शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

उर्ध्व वर्धा, सपन, पूर्णा फुल्ल

By admin | Updated: August 2, 2016 00:07 IST

यंदा सरासरीपेक्षा अधिक व धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा व सपन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले त..

तीन प्रकल्पांची दारे उघडली : ८२ प्रकल्पांमध्ये ८०.३८ टक्के जलसाठा अमरावती : यंदा सरासरीपेक्षा अधिक व धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा व सपन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले तर मध्यप्रदेशातून पाण्याची आवक (येवा) वाढल्याने उध्व वर्धा धरणाचे सर्वच १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यात ८२ प्रकल्प आहेत. यामध्ये एकूण प्रकल्पित संकलित ९०५ दलघमी पातळीच्या तुलनेत १ आॅगस्ट रोजी ७२७.५२ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. ही टक्केवारी ८०.३८ इतकी आहे. शहानूर प्रकल्पात ४६.४ संकल्पित जलसाठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ३३.०२ दलघमी जलसाठा आहे. ही टक्केवारी ७१.७२ इतकी आहे. चंद्रभागा प्रकल्पात संकल्पित साठ्याच्या तुलनेत सध्या २१.७२ दलघमी जलसाठा आहे. तर सपन प्रकल्पात ३८.६० संकल्पित जलसाठ्याच्या तुलनेत २६.६५ दलघमी जलसाठा आहे. ही टक्केवारी ६९.०४ इतकी आहे. मागील २४ तासांत १८.७ मिमी पाऊस पडला. सर्वाधिक ५१ मिमी पाऊस नांदगाव तालुक्यात पडला. या तालुक्यात लोणी व माहुली (चोर) या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. अमरावती १० मिमी, भातकुली ४.८ मिमी, चांदूररेल्वे २३.६, धामणगाव ४, तिवसा १६, मोर्शी १९.२, वरूड २.४, अचलपूर २०.२, चांदूरबाजार ५, दर्यापूर २९.६, अंजनगाव सुर्जी २८, धारणी ११.४ व चिखलदरा तालुक्यात ३७.२ मिमी पाऊस पडला. १ जून ते १ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ४२९.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना सद्यस्थितीत ६५०.८ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी १५१.५ टक्केवारी आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ७९९.९ टक्के आहे. उध्ववर्धाचे १३ दरवाजे उघडले मध्यप्रदेशातून पाण्याची आवक वाढल्याने धरणात ८० टक्के साठा झाला आहे. धरणाच्या सुरक्षेचा उपाय म्हणून सोमवारी सकाळी १० वाजता १३ दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आलेत. यामधून १०३० घनमिटर प्रती सेंकदनुसार पाण्याचा विसर्ग होत आहे.१५ कुटूंबांना हलविलेमोर्शी तालुक्यात चारघड नदीला पूर आल्यामुळे उमरखेड गावातील ३ घरात पाणी शिरले. याच नदीच्या पुरामुळे घाटलाडकी व बेलमंडळी या गावांचा संपर्क शनिवारी तुटला होता व गावातील घरांमध्ये पाणी शिरले. अशा एकूण १५ कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.काही घरांची पडझड झाली आहे. मोर्शी येथील दमयंती नदीला आलेल्या पुरात येथील आशुब मेहबुब पठाण हा १२ वर्षांचा मुलगा वाहून गेला. शोध व बचाव पथकाद्वारा त्याचा शोध घेणे सुरू आहे.