शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

शहरी दारिद्रय़ निर्मुलनाचा संकल्प!

By admin | Updated: August 23, 2014 22:39 IST

अमरावती विभागातील सहा शहरांचा समावेश

वाशिम: शहरी भागातील दारिद्रय़ावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने 'शहरी गरीब व फेरिवाल्यांसाठी राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान' १७ ऑगस्टपासून हाती घेतले असून, यामध्ये अमरावती विभागातील सहा शहरांचा समावेश आहे. विविध उपक्रमातून वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, अचलपूर व यवतमाळ शहरातील गोरगरीबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प शासनाने यानिमित्ताने सोडला आहे.बदलत्या काळानुसार मनुष्याच्या जीवनमानातही बदल होत आहेत; मात्र बदलाचे समप्रमाण नसल्याने श्रीमंत-गरीबातील दरी वाढतच आहे. ही दरी कमी करण्यासाठी शासनाकडून विविध अभियान व उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान हाती घेऊन शासनाने शहरी भागातील गरीब, बेघर व फेरीवाल्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. शहरी दारिद्रय़ाचे प्रमाण कमी करणे, शहरी गरीब कुटुंबातील व्यक्तिंना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराची संधी देणे, नागरी बेघरांना मुलभूत सेवांसह निवार्‍याची सुविधा देणे, फेरिवाल्यांच्या उपजिविकेसंबंधीच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे आदी उद्देश या अभियानामागे ठेवण्यात आले आहेत. अमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, अचलपूर आणि यवतमाळ या सहा शहरांसह राज्यातील एकूण ५२ शहरांचा या अभियानात समावेश आहे.त्यासाठी एका प्राथमिक सर्वेक्षणानुसार शहरांमधील गरीब कुटुंब, फेरीवाले आणि बेघर कुटुंबांचा शोध घेतला जाणार आहे.त्यानंतर बेघरांना निवारा देण्याची प्रक्रीया, कौशल्य विकास प्रशिक्षणातून गरीब कुटुंबातील व्यक्तिंना रोजगारासाठी तयार करणे, स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे आदी बाबी या अभियानातून साध्य करण्याचा शासनाचा मानस आहे. कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण, बेघरांना निवारा आणि फेरिवाल्यांवर लक्ष केंद्रीत करून शहरी दारिद्रय़ाचे प्रमाण कमी करण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून शासनाने सोडला आहे.