शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

कोरडवाहू अभियानासाठी समन्वयातून प्रयन्न

By admin | Updated: November 18, 2014 22:48 IST

जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबविले जाते. परंतु या अभियानात काही अडचणी आल्यामुळे पाहीजे

अमरावती : जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबविले जाते. परंतु या अभियानात काही अडचणी आल्यामुळे पाहीजे त्या प्रमाणात जिल्हयात प्रगती झाली नव्हती त्यामुळे आता कोरडवाहू अभियान जिल्हयात अधिक प्रभावीपणे आणी यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग आणी शेतकरी यांच्या समन्वयातुन प्रयन्न करण्यावर भर दिला जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे .कोरडवाहू अभियान जिल्ह्यात माघारल्याचे वास्तव लोकमतने सोमवारी लोकदरबारात मांडले होते. त्यामुळे आता कोरडवाहू अभियनात कृषी विभागाला जो शेतकऱ्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद लोकसहभागाची अट असल्यामुळे मिळत नाही परिणामी अभियानाच्यासाठी कितीही प्रयन्न केले तरी पाहीजे तो प्रतिसाद मिळत नाही यामुळे या अभियानासाठी शासनाकडून ३ कोटींहून अधिक निधी उपलब्ध असतानाही हा निधी खर्च करण्यास अडचणी आहेत .परंतु मागील वर्षीपेक्षा यंदा कोरडवाहू अभियान यशस्वी करण्याचासाठी कृषी विभाग जोमाने कामाला लागला आहे .यासाठी या अभियानाच्या माध्यमातुन राबविण्यात येणारे जवळपास सहा प्रकारचे उपक्रम राबविले जातात. मनुष्यबळ विकास कार्यक्रम, गटसंघटन, सिंचन प्रक्रियेमध्ये तुषार व ठिबक सिंचन, प्राथमिक कृषी प्रक्रिया यांत्रिकीकरण अशा सर्वच उपक्रमामध्ये जास्तीत जास्त शेतकरी कसे सहभागी होतील यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणी शेतकरी यांच्या समन्वयातुन आवश्यक ते उपाय योजना करण्याची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे . अमरावती जिल्ह्यात कोरडवाहू शेती अभियानासाठी नऊ तालुक्यांतून १३ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये कोरडवाहू क्षेत्र आहे आणि उपाययोजना केल्या तरी सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही, असे क्षेत्र नेहमीसाठीच कोरडवाहू राहते. या क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी विविध योजना राबविल्या जातात या योजनाअधिक प्रभावी पणे राबवून त्या यस्ववी करण्यात येणार आहे शासनाकडून ज्या गावांची निवड या अभियानासाठी केली आहे, त्या गावांमध्ये दरवर्षी विविध योजनांवर १ कोटी रुपये खर्च केला जातील. (प्रतिनिधी)