शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

विदर्भातील उपसा जलसिंचनाचे कर्ज प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 14, 2015 00:24 IST

विदर्भातील सिंचनाचा ज्वलंत प्रश्न शेतकऱ्याने स्वकष्टाने व स्व निधीने सोडवून शासनाच्या दरापेक्षा अत्यंत कमी खर्चात तब्बल ७२ उपसा जलसिंचन योजना तयार केला.

प्रशांत काळबेंडे  वरूडविदर्भातील सिंचनाचा ज्वलंत प्रश्न शेतकऱ्याने स्वकष्टाने व स्व निधीने सोडवून शासनाच्या दरापेक्षा अत्यंत कमी खर्चात तब्बल ७२ उपसा जलसिंचन योजना तयार केला. सुमारे ४० हजार एकर शेती सिंचनाचा प्रश्न शेतकर्यांनी सोडविला. यासाठी केवळ ४८ कोटी रुपये कर्ज घेतले. हे कर्ज शासनाने माफ करावे यासाठी वारंवार शासन दरबारी रेटला गेला. कर्ज शासनाने माफ केले नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही, असा स्पष्ट इशारा जरुड येथील शरद शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे. १९९० च्या सुमारास पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य लक्षात घेता डोळ्यांदेखत उभी संत्राची झाडे वाळताना बघून, लौकिक पावलेला विदर्भाचा कालीफोर्निया नामशेष होईल या भीतीने विदभार्तील ६५३४ शेतकर्यांनी विविध वित्तीय संस्थेला शेती गहाण ठेवून ४८ कोटी रुपये कर्ज घेऊन तब्बल ७२ सहकारी उपसा जलसिंचन प्रकल्प उभारला. या योजना सुरळीत चालू असताना शासनाच्या लालफितीशाही, विदर्भाच्या प्रती अन्यायकारक धोरण विजेचे अवास्तव बिल, संस्थांचा व्यवस्थापन खर्च आणि वित्तीय संस्थेचे कर्ज आकारणी यामुळे या शेतकऱ्यांवर ४८ कोटींवरून तब्बल १७५ कोटी रुपयांचा बोझा ७/१२ वर चढला आहे. यामुळे विदर्भातील ७२ उपसा जलसिंचनापैकी केवळ तीनच योजना सुस्थितीत आहेत. ६९ योजना बंद आहे. या योजनेंंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावा यासाठी राष्ट्रपती, मुख्यामंत्र्यांच्या दरवाज्यांवर माथा टेकला, आंदोलने केली, मोर्चे काढलेत परंतु पोकळ आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. तत्कालीन युती शासनाच्या वेळेस मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी याप्रश्नी एक शासकीय आदेश काढून उपसाजलसिंचनच्या कर्जावरील व्याज माफ करण्याची घोषणा केली होती. परंतु ही केवळ वल्गना ठरली. त्यानंतर ७ एप्रिल २००४ मध्ये विदर्भ वैधानिक विकास महामंडळाने या योजना शासनाने ताब्यात घ्ेऊन शेतकर्यांना कर्जमुक्त करावे, असा ठराव राज्यपालांकडे पाठवला होता. २ फेब्रुवारी २०१० मध्ये झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोरे या योजनेचा शेतकऱ्यांना दिला गेलेल्या पकेज प्रमाणे विदभार्तील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, असा ठराव तत्कालीन सहकार मंत्री पतंगराव कदम यांनी मंत्रिमंडळासमोर मांडला होता. विदभार्तील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करीत असताना आपल्या शेत जमिनीची सिंचनाची सोय स्व कष्टाने करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नसल्याने व नापिकी मुळे शेतकरी उपसा जल सिंचनाचे कर्ज भरू शकले नाही. यामुळे कजार्चा डोंगर वाढला. ७/१२ वर या कर्जाची नोंद असल्याने दुसरे पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचीे आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. यामुळे सत्ताधिकार्यांचे व राजकारण्यांचे डोके नांगरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.७५० शेतकऱ्यांनी घेतले आठ कोटींचे कर्जविदर्भातील सर्वात मोठी जलसिंचत योजना जिल्ह्यातील जरुड येथील शरद उपसा जल सिंचन नावाने आहे. या योजनेत ७५० शेतकऱ्यांनी आपले ३००० एकर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी आपापली शेती गहाण करून ८ कोटी कर्ज घेऊन ७५ मीटर उंचीवर १३ किलोमीटर लांबी वर १६८० अश्व शक्ती विद्युत स्वयंत्राच्या सहाय्याने आपली शेती सिंचनाखाली आणली आहे. ही सुस्थितीत सुरू आह.े शासनाने वेळीच दाखल घेऊन या योजनेवरील कर्ज माफ करून सातबारा कोरा केला नाही. उरल्या सुरल्या योजनाही इतिहास जमा होईल, हे वास्तव आहे.