शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाह पान! अंबानगरीत रोज दीड लाख खवय्यांचं रंगतं पान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 17:55 IST

पान म्हणजे अनेकांच्या जीव्हाळ्याचा विषय. लग्न समारंभ असो की उत्सव चटकमटक जेवणानंतर पानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पानाचे विविध प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर, पान खाण्याऱ्यांचीही संख्या बरीच मोठी आहे.

ठळक मुद्देदोन ते तीन लाखांचा गल्ला

अमरावती : पानाचं आणि अमरावतीकरांचं नातं तसं जुनंच आहे. अगदी या खाण्याच्या पानामध्येही आर्थिक गणित दडलंय. पानाच्या एका विड्यात दोन पाने असतात. त्यानुसार शहरासह जिल्ह्यात दररोज दीड लाख खवय्यांचं पानं रंगतं. एका करंडीत जवळपास तीन हजार पाने असतात. त्यानुसार आठवड्याला दीड ते दोन हजार करंड्या विकल्या जात असल्याची माहिती आहे.

करंडीतील तीन हजार पानांचा दर त्यांचा लहान-मोठा आकार पाहून ठरत असतो. मोठ्या पानाची करंडी जादा दराने विकली जाते. आठवड्याला ४०० ते ५०० करंड्या विकल्या जातात. प्रत्येक करंडीत सुमारे तीन हजार पानं असतात. किरकोळ विक्री करताना शेकड्याने पाने विकली जातात.

अमरावतीचं मार्केट

अमरावतीत आठड्यातून तीन ते चार दिवस बाजार समितीत पानांचा लिलाव होतो. साधारणत: पान टपरीवर विकली जाणारे पान नागपूरहून येतात, शिवाय आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथूनही अमरावतीत पानं येतात.

बनारस, कलकत्ता, कपूरी पानाचे लाखावर खवय्ये

जिल्ह्यात कलकत्ता, बनारस, कपूरी या पानांचे लाखावर खवय्ये आहेत. त्यामुळे पानाची क्रेझ आजही कायम आहे. शहर आणि ग्रामीण भागात पानविक्रीच्या व्यवसायाचं गणित पकडलं तर रोज दोनशे पानांच्या करंड्या विकल्या जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गुटख्यामुळे या व्यवसायावर संकट ओढावले आहे.

चार ते पाच मुख्य विक्रेते

अमरावतीत पानविक्री करणारे चार ते पाच मुख्य विक्रेते आहेत. आंध्र प्रदेशातून येणारे पान रेल्वे किंवा महामार्गाने येतात. पानांची तशी फारशी चर्चा होत नसली तरी हा लाखोंचा व्यवसाय असून शहरातील काही विशिष्ट भागात पानांना चांगली माणगी असते.

टॅग्स :Socialसामाजिकfoodअन्नcultureसांस्कृतिक