शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीजप्रवाही कुंपणात अडकला विदर्भातील वाघांचा जीव! वर्षभरात सहा वाघ ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:50 IST

शिकारीच्या संकटानंतर आता शेती संरक्षणासाठी लावल्या जाणा-या वीजप्रवाही कुंपणांमध्ये जीव गमवण्याचा प्रसंग विदर्भातील वाघांवर ओढवत आहे. अशा रीतीने वर्षभरात सहा वाघांचे नाहक बळी गेला.

- गणेश वासनिक

अमरावती : शिकारीच्या संकटानंतर आता शेती संरक्षणासाठी लावल्या जाणा-या वीजप्रवाही कुंपणांमध्ये जीव गमवण्याचा प्रसंग विदर्भातील वाघांवर ओढवत आहे. अशा रीतीने वर्षभरात सहा वाघांचे नाहक बळी गेला. दुसरीकडे नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकºयांनी पिकांचे संरक्षण करावे की नको, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या विदर्भातील १० जिल्ह्यांमध्ये वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष वाढीस लागला आहे. व्याघ्र प्रकल्प आणि प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारीत ६० हजार चौरस कि.मी. जंगल आहे. दहापैकी सहा जिल्ह्यांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे व्याघ्र प्रकल्पदप्तरी नोंद आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट वगळता अकोला, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये बिबट मोठ्या संख्येने आहेत. गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वाघांचे वास्तव्य आहे. बहुतांश ठिकाणी जंगल आणि गावे संलग्न असल्याने पीकसंरक्षणासाठी वनक्षेत्रालगतच्या शेताच्या कुंपणात वीजप्रवाह सोडला जातो. यामध्ये आकस्मिक प्रवेश करणारे वाघ, बिबट ठार झाले आहेत. वर्षभरात अशाप्रकारे सहा वाघ व १२ बिबट ठार झाल्याची नोंद आहे. वीजप्रवाही कुंपणाचा अंदाज न आल्याने माणसांचाही बळी गेला आहे. मात्र, पर्याय नसल्याने बळीराजाला हा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे वास्तव आहे.

सहा वाघ ठारकुंपणाला वीजप्रवाह सोडल्याने विदर्भात वर्षभरात सहा वाघांचे बळी गेल्याची नोंद वनविभागात आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा, चामोर्शीनजीक मारोडा, जामगिरी, तर चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर, भद्रावती, ताडोबा बफर झोन, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या ठिकाणांचा समावेश आहे.

पीक नुकसानभरपाईस विलंबवन्यप्राण्यांनी शेतातील उभे पीक उद्ध्वस्त केल्यास वनविभागाकडून सर्वेक्षण, घटनास्थळ पंचनामा, बयाण असा प्रवास पूर्ण केल्यानंतरही शेतक-यांना नुकसानभरपाईची रक्कम विलंबाने मिळत असल्याची ओरड आहे. पीक नुकसानभरपाई रकमेत २५ टक्के वाढ केली असली तरी प्रशासकीय दिरंगाईचा फटका शेतक-यांना सहन करावा लागतो.

वनांशेजारच्या शेताला सौरऊर्जेचे कुंपण आवश्यकविदर्भात ७० टक्के शेती ही जंगलाशेजारी आहे. त्यामुळे पिकांना वन्यप्राण्यांपासून सतत धोका आहे. शेतक-यांचे ते उदरनिर्वाहाचे साधन असल्याने संरक्षण त्यांची गरज आहे. शासनाने जंगलाशेजारील शेताला सौरऊर्जेचे कुंपण लावण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी समस्त शेतक-यांची आहे.

टॅग्स :Tigerवाघ