शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
7
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
8
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
9
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
10
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
11
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
12
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
13
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
14
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
16
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
17
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
18
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
19
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
20
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात ‘लॉकडाऊन’चा बळी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST

अनिल कडू। लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : शहरातील एका आॅटोरिक्षाचालकाचा १५ मे रोजी मृत्यू झाला. लॉकडाऊनच्या काळात बुडालेला रोजगार, ...

ठळक मुद्देरोजगार, धान्याची विवंचना : पत्नीकडे, मित्रांजवळ केल्या होत्या भावना व्यक्त

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरातील एका आॅटोरिक्षाचालकाचा १५ मे रोजी मृत्यू झाला. लॉकडाऊनच्या काळात बुडालेला रोजगार, आर्थिक विवंचना आणि कुटुंबाची चिंता या बाबींनी ब्रेन हॅमरेज होऊन त्यांचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, सामाजिक स्तरावर हा टाळेबंदीचा बळी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राजेश माहोरे (४७, रा. गोपालनगर) असे मृताचे नाव आहे.राजेश माहोरे हे निर्व्यसनी होते. घरची परिस्थिती हलाखीची होती. हातमजूरीशीवाय दुसरा पर्याय नाही. मुलगा, मुलगी व पत्नी आणि धाकटा भाऊ एवढे छोटे कुटुंब. यात पत्नी दोन चार घरी जाऊन स्वयंपाक करते. मुलगा किराणा दुकानात मिळेल ते काम स्वीकारतो. लहान भाऊ खेडोपाडी जाऊन मोबाईलचे सिमकार्ड विकतो. पण, कोरोना लॉकडाऊनमुळे ते सर्व थांबले. गाठीशी असलेल्या पैशांतून राजेशने कुटुंबाचा गाडा हाकला. स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, आरसी नंबर नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदाराने धान्य दिले नाही. आता लॉकडाऊन उठले नाही, तर काही खरे नाही, मरणाशिवाय पर्याय नाही, अशी खंतही राजेश माहोरे यांनी आपल्या सवंगड्यांकडे मृत्यूपूर्वी अनेकदा व्यक्त केली.धान्यासाठी त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. याच मानसिक ताणतणावात आणि कुटुंबाच्या विवंचनेत ते खचले. १४ मे रोजी त्याची प्रकृती बिघडली. शेजारच्या मंडळींनी त्यांना परतवाडा येथील खाजगी रुग्णालयात आणि त्याच दिवशी सायंकाळी अमरावती येथे जिल्हा सामान्य रू ग्णालयात दाखल केले. तेथे बे्रन हॅमरेजचे निदान झाले. मात्र, १५ मे रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच दिवशी परतवाड्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. शेजारी, मित्रमंडळींनी वर्गणी गोळा केली. त्यांच्या घरी जीवनावश्यक वस्तूंसह किराणा पुरविला. मात्र, आता हे कुटुंब उघड्यावर आले आहे.लॉकडाऊनमुळे रोजगाराअभावी ते आर्थिक विवंचनेत होते. तणावाखाली होते. सतत कुटुंबाची काळजी करायचे. विचारात राहायचे. अचानक तब्येत बिघडली आणि उपचारादरम्यान ते गेले. लॉकडाऊन नसता, तर असे घडले नसते.- पिंगळा माहोरेमृताची पत्नीलॉकडाऊनमध्ये आॅटोरिक्षा बंद आहेत. यात राजेश माहोरेंचा रोजगार बुडाला. आर्थिक संकटाचा सामना करीत ते गतप्राण झाले.- विजू उखळकर, आॅटोचालक मित्र, ब्राम्हणसभा, परतवाडाआॅटोरिक्षा बंद. रोजगार गेला. रेशन दुकानदाराने आरसी नंबर नाही म्हणून शिव्या देत हाकलले. धान्य दिले नाही. धान्याकरिता तो माझ्याजवळ रडला. काही खरे नाही, आता मरायची वेळ आली आहे, असेही तो बोलला होता.- राजेश गवळी, मित्र, परतवाडाघटना दु:खद आहे. धान्य न देणाऱ्या दुकानदाराविरुद्ध निश्चित कारवाई करण्यात येईल. मृताच्या कुटुंबीयांना मदत केली जाईल.- मदन जाधव, तहसीलदार.मृत रुग्णाविषयी सध्या काही सांगता येणार नाही. बुधवारी उपजिल्हा रुग्णालयातील दस्तावेज बघून माहिती देता येईल.- डॉ. सरवत वर्मा, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या