शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

छोटे राज्य साकारल्यास विकासात विदर्भ पहिला

By admin | Updated: September 21, 2014 23:44 IST

प्रचंड खनिज संपत्ती, कौशल्य व ज्ञान संपदा असतानाही अखंड महाराष्ट्रातून विदर्भ विकासापासून कोसो दूर राहिला. भाषेचा भावनिक आधार व अखंडतेच्या मुद्यावर न राहता छत्तीसगडसारख्या

अमरावती : प्रचंड खनिज संपत्ती, कौशल्य व ज्ञान संपदा असतानाही अखंड महाराष्ट्रातून विदर्भ विकासापासून कोसो दूर राहिला. भाषेचा भावनिक आधार व अखंडतेच्या मुद्यावर न राहता छत्तीसगडसारख्या छोट्याशा राज्याची संकल्पना साकारली गेल्यास देशात विदर्भ पहिल्या क्रमांकाचे सक्षम राज्य म्हणून उदयास येईल, असे मत छत्तीसगड या छोट्या राज्याची विकासात्मक संकल्पना मांडणाऱ्या अभ्यासक व तज्ज्ञांनी व्यक्त केले. जनमंच विदर्भाचा लढा या संघटनेतर्फे ‘छोट्या राज्याची निर्मिती’ या विषयावर आयोजित परिसंवादात हनुमंत यादव, जवाहर सूरशेट्टी, एस. एस. ब्राह्मणकर सहभागी झाले होते. यानिमित्त त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी छत्तीसगड योजना आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. हनुमंत यादव यांनी जगातील छोट्या देशाचा विकास झाल्याचे सांगून छोट्या राज्याच्या संकल्पनेतच सक्षम विकास दडलेला असल्याचे सांगितले. छोट्या राज्यातच सामान्य जनतेला सुयोग्य सुविधा, चांगल्या प्रशासनात त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात, असेही यादव म्हणाले. राज्याच्या विकासासाठी भौगोलिक क्षेत्र ९० हजार किलोमीटरपेक्षा अधिक नसायला पाहिजे. यामध्ये मध्यप्रदेशातून वेगळ्या झालेल्या छत्तीसगड राज्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विदर्भदेखील अशा भौगोलिक क्षमतेमध्ये येत असल्याने तेथे छोटे राज्य सक्षम राज्याची संकल्पना पूर्ण होण्याचा विश्वास हनुमंत यादव यांनी व्यक्त केला.मध्य प्रदेशातून वेगळ्या झालेल्या छत्तीसगडने १० वर्षांत राज्य विकास दर १२ टक्क्यापर्यंत पोहोचविला आहे. या विकासाबाबत देशात छत्तीसगड राज्य पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून नावारूपास आले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध समित्यांवरील शिक्षण सल्लागार (छत्तीसगड) जवाहर सुरशेट्टी म्हणाले, पूर्वी महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये समानता होती. मध्य प्रदेशातून छत्तीसगड राज्य म्हणून उदयास आले. औद्योगिक व शिक्षण क्षेत्रात मोठा विकास करू शकले. विदर्भ अखंड महाराष्ट्रातच राहून अखंड विकासाच्या बाबतीत मागे राहिला. वेगळ्या विदर्भातच सक्षम विकास दडला असल्याचे त्यांनीही सांगितले.विदर्भ हा प्रदेश जगाच्या मध्यभागी, केंद्रस्थानी येतो. भविष्यात विदर्भाला विकासात्मक मोठा वाव आहे. छोट्या राज्याच्या संकल्पनेत त्याचा विदर्भालाच मोठा फायदा होईल. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. विदर्भात विकासाचे परिवर्तन पाहिजे असल्यास वेगळ्या विदर्भाच्या सक्षमतेतच ते दडलेले आहे, असे मत कृषी उद्योजक एस. एस. ब्राह्मणकर यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे, अतुल यादगिरे, अतुल गायगोले, विजय विल्हेकर, वसूसेन देशमुख, गजानन कोरे, दीपक जोशी, संजय वानखडे, विवेक राऊत, चेतन पाटील व जनमंच विदर्भाचा लढा याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)