शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

्नराजकीय अस्तित्वाच्या लढाईत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा बळी

By admin | Updated: March 10, 2016 00:27 IST

फुलांचा मार्ग मिळवण्याच्या आशेवर बरेचदा काटेरी वाटही तुडवावी लागते. अन त्या तीक्ष्ण काटेरी वाटेवर पाऊलेही रक्तरंजीत होतात.

मनोज मानवतकर नांदगाव खंडेश्वरफुलांचा मार्ग मिळवण्याच्या आशेवर बरेचदा काटेरी वाटही तुडवावी लागते. अन त्या तीक्ष्ण काटेरी वाटेवर पाऊलेही रक्तरंजीत होतात. असाच प्रसंग तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या धामक येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर ओढवला आहे. गावात सुरू असलेल्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचाच बळी जात आहे. तीन हजार लोकसंख्या असलेले धामक हे गाव. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत जमिनीचे क्षेत्रफळ अधिक. या गावातील शेतकऱ्यांकडे ४ हजार २५० एकर जमीन आहे. बहुतांश जमीन ओलिताखाली आहे. परंतु दरवर्षी महापुराचा वेढा या गावाला होत असल्याने सन २००२ मध्ये शासनाने ग्रामस्थाचे एक किलोमिटर अंतरावर पुनर्वसन केले. परंतु या प्रक्रियेमध्ये तब्बल १४ वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरीच भरडला जात आहे. धामक येथे ५५१ कुटूंब वास्तव्याला आहेत. यापैकी २१५ कुटुंबांचाच पुनर्वसनात समावेश झाला. त्यामुळे उर्वरित कुटुंंबांना पुनर्वसनात समावेश होतो की नाही, याबाबत शंकाच होती. पण, २८ आॅगस्ट २०१५ रोजी संपूर्ण धामक गावाचा पुनर्वसनात समावेश करुन धामक गावाला ‘मॉडेल’ गाव बनविणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. त्यामुळे धामकमधील उर्वरित कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या आशा पल्लवित झाल्या व प्रशासनानेही कामकाजाचा वेग वाढविला. पण, गावात आपलेच राजकीय अस्तित्व राहावे, या स्वार्थापायी गावातील दोन्ही राजकीय गटांनी वेगवेळ्या ठिकाणी पुर्नवसनाची मागणी केली. यामध्ये शेतकऱ्यांचे हित कोठेच जोपासले गेले नाही, हे विशेष. येथील शेतकऱ्यांची बहुतांश जमिन नवीन पुनर्वसनानजीक असल्याने सन २००२ मध्ये स्थापित पुनर्वसनातच समावेश व्हावा, अशी १३१ शेतकऱ्यांची मागणी आहे. तीन वर्षांपासून सतत दुष्काळी स्थिती आहे. तरी येथील शेतकरी मात्र ओलिताची सोय असल्यामुळे समृद्ध आहे. परंतु गावानजीकच्या जमिनीपासून हा शेतकरी १० किमी. अंतरावर पुनर्वसित झाला तर त्यांना शेती करणे फार अडचणीचे होईल.पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील सहा महिन्यात प्रशासकीय पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी, एचडीओ विविध अधिकारी तसेच पालकंमत्री, खासदार, आमदारांनी गावाला भेटी देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण, गावातील राजकीय दुहीमुळे सर्व प्रयत्न फोल ठरले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्च रोजी गावातच आमसभा घेऊन ५०० नागरिक ज्या बाजूने निर्णय देतील त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता पुनर्वसनाचा निर्णय धामकवासीयांनाच घ्यावयाचा आहे. नेमका कोणता निर्णय होतो, याकडे नजरा आहेत.