शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत शाळा, महाविद्यालयांना टाळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत काही अंशी शिथिलता आणली असून, सकाळी ९ ते ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत काही अंशी शिथिलता आणली असून, सकाळी ९ ते ४ दरम्यान दुकाने, संकुले, प्रतिष्ठाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नव्या आदेशात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंदच राहतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांची चिंता सतावू लागली आहे. विशेषत: पालकांना मुलांच्या करिअरबाबत प्रश्नचिन्ह होत आहे.

कोरोनाग्रस्त आणि रुग्णांची मृत्युसंख्या वेगाने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने २२ फेब्रुवारीच्या रात्री ८ पासून १ मार्च रोजी ६ पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा आठवडाभर संचारबंदी घाेषित केली होती. मात्र, नागरिक, व्यापारी, दुकानदार, उद्योजकांनी संचारबंदीला विरोध दर्शविला. काही लोकप्रतिनिधींनीसुद्धा एकतर्फी संचारबंदीचा आदेश असल्याचे मत व्यक्त केले होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संचारबंदी शिथिलता आणली आणि ६ मार्चपासून सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित केले. मात्र, या नव्या आदेशात शाळा, महाविद्यालये बंदच राहतील, हे नमूद आहे. परिणामी मार्च २०२० पासून शाळा, महाविद्यालयांना असलेले कुलूप केव्हा उघडणार, असा सवाल आहे. येत्या २३ एप्रिलपासून बारावी, तर २९ एप्रिलपासून दहावीची लेखी परीक्षा होऊ घातली आहे. कोरोना संसर्गातही दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर ऑफलाईन होणार असल्याने पालकांसह विद्यार्थी चिंतातुर झाले आहेत. हल्ली खासगी शिकवणी बंद असून, ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासक्रम अपूर्णच आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांच्या सामोरे कसे जावे, हा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमाेर उपस्थित झाला आहे.

-------------

मार्चअखेपर्यंत शाळा, महाविद्यालये सुरू होणार नाहीत. कोरोना संसर्गाची स्थिती बघून एप्रिलमध्ये शाळा, महाविद्यालये सुरू करण्याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. तूर्त शाळा, महाविद्यालये बंद राहतील आणि विद्यार्थ्यांना शाळांमध्ये अध्ययन करता येणार नाही. ऑनलाईन अध्ययनाची परवानगी आहे.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.

------------------

दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना नियमांचे पालन करूनच

शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जारी केला. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यामुळे कोरोना नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. शारीरिक अंतर, आरोग्याची सुरक्षितता, मास्कचा वापर, परीक्षा केंद्रांची सॅनिटाईझ फवारणी, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी व्यवस्था, थर्मल गनद्वारे तापमान तपासणी आदी बाबींना प्राधान्य द्यावे लागणार आहे.

-------------------

परीक्षा केंद्रांची लवकरच निश्चिती

दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून होत आहेत. त्याअनुषंगाने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षांसाठी केंद्रे निश्चित करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांत परीक्षा केंद्रांची जिल्हा, तालुकानिहाय संख्या, विद्यार्थी आदींची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर परीक्षार्थींना हॉल तिकीट उपलब्ध होईल, अशी माहिती विभागीय बोर्डाच्या सहसचिव जयश्री राऊत यांनी सांगितले.

-----------------