शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
2
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
3
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
4
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
5
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
6
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
7
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
8
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
9
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
10
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
11
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
13
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
14
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
15
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
16
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
17
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
18
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
19
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
20
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट

वीजप्रवाही कुंपणात अडकला विदर्भातील वाघांचा जीव! वर्षभरात सहा वाघ ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:50 IST

शिकारीच्या संकटानंतर आता शेती संरक्षणासाठी लावल्या जाणा-या वीजप्रवाही कुंपणांमध्ये जीव गमवण्याचा प्रसंग विदर्भातील वाघांवर ओढवत आहे. अशा रीतीने वर्षभरात सहा वाघांचे नाहक बळी गेला.

- गणेश वासनिक

अमरावती : शिकारीच्या संकटानंतर आता शेती संरक्षणासाठी लावल्या जाणा-या वीजप्रवाही कुंपणांमध्ये जीव गमवण्याचा प्रसंग विदर्भातील वाघांवर ओढवत आहे. अशा रीतीने वर्षभरात सहा वाघांचे नाहक बळी गेला. दुसरीकडे नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकºयांनी पिकांचे संरक्षण करावे की नको, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या विदर्भातील १० जिल्ह्यांमध्ये वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष वाढीस लागला आहे. व्याघ्र प्रकल्प आणि प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारीत ६० हजार चौरस कि.मी. जंगल आहे. दहापैकी सहा जिल्ह्यांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे व्याघ्र प्रकल्पदप्तरी नोंद आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट वगळता अकोला, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये बिबट मोठ्या संख्येने आहेत. गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वाघांचे वास्तव्य आहे. बहुतांश ठिकाणी जंगल आणि गावे संलग्न असल्याने पीकसंरक्षणासाठी वनक्षेत्रालगतच्या शेताच्या कुंपणात वीजप्रवाह सोडला जातो. यामध्ये आकस्मिक प्रवेश करणारे वाघ, बिबट ठार झाले आहेत. वर्षभरात अशाप्रकारे सहा वाघ व १२ बिबट ठार झाल्याची नोंद आहे. वीजप्रवाही कुंपणाचा अंदाज न आल्याने माणसांचाही बळी गेला आहे. मात्र, पर्याय नसल्याने बळीराजाला हा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे वास्तव आहे.

सहा वाघ ठारकुंपणाला वीजप्रवाह सोडल्याने विदर्भात वर्षभरात सहा वाघांचे बळी गेल्याची नोंद वनविभागात आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा, चामोर्शीनजीक मारोडा, जामगिरी, तर चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर, भद्रावती, ताडोबा बफर झोन, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या ठिकाणांचा समावेश आहे.

पीक नुकसानभरपाईस विलंबवन्यप्राण्यांनी शेतातील उभे पीक उद्ध्वस्त केल्यास वनविभागाकडून सर्वेक्षण, घटनास्थळ पंचनामा, बयाण असा प्रवास पूर्ण केल्यानंतरही शेतक-यांना नुकसानभरपाईची रक्कम विलंबाने मिळत असल्याची ओरड आहे. पीक नुकसानभरपाई रकमेत २५ टक्के वाढ केली असली तरी प्रशासकीय दिरंगाईचा फटका शेतक-यांना सहन करावा लागतो.

वनांशेजारच्या शेताला सौरऊर्जेचे कुंपण आवश्यकविदर्भात ७० टक्के शेती ही जंगलाशेजारी आहे. त्यामुळे पिकांना वन्यप्राण्यांपासून सतत धोका आहे. शेतक-यांचे ते उदरनिर्वाहाचे साधन असल्याने संरक्षण त्यांची गरज आहे. शासनाने जंगलाशेजारील शेताला सौरऊर्जेचे कुंपण लावण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी समस्त शेतक-यांची आहे.

टॅग्स :Tigerवाघ