शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत शाळा, महाविद्यालयांना टाळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत काही अंशी शिथिलता आणली असून, सकाळी ९ ते ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत काही अंशी शिथिलता आणली असून, सकाळी ९ ते ४ दरम्यान दुकाने, संकुले, प्रतिष्ठाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नव्या आदेशात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंदच राहतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांची चिंता सतावू लागली आहे. विशेषत: पालकांना मुलांच्या करिअरबाबत प्रश्नचिन्ह होत आहे.

कोरोनाग्रस्त आणि रुग्णांची मृत्युसंख्या वेगाने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने २२ फेब्रुवारीच्या रात्री ८ पासून १ मार्च रोजी ६ पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा आठवडाभर संचारबंदी घाेषित केली होती. मात्र, नागरिक, व्यापारी, दुकानदार, उद्योजकांनी संचारबंदीला विरोध दर्शविला. काही लोकप्रतिनिधींनीसुद्धा एकतर्फी संचारबंदीचा आदेश असल्याचे मत व्यक्त केले होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संचारबंदी शिथिलता आणली आणि ६ मार्चपासून सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित केले. मात्र, या नव्या आदेशात शाळा, महाविद्यालये बंदच राहतील, हे नमूद आहे. परिणामी मार्च २०२० पासून शाळा, महाविद्यालयांना असलेले कुलूप केव्हा उघडणार, असा सवाल आहे. येत्या २३ एप्रिलपासून बारावी, तर २९ एप्रिलपासून दहावीची लेखी परीक्षा होऊ घातली आहे. कोरोना संसर्गातही दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर ऑफलाईन होणार असल्याने पालकांसह विद्यार्थी चिंतातुर झाले आहेत. हल्ली खासगी शिकवणी बंद असून, ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासक्रम अपूर्णच आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांच्या सामोरे कसे जावे, हा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमाेर उपस्थित झाला आहे.

-------------

मार्चअखेपर्यंत शाळा, महाविद्यालये सुरू होणार नाहीत. कोरोना संसर्गाची स्थिती बघून एप्रिलमध्ये शाळा, महाविद्यालये सुरू करण्याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. तूर्त शाळा, महाविद्यालये बंद राहतील आणि विद्यार्थ्यांना शाळांमध्ये अध्ययन करता येणार नाही. ऑनलाईन अध्ययनाची परवानगी आहे.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.

------------------

दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना नियमांचे पालन करूनच

शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जारी केला. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यामुळे कोरोना नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. शारीरिक अंतर, आरोग्याची सुरक्षितता, मास्कचा वापर, परीक्षा केंद्रांची सॅनिटाईझ फवारणी, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी व्यवस्था, थर्मल गनद्वारे तापमान तपासणी आदी बाबींना प्राधान्य द्यावे लागणार आहे.

-------------------

परीक्षा केंद्रांची लवकरच निश्चिती

दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून होत आहेत. त्याअनुषंगाने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षांसाठी केंद्रे निश्चित करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांत परीक्षा केंद्रांची जिल्हा, तालुकानिहाय संख्या, विद्यार्थी आदींची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर परीक्षार्थींना हॉल तिकीट उपलब्ध होईल, अशी माहिती विभागीय बोर्डाच्या सहसचिव जयश्री राऊत यांनी सांगितले.

-----------------