शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

विदर्भवाद्यांनी केली नागपूर कराराची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:24 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूर कराराची व फसव्या केळकर समितीच्या अहवालाची विदर्भवाद्यांनी गुरूवारी इर्विन चौकात होळी केली. वेगळा विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देआंदोलन : वेगळया विदर्भ राज्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूर कराराची व फसव्या केळकर समितीच्या अहवालाची विदर्भवाद्यांनी गुरूवारी इर्विन चौकात होळी केली. वेगळा विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.कित्येक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी शासनाकडे केली जात आहे. महाराष्ट्रात राहून विकासाच्या बाबतीत विदर्भ अद्यापही माघारलेला आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. नागपूर करारानुसार सरकारकडून पालन होत नाही. या कराराप्रमाणे २३ टक्के लोकसंख्येच्या प्रमाणात विकासनिधी नाही. नोकºया मिळत नाही. विदर्भातील औद्योगिकरणाकडेही दुर्लक्ष होत आहे. नैसर्गिक संसाधनाची शोषण, सिंचन व शेती विकासाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी केला आहे. वेगळे विदर्भराज्य निर्माण झाल्याशिवाय विकास होऊच शकत नाही. त्यामुळे आता सरकारने तत्काळ वेगळे विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी मागणी आंदोलनादरम्यान केली आहे.या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक राजेंद्र आगरकर, जिल्हाप्रमुख बंटी केजडीवाल, नंदू खेरडे, अमिता कुबडे, शेख कादर मन्सुरी, उज्ज्वला पांडे, प्रिया चक्रे, रंजना मामर्डे, कविता पवार, जुगल ओझा, विजय मोहोड, धनराज गोटे, गजानन भगत, सहदेव ढोके, साहेबराव इंगळे, विलास पवार, रियाज खान, राजेंद्र आगरकर यांच्या विदर्भवादी शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.