शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रणमुक्त युरिया पोहोचणार ५६८ रुपयांवर!

By admin | Updated: February 15, 2015 00:12 IST

काही वर्षांपासून युरिया शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर राजकीयदृष्ट्या कळीचा मुद्दा बनला आहे. आता तर केंद्र सरकारद्वारा पुढील तीन वर्षात ...

अमरावती : काही वर्षांपासून युरिया शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर राजकीयदृष्ट्या कळीचा मुद्दा बनला आहे. आता तर केंद्र सरकारद्वारा पुढील तीन वर्षात रुरिया टप्प्याटप्प्याने नियंत्रणमुक्त करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती आहे. असे झाल्यास नियंत्रणमुक्त युरियाची ५० किलोची बॅगस तब्बल ५६८ रूपयांना शेतकऱ्यांना खरेदी करावी लागणार आहे. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. रासायानिक खतेविषयक मंत्रालयाने तयार केलेल्या योजनेत खरीप व रबी हंगामापूर्वी प्रतिवर्षी १० टक्के युरियाची किंमत वाढविली जाणार आहे. सध्या २८४ रूपयांत युरियाची बॅग विक्री होत आहे. यामध्ये ५० टक्के सबसीडी अंतर्भूत आहे. जन धन योजना व आधारकार्डाचा उपयोग करून यासंबंधीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ळे पोहचविण्याची शासनाची योजना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु युरिया खरेदी करतेवेळी दुकानदारास रोख रक्कम द्यावी लागणार आहे. आधीच युरियाच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यात किमती वाढल्यास शेतकऱ्यासमोर नवीन संकट उभे राहणार आहे. युरियाचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी केंद्र सरकार या प्रस्तावाला मंजुरी देणार असल्याची शक्यता आहे, असे झाल्यास शेतकऱ्यांना अनेक समस्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होईल. (प्रतिनिधी)