शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाढोण्यात गावगाड्याचे राजकारण; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थांबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 12:27 IST

Amravati : सरपंचपदाच्या भांडणात बँक खातेबदल करण्याचा ठराव नामंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क वाढोणा रामनाथ : स्थानिक ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. कारण गावगाड्याच्या राजकारणात सरपंचाच्या नावे बँक खातेबदल करण्याचा ठराव नामंजूर झाला. दोन महिन्यांपूर्वीच पदावर विराजमान झालेल्या सरपंचाच्या गोटात पाच, तर विरोधात सहा सदस्य आहेत.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोण्याच्या सरपंचपदी दोन महिन्यांपूर्वी सविता तिरमारे यांची निवड झाली. तेव्हापासून बैंक खातेबदल रखडला. त्यामुळे गावातील संपूर्ण विकासकामे थांबली आहेत. ग्रामपंचायतमध्ये एकूण अकरा सदस्य आहे. 

त्यापैकी पाच सदस्य सरपंच तिरमारे यांच्याकडे, तर सहा सदस्य विरोधात आहेत. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये बँक खातेबदल करण्यासाठी ठराव नामंजूर करण्यात आला. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी वाघोडे यांनी तसा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविला. पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला. परंतु, आजपर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. 

त्यातच कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा झाले नाही. सरपंचांना पैसे खर्च करण्याचे अधिकार नाहीत. वाढोण्यात गेल्या तीन वर्षांपासून सरपंचपदासाठी न्यायालयीन वाद झडत आहेत. तो अजूनही थांबला नाही. जिल्हा परिषद यावर कुठली कायदेशीर कारवाई करणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

"ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव आला आहे. तो जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. लवकरच कारवाई होईल."- संजय झंजाड गटविकास अधिकारी, नांदगाव खंडेश्वर

टॅग्स :Amravatiअमरावतीgram panchayatग्राम पंचायत