामीनदेखील फेटाळण्यात आला. त्यामुळे त्याला आता थेट कारागृहात पाठविण्याची मागणी होऊ लागली आहे.

बॉक्स

चालकाचे बयाण ठरले महत्त्वपूर्ण

विनोद शिवकुमार याच्या चालकाचे बयाण न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरले आहे. गुगामलला उच्च पद भूषविल्यामुळे तो साक्षीदारांना सहज त्रास देऊ शकतो. याशिवाय चालकाच्या साक्षीच्या निवेदनातून हे उघड झाले आहे की, घटनेनंतर विनोद शिवकुमार सरकारी वाहनातून परतवाडा येथे आला. त्याने त्या चालकाला त्याचा मोबाईल बंद करण्यास सांगितले. त्यानंतर नागपूर विमानतळावर जाण्यासाठी खासगी वाहन भाड्याने घेतले. विमानतळावर जाण्याऐवजी तो नागपूर रेल्वे स्थानकात गेला. त्याने चालकाला रेल्वेचे तिकीट काढण्यास सांगितले. रेल्वे तिकीट मिळाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला रेल्वे स्टेशन नागपूर येथे अटक करण्यात आली. त्यामुळेच त्याचे आचरण स्पष्टपणे दाखवते की, तो न्यायालयापासून पळून जात होता. अशा परिस्थितीत, जामिनावर सोडल्यास तो पळून जाऊ शकतो. असा निर्वाळा न्यायाधीश एस. के. मुनगीनवार यांनी दिला आहे.