शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

उन्नत भारत अभियानातून ग्रामविकास - डॉ.विजय भटकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 17:32 IST

माझा जन्म ग्रामीण भागातच झाला असून, शेतकरी प्रश्नांची मला जाण आहे. पाऊस कुठे पडेल, किती पडेल, यासाठी सुपर संगणक उपयुक्त ठरणारा आहे. उद्योगांमध्ये अ‍ॅटोमेशन आल्यामुळे रोजगार कमी झाले आहे.

अमरावती : भारत हा कृषिप्रधान देश असून, देशातील ७० टक्के जनता आजही ग्रामीण भागात राहते. शहरांचा विकास होत आहे. मात्र, त्या तुलनेत ग्रामीण भाग मागे आहे. परंतु, आता अशा स्थितीत उन्नत भारत अभियानामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामविकास शक्य असल्याचे प्रतिपादन महापरम संगणकाचे जनक उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हर्च्युअल सी-फोर कार्यक्रमात उन्नत भारत अभियानांतर्गत मुलाखतीदरम्यान ते बोलत आहे. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू मुरलीधर चांदेकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर, आय.आय.एल.चे संचालक डी.टी. इंगोले, उन्नत भारत वित्तीय साक्षरतेच्या प्रवर्तक अर्चना बारब्दे उपस्थित होते.माझा जन्म ग्रामीण भागातच झाला असून, शेतकरी प्रश्नांची मला जाण आहे. पाऊस कुठे पडेल, किती पडेल, यासाठी सुपर संगणक उपयुक्त ठरणारा आहे. उद्योगांमध्ये अ‍ॅटोमेशन आल्यामुळे रोजगार कमी झाले आहे. परिणामी ग्रामीण भागात रोजगारात वाढ करणे, शेती व्यवसाय जोडधंद्यांना बळकटी देणे काळाची गरज आहे. त्याकरिता विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. पाऊस पडावा म्हणून क्लॉऊड सेटींग टेक्नॉलॉजीचा वापर महत्त्वाचा राहील. ग्रामीण भागातील समस्यांवर संशोधन व्हावे, याकरिता उन्नत भारत अभियानांतर्गत शंभरावर विद्यार्थी पीएच.डी. करीत आहे. स्मार्ट फोन आता ग्रामीण भागात पोहोचला असून ते सर्व सुपर कम्प्युटरशी एकप्रकारे जुळलेत. ती एक क्रांती आहे. विद्यापीठात स्थापित इन्क्युबेशन सेंटरचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयोग घेता येईल. उन्नत भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात रोजगारसुद्धा उपलब्ध होईल, त्यातून संपूर्ण ग्रामविकासाचे लक्ष साधता येईल, असे डॉ.भटकर यांनी स्पष्ट केले.यावेळी संगणकशास्त्र विभागप्रमुख विलास ठाकरे, व्य.प. सदस्य प्रसाद वाडेगावकर, एल.एल.ई.चे संचालक श्रीकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर व विद्यार्थ्यांनी उन्नत भारत अभियानासंदर्भात प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. संचालन व आभार व्हर्च्युअल सी-फोर सेंटरच्या समन्वयक मोना चिमोटे यांनी केले. 

उन्नत भारत अभियानात अमरावती विद्यापीठ पहिलेअमरावती विद्यापीठाने सर्वप्रथम उन्नत भारत अभियानाला सुरुवात केल्याचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर मुलाखतप्रसंगी म्हणाले. शिक्षण आणि समाज यांचा जवळचा संबंध आहे. शिक्षणाचा फायदा समाजाला झाला पाहिजे, ते समाजविकासाचे साधन आहे. या अभियानांतर्गत विद्यापीठाची विद्यार्थी शक्ती कार्य करेल. सगळ्या विद्यापीठांना एकत्रित आणून नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास या अंतर्गत होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती