शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

‘लोकमत रक्ताचं नातं’ लोगोचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 05:00 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. या बिकट स्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. अशा समयी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव अवश्य वाचणार आहे. - विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा.

ठळक मुद्दे२ जुलैपासून रक्तदान महायज्ञ : रक्तदान करून जीव वाचविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेला प्रारंभ होत आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यभरात रक्तदानाचा महायज्ञ होत आहे. चंद्रपूरात या मोहिमेच्या लोगोचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जि.प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राजकुमार गहलोत, रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अनंत हजारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. अविनाश टेकाडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हाभरातील रक्तदाते व विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. रक्ताची रुग्णांना सातत्याने गरज भासत आहे. रक्त हे कोणत्याही कंपनीत उत्पादीत होत नसल्याने रक्तदानाशिवाय रक्तसंकलन होणे शक्य नाही. कोरोनाकाळात रक्तदान शिबिरांवरही परिणाम झाल्यामुळे रक्ताची कमतरता जाणवायला लागली आहे. आता ती कमतरता भरुन काढण्यासाठी अशा रक्तदान मोहिमेची गरज आहे. ‘लोकमत’च्या स्तुत्य उपक्रमात सर्वांनी ‘हेच कार्य महान’ ही भूमिका निभवण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, आभार लोकमतचे चंद्रपूर शाखा व्यवस्थापक विनोद बुले व लोकमत सखी मंच संयोजिका सोनम मडावी यांनी केले.

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. या बिकट स्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. अशा समयी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव अवश्य वाचणार आहे.- विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा. 

लोकमतच्या या उपक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन ‘लोकमत’ने या उपक्रमात रक्ताचं नातं जोपासण्याचा ध्यास घेतला आहे. आपणही रक्तदान करून कुणाचा तरी जीव वाचवून रक्ताचं नातं तयार करू शकतो. ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा अतिशय मौल्यवान उपक्रम आहे.- संध्या गुरुनुले, अध्यक्ष, जि.प. चंद्रपूर. 

सध्या महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे. यासोबतच जिल्ह्यातही दररोज सरासरी ५० बाॅटल रक्ताची गरज कुणाला तरी वाचिवण्यासाठी भासत आहे. रक्ताची मागणी वाढते आहे. मात्र रक्ताचा अपेक्षित पुरवठा होण्यास अडचण होत आहे. रक्तदानातूनच ही गरज पूर्ण करता येणे शक्य आहे. लोकमतने हाती घेतलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा अमुल्य अशा उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे. ही काळाचीही गरज आहे.- अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर. 

टॅग्स :LokmatलोकमतBlood Bankरक्तपेढी