शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

उन्नत भारत अभियानातून ग्रामविकास - डॉ.विजय भटकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 17:32 IST

माझा जन्म ग्रामीण भागातच झाला असून, शेतकरी प्रश्नांची मला जाण आहे. पाऊस कुठे पडेल, किती पडेल, यासाठी सुपर संगणक उपयुक्त ठरणारा आहे. उद्योगांमध्ये अ‍ॅटोमेशन आल्यामुळे रोजगार कमी झाले आहे.

अमरावती : भारत हा कृषिप्रधान देश असून, देशातील ७० टक्के जनता आजही ग्रामीण भागात राहते. शहरांचा विकास होत आहे. मात्र, त्या तुलनेत ग्रामीण भाग मागे आहे. परंतु, आता अशा स्थितीत उन्नत भारत अभियानामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामविकास शक्य असल्याचे प्रतिपादन महापरम संगणकाचे जनक उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हर्च्युअल सी-फोर कार्यक्रमात उन्नत भारत अभियानांतर्गत मुलाखतीदरम्यान ते बोलत आहे. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू मुरलीधर चांदेकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर, आय.आय.एल.चे संचालक डी.टी. इंगोले, उन्नत भारत वित्तीय साक्षरतेच्या प्रवर्तक अर्चना बारब्दे उपस्थित होते.माझा जन्म ग्रामीण भागातच झाला असून, शेतकरी प्रश्नांची मला जाण आहे. पाऊस कुठे पडेल, किती पडेल, यासाठी सुपर संगणक उपयुक्त ठरणारा आहे. उद्योगांमध्ये अ‍ॅटोमेशन आल्यामुळे रोजगार कमी झाले आहे. परिणामी ग्रामीण भागात रोजगारात वाढ करणे, शेती व्यवसाय जोडधंद्यांना बळकटी देणे काळाची गरज आहे. त्याकरिता विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. पाऊस पडावा म्हणून क्लॉऊड सेटींग टेक्नॉलॉजीचा वापर महत्त्वाचा राहील. ग्रामीण भागातील समस्यांवर संशोधन व्हावे, याकरिता उन्नत भारत अभियानांतर्गत शंभरावर विद्यार्थी पीएच.डी. करीत आहे. स्मार्ट फोन आता ग्रामीण भागात पोहोचला असून ते सर्व सुपर कम्प्युटरशी एकप्रकारे जुळलेत. ती एक क्रांती आहे. विद्यापीठात स्थापित इन्क्युबेशन सेंटरचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयोग घेता येईल. उन्नत भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात रोजगारसुद्धा उपलब्ध होईल, त्यातून संपूर्ण ग्रामविकासाचे लक्ष साधता येईल, असे डॉ.भटकर यांनी स्पष्ट केले.यावेळी संगणकशास्त्र विभागप्रमुख विलास ठाकरे, व्य.प. सदस्य प्रसाद वाडेगावकर, एल.एल.ई.चे संचालक श्रीकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर व विद्यार्थ्यांनी उन्नत भारत अभियानासंदर्भात प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. संचालन व आभार व्हर्च्युअल सी-फोर सेंटरच्या समन्वयक मोना चिमोटे यांनी केले. 

उन्नत भारत अभियानात अमरावती विद्यापीठ पहिलेअमरावती विद्यापीठाने सर्वप्रथम उन्नत भारत अभियानाला सुरुवात केल्याचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर मुलाखतप्रसंगी म्हणाले. शिक्षण आणि समाज यांचा जवळचा संबंध आहे. शिक्षणाचा फायदा समाजाला झाला पाहिजे, ते समाजविकासाचे साधन आहे. या अभियानांतर्गत विद्यापीठाची विद्यार्थी शक्ती कार्य करेल. सगळ्या विद्यापीठांना एकत्रित आणून नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास या अंतर्गत होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती