शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विदर्भातील उपसा जलसिंचनाच्या कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 15:37 IST

७२ योजनांतून ४० हजार एकरात सिंचन, शेती गहाण ठेवून शेतक-यांनी उभारले प्रकल्प

प्रशांत काळबेंडे जरूड (अमरावती) : विदर्भातील सिंचनाचा ज्वलंत प्रश्न स्वनिधीने सोडवून शासनाच्या ठरविलेल्या दरापेक्षा अत्यंत कमी खर्चात तब्बल ७२ उपसा जलसिंचन योजना तयार करून शेतकºयांनी सोडवला. सुमारे ४० हजार एकर शेतीचे सिंचन झाले. यासाठी केवळ ४८ कोटी रुपये कर्ज घेतले. हे कर्ज माफ करावे, यासाठी वारंवार शासनदरबारी लोटांगण घेऊनसुद्धा केवळ निराशाच हाती आली आहे.१९९० च्या सुमारास पाण्याअभावी संत्र्यासारखी फळपिके डोळ्यांदेखत वाळत असल्याचे पाहून विदर्भातील ६५३४ शेतकºयांनी आपापल्या परिक्षेत्रात शेती विविध वित्तीय संस्थांना गहाण ठेवून ४८ कोटी कर्ज उभारले आणि तब्बल ७२ सहकारी उपसा जलसिंचन योजना तयार केल्यात. या योजना सुरळीत चालू असताना, प्रशासनाची लालफीतशाही, औदासीन्य, विजेचे अवास्तव बिल, संस्थांचा व्यवस्थापन खर्च आणि वित्तीय संस्थांकडून अवास्तव आकारणी यामुळे ४८ कोटींवरून तब्बल १७५ कोटींचा बोजा शेतकºयांच्या सातबारावर चढला आहे. त्यामुळे तब्बल ६९ योजना बंद करण्यात आल्या आहेत.

आश्वासनांशिवाय काहीच नाही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शासकीय आदेश काढून उपसा जलसिंचनच्या कर्जावरील व्याज माफ करण्याची घोषणा केली होती. परंतु, ती केवळ वल्गना ठरली. त्यानंतर शासनाने या योजना ताब्यात घेऊन शेतकºयांना कर्जमुक्त करावे, असा ठराव ७ एप्रिल २००४ रोजी विदर्भ वैधानिक विकास मंडळाने राज्यपालांकडे पाठवला होता. २ फेब्रुवारी २०१० रोजीच्या शासननिर्णयाप्रमाणे कृष्ण खोरे योजनेच्या धर्तीवर विदर्भातील शेतकºयांचे कर्ज माफ करावे, असा ठराव तत्कालीन सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी मंत्रिमंडळासमोर मांडला होता. त्यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी काँग्रेस-राष्टÑवादी सरकारला धारेवर धरले होते. परंतु, भाजपने या भूमिकेलाही सोयीस्कर बगल दिली आहे. 

१३ किलोमीटरवरून सिंचनअमरावती जिल्ह्यातील जरूड येथील शरद उपसा जलसिंचन योजना ही सर्वांत मोठी आहे. या योजनेत सहभागी ७५० शेतकºयांनी तीन हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेती गहाण करून आठ कोटींचे कर्ज उभारले. ७५ मीटर उंचीवर १३ किलोमीटरवरून १६८० अश्वशक्ती विद्युत यंत्राच्या साहाय्याने शेती सिंचनाखाली आणली आहे. शासनाने वेळीच योजनेवरील कर्ज माफ न केल्यास ही सुस्थितीतील योजना व शेतकरी डबघाईस येतील.

या शेतक-यांना पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक परिस्थिती खालावत असून, नैराश्यातून आत्महत्या वाढल्या आहेत. यामुळे शेवटचा निर्वाणीचा इशारा देत सत्ताधारी व राजकारण्यांचे डोके नांगरू, असा इशारा आम्ही दिला आहे. - मालती दातीर, अध्यक्षएल्गार शरद उपसा जलसिंचन योजना