शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

्नराजकीय अस्तित्वाच्या लढाईत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा बळी

By admin | Updated: March 10, 2016 00:27 IST

फुलांचा मार्ग मिळवण्याच्या आशेवर बरेचदा काटेरी वाटही तुडवावी लागते. अन त्या तीक्ष्ण काटेरी वाटेवर पाऊलेही रक्तरंजीत होतात.

मनोज मानवतकर नांदगाव खंडेश्वरफुलांचा मार्ग मिळवण्याच्या आशेवर बरेचदा काटेरी वाटही तुडवावी लागते. अन त्या तीक्ष्ण काटेरी वाटेवर पाऊलेही रक्तरंजीत होतात. असाच प्रसंग तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या धामक येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर ओढवला आहे. गावात सुरू असलेल्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचाच बळी जात आहे. तीन हजार लोकसंख्या असलेले धामक हे गाव. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत जमिनीचे क्षेत्रफळ अधिक. या गावातील शेतकऱ्यांकडे ४ हजार २५० एकर जमीन आहे. बहुतांश जमीन ओलिताखाली आहे. परंतु दरवर्षी महापुराचा वेढा या गावाला होत असल्याने सन २००२ मध्ये शासनाने ग्रामस्थाचे एक किलोमिटर अंतरावर पुनर्वसन केले. परंतु या प्रक्रियेमध्ये तब्बल १४ वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरीच भरडला जात आहे. धामक येथे ५५१ कुटूंब वास्तव्याला आहेत. यापैकी २१५ कुटुंबांचाच पुनर्वसनात समावेश झाला. त्यामुळे उर्वरित कुटुंंबांना पुनर्वसनात समावेश होतो की नाही, याबाबत शंकाच होती. पण, २८ आॅगस्ट २०१५ रोजी संपूर्ण धामक गावाचा पुनर्वसनात समावेश करुन धामक गावाला ‘मॉडेल’ गाव बनविणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. त्यामुळे धामकमधील उर्वरित कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या आशा पल्लवित झाल्या व प्रशासनानेही कामकाजाचा वेग वाढविला. पण, गावात आपलेच राजकीय अस्तित्व राहावे, या स्वार्थापायी गावातील दोन्ही राजकीय गटांनी वेगवेळ्या ठिकाणी पुर्नवसनाची मागणी केली. यामध्ये शेतकऱ्यांचे हित कोठेच जोपासले गेले नाही, हे विशेष. येथील शेतकऱ्यांची बहुतांश जमिन नवीन पुनर्वसनानजीक असल्याने सन २००२ मध्ये स्थापित पुनर्वसनातच समावेश व्हावा, अशी १३१ शेतकऱ्यांची मागणी आहे. तीन वर्षांपासून सतत दुष्काळी स्थिती आहे. तरी येथील शेतकरी मात्र ओलिताची सोय असल्यामुळे समृद्ध आहे. परंतु गावानजीकच्या जमिनीपासून हा शेतकरी १० किमी. अंतरावर पुनर्वसित झाला तर त्यांना शेती करणे फार अडचणीचे होईल.पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील सहा महिन्यात प्रशासकीय पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी, एचडीओ विविध अधिकारी तसेच पालकंमत्री, खासदार, आमदारांनी गावाला भेटी देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण, गावातील राजकीय दुहीमुळे सर्व प्रयत्न फोल ठरले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्च रोजी गावातच आमसभा घेऊन ५०० नागरिक ज्या बाजूने निर्णय देतील त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता पुनर्वसनाचा निर्णय धामकवासीयांनाच घ्यावयाचा आहे. नेमका कोणता निर्णय होतो, याकडे नजरा आहेत.