शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

मन:शांतीसाठी सामुदायिक ध्यानाची नितांत आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

कमलेश पटेल पुढे म्हणाले, पूर्वसंस्कारांमुळे मानवाला सुख-दु:ख येते. मानवी जीवनात माणसावर, समाजावर, देशावर संकटे, आपत्ती येतच असतात. या संकटांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी साधनेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मानवाचे मन मजबूत होऊन संकटकाळी सामना करू शकतो. लाखो लोकांना ध्यानाच्या माध्यमातून येणाऱ्या संकटाचा सक्षमपणे मुकाबला करता येतो.

ठळक मुद्देकमलेश पटेल। राष्ट्रसंतांचा ५१ वा पुण्यतिथी महोत्सव; सामुदायिक ध्यानावर चिंतन, हजारो गुरुदेवभक्तांची गुरुकुंजात मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : मानवी मन चंचल आहे. त्यामुळे ते एकप्रकारे दुश्मनही आहे आणि दोस्तसुद्धा आहे. या मानवी मनाच्या चंचलतेला सामुदायिक ध्यानाच्या माध्यमातून दिशा देऊन ईश्वरप्राप्ती होऊ शकते, असे प्रतिपादन हार्टफुलनेस या संस्थेचे संचालक डॉ. कमलेश पटेल यांनी केले. राष्ट्रसंतांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवात शनिवारी त्यांनी सामुदायिक ध्यानावरील चिंतन प्रस्तुत केले.कमलेश पटेल पुढे म्हणाले, पूर्वसंस्कारांमुळे मानवाला सुख-दु:ख येते. मानवी जीवनात माणसावर, समाजावर, देशावर संकटे, आपत्ती येतच असतात. या संकटांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी साधनेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मानवाचे मन मजबूत होऊन संकटकाळी सामना करू शकतो. लाखो लोकांना ध्यानाच्या माध्यमातून येणाऱ्या संकटाचा सक्षमपणे मुकाबला करता येतो. नुसती शरीराची सफाई करून भागणार नाही, तर मनसुद्धा पवित्र आणि साफ ठेवले पाहिजे. त्याशिवाय ध्यानाचा परिणाम जाणवणार नाही. मानवाचे शारीरिक व मानसिक असे आरोग्याचे दोन भाग आहेत. शारीरिक आजार दिसून येतो; परंतु मानसिक आजार दिसून येत नाही. सध्या मानसिक आजारात वाढ झाली आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सामुदायिक ध्यान आवश्यक असून, त्याद्वारे संकल्प पार पाडले जाऊ शकतात, असे कमलेश पटेल म्हणाले.ग्रामगीताचार्य पदवीदान, सत्कारग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाने शुक्रवारी ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ आयोजित केला होता. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थ काने, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपसर्वाधिकारी लक्षमण गमे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे अध्यक्ष केशवदास रामटेके, प्रदीप विटाळकर, ममता इगोले, पौर्णिमा सवाई, रामदास देशमुख, विठ्ठलराव सावरकर, ज्ञानेश्वर मुडे, विलास साबळे, भानुदास कराळे, कांताप्रसाद मिश्रा, अशोक कोठारी यांचीसुद्धा उपस्थिती होती. डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल (यवतमाळ), अनुताई कपाळे (गुरुदत्तनगर), शुभांगी वानखडे (नागपूर), इंदिरा पाळेकर (गुसुदेवनगर), ज्ञानेश्वर घाटोळ (मोर्शी), मोहन गाखरे (उमरी), विठ्ठल उमप (शेंदोळा खुर्द), योगिता भुसारी (रहाटगाव), रामकृष्ण राऊत (नेरी), स्वाती पाटखेडे (अकोला), स्मिता केंडे (वरूड), सुधीर मते (घोणसा), शोभा गावनेर (लहानी आर्वी), उमाकांत म्हसे (वणी), सुरेश कांडलकर (अमरायती), वर्षा भोसे (वरूड), संजय क्षीरसागर (कारंजा लाड), उज्ज्वला हुकूम (गुंथळा), अलका बढिये (नाचनगाव), नागोराव काकपुरे (यवतमाळ), संध्या धामणकर (गुरुदेवनगर), मीराबाई फुसे (जरूड), राजू भोंगडे (नवेगाव) याना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रामगीताचार्य पदवी प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक ग्रामगीता जीवन विकास परीक्षाचे सचिव गुलाब खबसे यांनी केले. संचालन श्रीगुरुदेव प्रकाशन विभागाचे प्रमुख गोपाल कडू यांनी केले.आज दिंड्यांची ग्रामप्रदक्षिणामहोत्सवातील शेवटच्या दिवशी २० ऑक्टोबर रोजी सकाळी ६.४0 पासून गुरुकुंज आश्रम ते मोझरी दिंडी पालख्यांची ग्राम प्रदक्षिणा होणार आहे. दुपारी ३ ते ५.३० या वेळेत व्यायाम संमेलन व व्यायाम प्रात्यक्षिके होतील.