शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

बीटीमध्ये विनापरवानगी जीन, चौकशीसाठी ‘एसआयटी’ गठित, एक महिन्याच्या आता अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 16:45 IST

बीटी कपासीच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असलेले (ट्रॉस्जेस्टिक हरबिसाइड ग्लॉयकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैध बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब निदर्शनात आली असून, चौकशीसाठी शासनाने बुधवारी उशिरा दोन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले आहे.

अमरावती : बीटी कपासीच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असलेले (ट्रॉस्जेस्टिक हरबिसाइड ग्लॉयकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैध बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब निदर्शनात आली असून, चौकशीसाठी शासनाने बुधवारी उशिरा दोन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले आहे. समिती तपास व चौकशीअंती एक महिन्याच्या आत अहवाल शासनाला सादर करणार आहे.राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे हे विशेष तपास पथकाचे अध्यक्ष, तर अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे समितीचे सदस्य सचिव आहेत. बीटी बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील जनुकांचा वापर करून अनेक कंपन्यांद्वारा बियाण्यांचे उत्पादन व विक्री होत असल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या तसेच नागपूरच्या सीआयसीआर  या केंद्राच्या संस्थेकडून प्राप्त अहवालानुसार, जादू, एटीएम, बलभद्र, अर्जुन व कृष्णा गोल्ड या बियाण्यांमध्ये हे जनुक आढळून आले. यामुळे पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या नियमांचे उल्लंघन झालेले आहे. अशाच प्रकारच्या बियाण्यांचे उत्पादन अनेक राज्यात अनधिकृतपणे होत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. यासंदर्भात २५ आॅक्टोबरला नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी येथे ‘एफआयआर’देखील दाखल झालेला आहे. अशाप्रकारे बियाणे उत्पादन करणारी टोळीच अनेक राज्यात कार्यरत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी १३ आॅक्टोबर २०१७ ला केली होती. त्याअनुषंगाने राज्य शासनानेदेखील स्वतंत्र तपासासाठी आता विशेष तपास समितीचे गठन करून एक महिन्याच्या आत अहवाल मागविला आहे.

अशी आहे समितीची कार्यकक्षामोन्सँटो, महिको व मोन्सँटो होल्डींग्ज या बियाणे कंपन्याव काही अनधिकृत कंपन्या विनापरवाना जनुक वापरून महाराष्ट्रात अनधिकृतपने उत्पादन, साठवणूूक व विक्री यामधील सहभाग व भूमिकेची चौकशी करणे, याप्रकरणी दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाला शिफारस करणे, दाखल गुन्हासंदर्भात कागदपत्राची चाचनी करून अहवाल सादर करणे, बियाण्यांच्या अवैध विक्रीसाठी कारनीभूत बाबी निश्चित करून प्रतिबंधात्मक शिफारस देणे व भविष्यात ाश्या घटनांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी शिफारसकरून शासनाला एक महिण्याच्या आत अहवाल देणे आदी समितीची कार्यकक्षा आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती