शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील उपसा जलसिंचनाच्या कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 15:37 IST

७२ योजनांतून ४० हजार एकरात सिंचन, शेती गहाण ठेवून शेतक-यांनी उभारले प्रकल्प

प्रशांत काळबेंडे जरूड (अमरावती) : विदर्भातील सिंचनाचा ज्वलंत प्रश्न स्वनिधीने सोडवून शासनाच्या ठरविलेल्या दरापेक्षा अत्यंत कमी खर्चात तब्बल ७२ उपसा जलसिंचन योजना तयार करून शेतकºयांनी सोडवला. सुमारे ४० हजार एकर शेतीचे सिंचन झाले. यासाठी केवळ ४८ कोटी रुपये कर्ज घेतले. हे कर्ज माफ करावे, यासाठी वारंवार शासनदरबारी लोटांगण घेऊनसुद्धा केवळ निराशाच हाती आली आहे.१९९० च्या सुमारास पाण्याअभावी संत्र्यासारखी फळपिके डोळ्यांदेखत वाळत असल्याचे पाहून विदर्भातील ६५३४ शेतकºयांनी आपापल्या परिक्षेत्रात शेती विविध वित्तीय संस्थांना गहाण ठेवून ४८ कोटी कर्ज उभारले आणि तब्बल ७२ सहकारी उपसा जलसिंचन योजना तयार केल्यात. या योजना सुरळीत चालू असताना, प्रशासनाची लालफीतशाही, औदासीन्य, विजेचे अवास्तव बिल, संस्थांचा व्यवस्थापन खर्च आणि वित्तीय संस्थांकडून अवास्तव आकारणी यामुळे ४८ कोटींवरून तब्बल १७५ कोटींचा बोजा शेतकºयांच्या सातबारावर चढला आहे. त्यामुळे तब्बल ६९ योजना बंद करण्यात आल्या आहेत.

आश्वासनांशिवाय काहीच नाही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शासकीय आदेश काढून उपसा जलसिंचनच्या कर्जावरील व्याज माफ करण्याची घोषणा केली होती. परंतु, ती केवळ वल्गना ठरली. त्यानंतर शासनाने या योजना ताब्यात घेऊन शेतकºयांना कर्जमुक्त करावे, असा ठराव ७ एप्रिल २००४ रोजी विदर्भ वैधानिक विकास मंडळाने राज्यपालांकडे पाठवला होता. २ फेब्रुवारी २०१० रोजीच्या शासननिर्णयाप्रमाणे कृष्ण खोरे योजनेच्या धर्तीवर विदर्भातील शेतकºयांचे कर्ज माफ करावे, असा ठराव तत्कालीन सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी मंत्रिमंडळासमोर मांडला होता. त्यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी काँग्रेस-राष्टÑवादी सरकारला धारेवर धरले होते. परंतु, भाजपने या भूमिकेलाही सोयीस्कर बगल दिली आहे. 

१३ किलोमीटरवरून सिंचनअमरावती जिल्ह्यातील जरूड येथील शरद उपसा जलसिंचन योजना ही सर्वांत मोठी आहे. या योजनेत सहभागी ७५० शेतकºयांनी तीन हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेती गहाण करून आठ कोटींचे कर्ज उभारले. ७५ मीटर उंचीवर १३ किलोमीटरवरून १६८० अश्वशक्ती विद्युत यंत्राच्या साहाय्याने शेती सिंचनाखाली आणली आहे. शासनाने वेळीच योजनेवरील कर्ज माफ न केल्यास ही सुस्थितीतील योजना व शेतकरी डबघाईस येतील.

या शेतक-यांना पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक परिस्थिती खालावत असून, नैराश्यातून आत्महत्या वाढल्या आहेत. यामुळे शेवटचा निर्वाणीचा इशारा देत सत्ताधारी व राजकारण्यांचे डोके नांगरू, असा इशारा आम्ही दिला आहे. - मालती दातीर, अध्यक्षएल्गार शरद उपसा जलसिंचन योजना