शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

'नगरविकास'चा निधी थेट महापालिकांच्या खात्यात

By admin | Updated: June 14, 2016 00:11 IST

महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना मंजूर झालेला निधी कोणतीही कपात न करता वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

कपात न करण्याची सूचना : जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशप्रदीप भाकरे अमरावतीमहापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना मंजूर झालेला निधी कोणतीही कपात न करता वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नगरविकास विभागाकडून नगारी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध योजनांच्या अनुषंगाने निधी दिला जातो. या निधीच्या तत्काळ वितरणासाठी प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता व निविदा प्रसिद्धीचे मार्गदर्शक तत्त्वे नव्याने जाहीर करण्यात आली आहेत. नव्या निकषाने महापालिकेकडे नगरपरिषद आणि नगरपंचायतींना तत्काळ निधी मिळण्याचा मार्ग प्रशस्त बनला आहे.नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मंजूर करण्यात आलेला निधी वितररित करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. मात्र, वितरणात कुचराई केली जात असल्याची बाब उघड झाली आहे. शासनाकडून मंजूर निधी अद्यापही वितरित करण्यात आलेला नाही. आणि निधीमध्ये कपात करण्यात आल्याचे निरीक्षण शासनाने नोंदविला आहे. लेटलतिफीने विकासकामांसाठी दिलेल्या निधीचा विहित कालावधीत विनियोग होत नाही. त्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांसाठी खास सूचना प्रसृत केल्या आहेत. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस संबंधित कार्यान्वयात यंत्रणेलादेखील निधी देताना कोणत्याही प्रकारची कपात न करता वितरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. - तर निधी शासन दरबारी जमातांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था/कार्यान्वित यंत्रणेला सात दिवसांमध्ये निविदा प्रसिद्ध करणे बंधनकारक राहणार आहे. शासनाकडून निधी वितरित झाल्यापासून तीन महिन्यांत निविदा अंतिम करून कार्यादेश देण्यास संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यान्वयन यंत्रणा अपयशी ठरल्यास तो निधी अन्य यंत्रणेकडे हस्तांतरित होईल, अथवा शासनजमा होईल, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत.सात दिवसांत निधी वितरणयापुढे नगर विभागाकडून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मंजूर करण्यात येणारा निधी कोषागाराकडून जास्तीत जास्त १० दिवसांत आवंटीत करण्यात यावा, हा निधी आवंटित झाल्याच्या दिनांकापासून सात दिवसांमध्ये संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यान्वयन यंत्रणेकडे कोणतीच कपात न करता हस्तांतरित करण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.वीस दिवसांत प्रशासकीय मान्यतानागरी स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यान्वयन यंत्रणा यांना निधी प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रकरणी त्यांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे, अशाप्रकरणी १५ दिवसांमध्ये तांत्रिक मान्यता घेऊन, सक्षम प्राधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करावा.