शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
3
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
4
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
5
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
6
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
7
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
8
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
9
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
10
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
11
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
12
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
13
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
15
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
16
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
17
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
18
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
19
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
20
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत शाळा, महाविद्यालयांना टाळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत काही अंशी शिथिलता आणली असून, सकाळी ९ ते ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत काही अंशी शिथिलता आणली असून, सकाळी ९ ते ४ दरम्यान दुकाने, संकुले, प्रतिष्ठाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नव्या आदेशात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंदच राहतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांची चिंता सतावू लागली आहे. विशेषत: पालकांना मुलांच्या करिअरबाबत प्रश्नचिन्ह होत आहे.

कोरोनाग्रस्त आणि रुग्णांची मृत्युसंख्या वेगाने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने २२ फेब्रुवारीच्या रात्री ८ पासून १ मार्च रोजी ६ पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा आठवडाभर संचारबंदी घाेषित केली होती. मात्र, नागरिक, व्यापारी, दुकानदार, उद्योजकांनी संचारबंदीला विरोध दर्शविला. काही लोकप्रतिनिधींनीसुद्धा एकतर्फी संचारबंदीचा आदेश असल्याचे मत व्यक्त केले होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संचारबंदी शिथिलता आणली आणि ६ मार्चपासून सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित केले. मात्र, या नव्या आदेशात शाळा, महाविद्यालये बंदच राहतील, हे नमूद आहे. परिणामी मार्च २०२० पासून शाळा, महाविद्यालयांना असलेले कुलूप केव्हा उघडणार, असा सवाल आहे. येत्या २३ एप्रिलपासून बारावी, तर २९ एप्रिलपासून दहावीची लेखी परीक्षा होऊ घातली आहे. कोरोना संसर्गातही दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर ऑफलाईन होणार असल्याने पालकांसह विद्यार्थी चिंतातुर झाले आहेत. हल्ली खासगी शिकवणी बंद असून, ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासक्रम अपूर्णच आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांच्या सामोरे कसे जावे, हा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमाेर उपस्थित झाला आहे.

-------------

मार्चअखेपर्यंत शाळा, महाविद्यालये सुरू होणार नाहीत. कोरोना संसर्गाची स्थिती बघून एप्रिलमध्ये शाळा, महाविद्यालये सुरू करण्याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. तूर्त शाळा, महाविद्यालये बंद राहतील आणि विद्यार्थ्यांना शाळांमध्ये अध्ययन करता येणार नाही. ऑनलाईन अध्ययनाची परवानगी आहे.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.

------------------

दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना नियमांचे पालन करूनच

शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जारी केला. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यामुळे कोरोना नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. शारीरिक अंतर, आरोग्याची सुरक्षितता, मास्कचा वापर, परीक्षा केंद्रांची सॅनिटाईझ फवारणी, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी व्यवस्था, थर्मल गनद्वारे तापमान तपासणी आदी बाबींना प्राधान्य द्यावे लागणार आहे.

-------------------

परीक्षा केंद्रांची लवकरच निश्चिती

दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून होत आहेत. त्याअनुषंगाने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षांसाठी केंद्रे निश्चित करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांत परीक्षा केंद्रांची जिल्हा, तालुकानिहाय संख्या, विद्यार्थी आदींची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर परीक्षार्थींना हॉल तिकीट उपलब्ध होईल, अशी माहिती विभागीय बोर्डाच्या सहसचिव जयश्री राऊत यांनी सांगितले.

-----------------