शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

विदर्भातील उपसा जलसिंचनाचे कर्ज प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 14, 2015 00:24 IST

विदर्भातील सिंचनाचा ज्वलंत प्रश्न शेतकऱ्याने स्वकष्टाने व स्व निधीने सोडवून शासनाच्या दरापेक्षा अत्यंत कमी खर्चात तब्बल ७२ उपसा जलसिंचन योजना तयार केला.

प्रशांत काळबेंडे  वरूडविदर्भातील सिंचनाचा ज्वलंत प्रश्न शेतकऱ्याने स्वकष्टाने व स्व निधीने सोडवून शासनाच्या दरापेक्षा अत्यंत कमी खर्चात तब्बल ७२ उपसा जलसिंचन योजना तयार केला. सुमारे ४० हजार एकर शेती सिंचनाचा प्रश्न शेतकर्यांनी सोडविला. यासाठी केवळ ४८ कोटी रुपये कर्ज घेतले. हे कर्ज शासनाने माफ करावे यासाठी वारंवार शासन दरबारी रेटला गेला. कर्ज शासनाने माफ केले नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही, असा स्पष्ट इशारा जरुड येथील शरद शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे. १९९० च्या सुमारास पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य लक्षात घेता डोळ्यांदेखत उभी संत्राची झाडे वाळताना बघून, लौकिक पावलेला विदर्भाचा कालीफोर्निया नामशेष होईल या भीतीने विदभार्तील ६५३४ शेतकर्यांनी विविध वित्तीय संस्थेला शेती गहाण ठेवून ४८ कोटी रुपये कर्ज घेऊन तब्बल ७२ सहकारी उपसा जलसिंचन प्रकल्प उभारला. या योजना सुरळीत चालू असताना शासनाच्या लालफितीशाही, विदर्भाच्या प्रती अन्यायकारक धोरण विजेचे अवास्तव बिल, संस्थांचा व्यवस्थापन खर्च आणि वित्तीय संस्थेचे कर्ज आकारणी यामुळे या शेतकऱ्यांवर ४८ कोटींवरून तब्बल १७५ कोटी रुपयांचा बोझा ७/१२ वर चढला आहे. यामुळे विदर्भातील ७२ उपसा जलसिंचनापैकी केवळ तीनच योजना सुस्थितीत आहेत. ६९ योजना बंद आहे. या योजनेंंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावा यासाठी राष्ट्रपती, मुख्यामंत्र्यांच्या दरवाज्यांवर माथा टेकला, आंदोलने केली, मोर्चे काढलेत परंतु पोकळ आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. तत्कालीन युती शासनाच्या वेळेस मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी याप्रश्नी एक शासकीय आदेश काढून उपसाजलसिंचनच्या कर्जावरील व्याज माफ करण्याची घोषणा केली होती. परंतु ही केवळ वल्गना ठरली. त्यानंतर ७ एप्रिल २००४ मध्ये विदर्भ वैधानिक विकास महामंडळाने या योजना शासनाने ताब्यात घ्ेऊन शेतकर्यांना कर्जमुक्त करावे, असा ठराव राज्यपालांकडे पाठवला होता. २ फेब्रुवारी २०१० मध्ये झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोरे या योजनेचा शेतकऱ्यांना दिला गेलेल्या पकेज प्रमाणे विदभार्तील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, असा ठराव तत्कालीन सहकार मंत्री पतंगराव कदम यांनी मंत्रिमंडळासमोर मांडला होता. विदभार्तील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करीत असताना आपल्या शेत जमिनीची सिंचनाची सोय स्व कष्टाने करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नसल्याने व नापिकी मुळे शेतकरी उपसा जल सिंचनाचे कर्ज भरू शकले नाही. यामुळे कजार्चा डोंगर वाढला. ७/१२ वर या कर्जाची नोंद असल्याने दुसरे पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचीे आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. यामुळे सत्ताधिकार्यांचे व राजकारण्यांचे डोके नांगरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.७५० शेतकऱ्यांनी घेतले आठ कोटींचे कर्जविदर्भातील सर्वात मोठी जलसिंचत योजना जिल्ह्यातील जरुड येथील शरद उपसा जल सिंचन नावाने आहे. या योजनेत ७५० शेतकऱ्यांनी आपले ३००० एकर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी आपापली शेती गहाण करून ८ कोटी कर्ज घेऊन ७५ मीटर उंचीवर १३ किलोमीटर लांबी वर १६८० अश्व शक्ती विद्युत स्वयंत्राच्या सहाय्याने आपली शेती सिंचनाखाली आणली आहे. ही सुस्थितीत सुरू आह.े शासनाने वेळीच दाखल घेऊन या योजनेवरील कर्ज माफ करून सातबारा कोरा केला नाही. उरल्या सुरल्या योजनाही इतिहास जमा होईल, हे वास्तव आहे.