शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

सात तास टॉवरवर वीरुगिरी

By admin | Updated: July 8, 2014 23:13 IST

शेतामध्ये सुरु असणाऱ्या टॉवर लाईनच्या कामामुळे होणाऱ्या नुकसानामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात टॉवरवर चढून तब्बल सात तास ‘वीरुगिरी’ आंंदोलन केले.

अमरावती : शेतामध्ये सुरु असणाऱ्या टॉवर लाईनच्या कामामुळे होणाऱ्या नुकसानामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात टॉवरवर चढून तब्बल सात तास ‘वीरुगिरी’ आंंदोलन केले. नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहत परिसरातील सोफिया विद्युत प्रकल्पाच्या टॉवर लाईनचे काम सुरु आहे. या टॉवरचे काम आष्टी, वायगाव, जावरा, कामनापूर आणि वलगाव या परिसरातही सुरुआहे.'शेती कामे खोळंबलीया कामामुळे टॉवरवरची विद्युत लाईन अनेक शेतकऱ्यांच््या शेतीमधुन गेली आहे. विद्युत तार टाकण्याचे काम सुरु असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये विद्युत तारा खाली पडुन आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहे. या विद्युत तारा उचलण्यात याव्या अशी मागणी मागील काही महीन्यापासुन शेतकरी करीत आहे.याकरीता शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार केली आहे.मात्र अद्यापही कोणतीही कारवाई केली गेली नाही. आता पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतीमध्ये पेरणी करण्याचे काम सुरु आहे.मात्र शेतात पडलेल्या विद्युत तारेमुळे पाच गावामध्ये असणाऱ्या शेतातील पेरणीचे कामे खोळबंली आहे. अनेक वेळा निवेदने व तक्रारीकरुनही विद्युत तारा उचलल्या जात न गेल्याने मंगळवारी सकाळी ८.४५ वाजता प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छोटु वसु यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी वायगावातील टॉवरवर चढुन विरुगीरी आंदोलन सुर केले.जोपर्यंत टॉवर लाईनचे तारा हटविण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची घोषणा प्रहार कार्यकर्त्यांनी केली. या आंदोलनाची माहिती वलगाव पोलीसांना मिळताच पोलीसाचा ताफा वायगावात दाखल झाला. पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना टॉवरवरुन खाली उतरविण्याचे प्रयत्न केले मात्र आधी विद्युत तारा उचला व नुकसान भरपाई द्या अशी मागणी प्रहार कार्यकर्त्यांनी रेटुन धरली होती. पोलीसांनी या आंदोलनात दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास टॉवरवरुन उडी टाकण्याची धमकी आंदोलनकर्त्यानी यावेळी दीली.शेवटी दुपारी ४ वाजता दरम्यान इंडिया बुल कंपनीचे अधिकारी व तहसीलदार यांच्या निर्देशाहुन पटवारी व अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दोन दिवसाच्या आत शेतकऱ्यांना शेतीचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्यावर आंदोलनकर्ते टॉवरहुन खाली उतरले.