शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस; तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील मृगबहर गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 10:25 IST

Amravati news सलग तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील ३८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक ३१८० हेक्टर क्षेत्रावरील संत्र्याच्या मृग बहराला फटका बसला.

ठळक मुद्देगहू, चणा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क  

अमरावती : सलग तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील ३८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक ३१८० हेक्टर क्षेत्रावरील संत्र्याच्या मृग बहराला फटका बसला. पाठोपाठ ५३० हेक्टर क्षेत्रातील गहू पिकाचे नुकसान झाले. २२ हेक्टरवरील भाजीपाला मातीमोल झाला. १८ ते २० मार्च दरम्यान कोसळलेल्या या अवकाळी पावसाने तालुक्यातील ४३ गावांना दणका दिला.

             मोर्शी तालुक्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे अतोनात हानी झाली होती. त्यामध्ये हजारो हेक्टरवरील संत्रासह खरीप पिके नष्ट झाल्यानंतरही मोठ्या उमेदीने शेतकरी सावरले होते. मधल्या काळात कीड-रोगांमुळे पुन्हा हजारो हेक्टरवरील पिके नष्ट झाली. मात्र, शेतकरी या संकटांमधून सावरत रबीकडे वळला होता. मात्र, आता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. रबी हंगामातील संत्रा, गहू व हरभरा ही पिके काढणीच्या अवस्थेत असताना जोरदार वादळासह गारपीट व पाऊस झाला. महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

             हवामान बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वातावरण अचानक ढगाळ होऊन जोरदार हवेसह आलेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे फळबागांनाही फटका बसला आहे. तालुक्यात चार दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आता पुन्हा ४ दिवस हवामान खात्याने गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा दिलेला असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तीन दिवसांपासून रोज पडलेल्या अवकाळी पावसामुळे रबीचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

सर्वाधिक नुकसान मृग बहाराचेच

जिल्ह्याच्या १४ पैकी १० तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यात सर्वाधिक नुकसान संत्रा मृग बहराचे झाल्याचा अहवाल आहे. १० तालुक्यातील एकूण ११ हजार ६८८ हेक्टर क्षेत्रावरील मृग बहर गळाला. यात सर्वाधिक ५१२७ हेक्टर क्षेत्र चांदूर बाजार तालुक्यातील आहे. पाठोपाठ मोर्शी तालुक्यातील ३१८० हेक्टर, अचलपूर तालुक्यातील २९६९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या गारपीट व वादळी पावसाने मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला रबी पिकांचा घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. २२ व २३ मार्च रोजीदेखील मोर्शी तालुक्यातील अनेक गावांत ढगाळ वातावरण होते. तालुक्यातील १०४ हेक्टरवरील चण्याचेदेखील वादळी अवकाळी पावसाने नुकसान केले.

 

पान २ चे लिड

टॅग्स :agricultureशेती