शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

छोटे राज्य साकारल्यास विकासात विदर्भ पहिला

By admin | Updated: September 21, 2014 23:44 IST

प्रचंड खनिज संपत्ती, कौशल्य व ज्ञान संपदा असतानाही अखंड महाराष्ट्रातून विदर्भ विकासापासून कोसो दूर राहिला. भाषेचा भावनिक आधार व अखंडतेच्या मुद्यावर न राहता छत्तीसगडसारख्या

अमरावती : प्रचंड खनिज संपत्ती, कौशल्य व ज्ञान संपदा असतानाही अखंड महाराष्ट्रातून विदर्भ विकासापासून कोसो दूर राहिला. भाषेचा भावनिक आधार व अखंडतेच्या मुद्यावर न राहता छत्तीसगडसारख्या छोट्याशा राज्याची संकल्पना साकारली गेल्यास देशात विदर्भ पहिल्या क्रमांकाचे सक्षम राज्य म्हणून उदयास येईल, असे मत छत्तीसगड या छोट्या राज्याची विकासात्मक संकल्पना मांडणाऱ्या अभ्यासक व तज्ज्ञांनी व्यक्त केले. जनमंच विदर्भाचा लढा या संघटनेतर्फे ‘छोट्या राज्याची निर्मिती’ या विषयावर आयोजित परिसंवादात हनुमंत यादव, जवाहर सूरशेट्टी, एस. एस. ब्राह्मणकर सहभागी झाले होते. यानिमित्त त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी छत्तीसगड योजना आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. हनुमंत यादव यांनी जगातील छोट्या देशाचा विकास झाल्याचे सांगून छोट्या राज्याच्या संकल्पनेतच सक्षम विकास दडलेला असल्याचे सांगितले. छोट्या राज्यातच सामान्य जनतेला सुयोग्य सुविधा, चांगल्या प्रशासनात त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात, असेही यादव म्हणाले. राज्याच्या विकासासाठी भौगोलिक क्षेत्र ९० हजार किलोमीटरपेक्षा अधिक नसायला पाहिजे. यामध्ये मध्यप्रदेशातून वेगळ्या झालेल्या छत्तीसगड राज्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विदर्भदेखील अशा भौगोलिक क्षमतेमध्ये येत असल्याने तेथे छोटे राज्य सक्षम राज्याची संकल्पना पूर्ण होण्याचा विश्वास हनुमंत यादव यांनी व्यक्त केला.मध्य प्रदेशातून वेगळ्या झालेल्या छत्तीसगडने १० वर्षांत राज्य विकास दर १२ टक्क्यापर्यंत पोहोचविला आहे. या विकासाबाबत देशात छत्तीसगड राज्य पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून नावारूपास आले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध समित्यांवरील शिक्षण सल्लागार (छत्तीसगड) जवाहर सुरशेट्टी म्हणाले, पूर्वी महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये समानता होती. मध्य प्रदेशातून छत्तीसगड राज्य म्हणून उदयास आले. औद्योगिक व शिक्षण क्षेत्रात मोठा विकास करू शकले. विदर्भ अखंड महाराष्ट्रातच राहून अखंड विकासाच्या बाबतीत मागे राहिला. वेगळ्या विदर्भातच सक्षम विकास दडला असल्याचे त्यांनीही सांगितले.विदर्भ हा प्रदेश जगाच्या मध्यभागी, केंद्रस्थानी येतो. भविष्यात विदर्भाला विकासात्मक मोठा वाव आहे. छोट्या राज्याच्या संकल्पनेत त्याचा विदर्भालाच मोठा फायदा होईल. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. विदर्भात विकासाचे परिवर्तन पाहिजे असल्यास वेगळ्या विदर्भाच्या सक्षमतेतच ते दडलेले आहे, असे मत कृषी उद्योजक एस. एस. ब्राह्मणकर यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे, अतुल यादगिरे, अतुल गायगोले, विजय विल्हेकर, वसूसेन देशमुख, गजानन कोरे, दीपक जोशी, संजय वानखडे, विवेक राऊत, चेतन पाटील व जनमंच विदर्भाचा लढा याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)