शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघात आघाडीतील गुंता कायम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 21:43 IST

अनिल बोंडे हे सन २००९ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत.

अमरावती : कृषिमंत्री असलेल्या अनिल बोंडे यांचा मोर्शी मतदारसंघ आघाडीत कुणाला सुटणार याबाबतची निश्चिती नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना या मित्रपक्षांच्या इच्छुकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.

अनिल बोंडे हे सन २००९ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आल्याने मतदारसंघाला अधिक महत्त्व आले आहे. भाजपक्षातून इतर कुणी प्रभावी व्यक्ती उमेदवारीसाठी इच्छुक नसल्यामुळे जिल्ह्यातील काही मतदारसंघांप्रमाणे अंतर्गत कलह येथे नाही. १९९९, २००४, २००९ व २०१४ या तिन्ही निवडणुकीतील पहिल्या तीन क्रमांकावर राहिलेले उमेदवार २०१९ च्या निवडणुकीत आमने-सामने असतील, असे सध्याचे चित्र आहे.

चार निवडणुकीत अनिल बोंडे, नरेशचंद्र ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख यांच्यात लढती झाल्यात. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येकी १२५ जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याची घोषणा झाली असली तरी मतदारसंघनिहाय जागावाटप जाहिर झालेले नाही. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख दुसऱ्या क्रमांकावर होते. विदर्भातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षपद त्यांचेकडे असल्याने ते यंदा निवडणुकीपासून दूर राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादी काँगे्रेसकडून कुणीही उमेदवारी मागितलेली नाही.

मागील निवडणुकीत तिस-या क्रमांकाची मते घेणारे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे हे त्यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांच्या कांंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. नरेशचंद्र ठाकरे हे १९९९ च्या निवडणुकीत अपक्ष आमदार होते. आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी लढण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटवर आल्यास ही जागा स्वाभिमानीसाठी सोडण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आघाडीच्या नेत्यांकडे केल्याची माहिती आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच आघाडीच्या उमेदवारीचा पेच सुटण्याचे संकेत आहेत.

सेनेचा दावा१९९९ मध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय यावलकर तर २००४ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले विद्यमान कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दुस-या क्रमांकाची मते घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा प्रभाकर काळे, राजेंद्र आंडे, नारायण शेटे, शरद गुडधे, बंडू साऊत व धीरज खोडसकर यांनी मोर्शी मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी ‘मातोश्री’वर मुलाखती दिल्या आहेत. मात्र भाजपक्षाच्या तुलनेत त्यांचा दावा फारसा सशक्त नाही.

 

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेAmravatiअमरावतीvidhan sabhaविधानसभा