शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

कोरोनात गावबंदी आता मतदानासाठी आवतण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा धुराळा मागील उडत होता. आता प्रत्यक्ष मतदानाचा दिवस तोंडावर आला आहे. ...

अमरावती : जिल्ह्यातील ५३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा धुराळा मागील उडत होता. आता प्रत्यक्ष मतदानाचा दिवस तोंडावर आला आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये गावबंदी करणारे उमेदवार, कार्यकर्ते मतदानासाठी गावाला या म्हणून हात जोडून विनवणी सुरू आहे.

ग्रामीण भागातील लोक पुणा, मुंबई व इतर शहरांत कामानिमित्त वास्तव्याला आहेत. कोरोना संकटात हेच कामगार गावाकडे येण्यासाठी धडपडत होते. परंतु अनेक गावांमध्ये प्रवेशबंदी लादली गेली. त्यावेळी कामगार चांगलेच त्रस्त झाले होते. गावातील कार्यकर्ते नागरिकांना, कामगारही परका वाटत होता. विनोदी संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत हाेते. मात्र, आता परगावी गेलेल्या कामगारांची मते आपल्या झोळीत पडावी यासाठी हेच उमेदवार अन कार्यकर्ते आता मनधरणी करताना दिसून येत आहे. म्हणूनच गल्ली ते दिल्ली असे समीकरण असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजल्यापासून मतांचा जोगवा मागण्यासाठी व मतांची जुळवाजुळव करण्यासाठी कार्यकर्ते उमेदवारांना पुणे मुंबई व अन्य शहरांत गेलेल्या मतदार राजाला शोधून गावात येण्याची विनवणी करावी लागत आहे. अशा तऱ्हेने ग्रामीण भागातील विविध ग्रामपंचायतींच्या आणि विशेषतः मोठ्या गावांत निवडणूक चुरशीची होणार असून, ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याच पक्ष व गटाला कशी मिळेल, यासाठी अनेक प्रतिष्ठितांनी कंबर कसली आहे.

बॉक्स

अनेकांनी केलेली वाहनांची व्यवस्था

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे बाहेर ठिकाणी राहणाऱ्या मतदारांना मतदानासाठी यावे, असे साकडे उमेदवार व त्याचे समर्थक घालीत आहेत. त्यासाठी उमेदवारांकडून खास वाहनांची व्यवस्था करून मतदारांना नेणे व आणण्याची जबाबदारीसुद्धा उचलली जात आहे.