शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
4
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
5
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
7
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
8
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
9
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
10
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
11
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
12
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
13
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
14
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
15
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
16
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
17
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
18
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
19
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
20
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस; तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील मृगबहर गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 10:25 IST

Amravati news सलग तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील ३८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक ३१८० हेक्टर क्षेत्रावरील संत्र्याच्या मृग बहराला फटका बसला.

ठळक मुद्देगहू, चणा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क  

अमरावती : सलग तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील ३८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक ३१८० हेक्टर क्षेत्रावरील संत्र्याच्या मृग बहराला फटका बसला. पाठोपाठ ५३० हेक्टर क्षेत्रातील गहू पिकाचे नुकसान झाले. २२ हेक्टरवरील भाजीपाला मातीमोल झाला. १८ ते २० मार्च दरम्यान कोसळलेल्या या अवकाळी पावसाने तालुक्यातील ४३ गावांना दणका दिला.

             मोर्शी तालुक्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे अतोनात हानी झाली होती. त्यामध्ये हजारो हेक्टरवरील संत्रासह खरीप पिके नष्ट झाल्यानंतरही मोठ्या उमेदीने शेतकरी सावरले होते. मधल्या काळात कीड-रोगांमुळे पुन्हा हजारो हेक्टरवरील पिके नष्ट झाली. मात्र, शेतकरी या संकटांमधून सावरत रबीकडे वळला होता. मात्र, आता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. रबी हंगामातील संत्रा, गहू व हरभरा ही पिके काढणीच्या अवस्थेत असताना जोरदार वादळासह गारपीट व पाऊस झाला. महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

             हवामान बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वातावरण अचानक ढगाळ होऊन जोरदार हवेसह आलेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे फळबागांनाही फटका बसला आहे. तालुक्यात चार दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आता पुन्हा ४ दिवस हवामान खात्याने गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा दिलेला असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तीन दिवसांपासून रोज पडलेल्या अवकाळी पावसामुळे रबीचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

सर्वाधिक नुकसान मृग बहाराचेच

जिल्ह्याच्या १४ पैकी १० तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यात सर्वाधिक नुकसान संत्रा मृग बहराचे झाल्याचा अहवाल आहे. १० तालुक्यातील एकूण ११ हजार ६८८ हेक्टर क्षेत्रावरील मृग बहर गळाला. यात सर्वाधिक ५१२७ हेक्टर क्षेत्र चांदूर बाजार तालुक्यातील आहे. पाठोपाठ मोर्शी तालुक्यातील ३१८० हेक्टर, अचलपूर तालुक्यातील २९६९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या गारपीट व वादळी पावसाने मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला रबी पिकांचा घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. २२ व २३ मार्च रोजीदेखील मोर्शी तालुक्यातील अनेक गावांत ढगाळ वातावरण होते. तालुक्यातील १०४ हेक्टरवरील चण्याचेदेखील वादळी अवकाळी पावसाने नुकसान केले.

 

पान २ चे लिड

टॅग्स :agricultureशेती