शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

उर्ध्व वर्धा, सपन, पूर्णा फुल्ल

By admin | Updated: August 2, 2016 00:07 IST

यंदा सरासरीपेक्षा अधिक व धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा व सपन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले त..

तीन प्रकल्पांची दारे उघडली : ८२ प्रकल्पांमध्ये ८०.३८ टक्के जलसाठा अमरावती : यंदा सरासरीपेक्षा अधिक व धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा व सपन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले तर मध्यप्रदेशातून पाण्याची आवक (येवा) वाढल्याने उध्व वर्धा धरणाचे सर्वच १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यात ८२ प्रकल्प आहेत. यामध्ये एकूण प्रकल्पित संकलित ९०५ दलघमी पातळीच्या तुलनेत १ आॅगस्ट रोजी ७२७.५२ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. ही टक्केवारी ८०.३८ इतकी आहे. शहानूर प्रकल्पात ४६.४ संकल्पित जलसाठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ३३.०२ दलघमी जलसाठा आहे. ही टक्केवारी ७१.७२ इतकी आहे. चंद्रभागा प्रकल्पात संकल्पित साठ्याच्या तुलनेत सध्या २१.७२ दलघमी जलसाठा आहे. तर सपन प्रकल्पात ३८.६० संकल्पित जलसाठ्याच्या तुलनेत २६.६५ दलघमी जलसाठा आहे. ही टक्केवारी ६९.०४ इतकी आहे. मागील २४ तासांत १८.७ मिमी पाऊस पडला. सर्वाधिक ५१ मिमी पाऊस नांदगाव तालुक्यात पडला. या तालुक्यात लोणी व माहुली (चोर) या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. अमरावती १० मिमी, भातकुली ४.८ मिमी, चांदूररेल्वे २३.६, धामणगाव ४, तिवसा १६, मोर्शी १९.२, वरूड २.४, अचलपूर २०.२, चांदूरबाजार ५, दर्यापूर २९.६, अंजनगाव सुर्जी २८, धारणी ११.४ व चिखलदरा तालुक्यात ३७.२ मिमी पाऊस पडला. १ जून ते १ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ४२९.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना सद्यस्थितीत ६५०.८ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी १५१.५ टक्केवारी आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ७९९.९ टक्के आहे. उध्ववर्धाचे १३ दरवाजे उघडले मध्यप्रदेशातून पाण्याची आवक वाढल्याने धरणात ८० टक्के साठा झाला आहे. धरणाच्या सुरक्षेचा उपाय म्हणून सोमवारी सकाळी १० वाजता १३ दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आलेत. यामधून १०३० घनमिटर प्रती सेंकदनुसार पाण्याचा विसर्ग होत आहे.१५ कुटूंबांना हलविलेमोर्शी तालुक्यात चारघड नदीला पूर आल्यामुळे उमरखेड गावातील ३ घरात पाणी शिरले. याच नदीच्या पुरामुळे घाटलाडकी व बेलमंडळी या गावांचा संपर्क शनिवारी तुटला होता व गावातील घरांमध्ये पाणी शिरले. अशा एकूण १५ कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.काही घरांची पडझड झाली आहे. मोर्शी येथील दमयंती नदीला आलेल्या पुरात येथील आशुब मेहबुब पठाण हा १२ वर्षांचा मुलगा वाहून गेला. शोध व बचाव पथकाद्वारा त्याचा शोध घेणे सुरू आहे.