शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भाषा परीक्षा उत्तीर्ण नसताना वेतनवाढ, पदोन्नती अधिकारी-कर्मचा-यांना नियमबाह्य लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 19:01 IST

राज्यात प्रशासकीय सेवेत समाविष्ट झाल्यानंतर अधिकारी, कर्मचा-यांनी एका वर्षाच्या आत मराठी, हिंदी विषयाची भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असते. मात्र, बहुतांश विभागांमध्ये भाषा परीक्षा न देता अनेक अधिकारी-कर्मचा-यांना वेतनवाढ आणि पदोन्नती देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अमरावती : राज्यात प्रशासकीय सेवेत समाविष्ट झाल्यानंतर अधिकारी, कर्मचा-यांनी एका वर्षाच्या आत मराठी, हिंदी विषयाची भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असते. मात्र, बहुतांश विभागांमध्ये भाषा परीक्षा न देता अनेक अधिकारी-कर्मचा-यांना वेतनवाढ आणि पदोन्नती देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे नियमबाह्य लाभ घेणाºयांवर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.सामान्य प्रशासन विभागाने ३० डिसेंबर १९८७ रोजी शासन आदेश निर्गमित करताना मुद्दा क्रमांक ५ नियम ५ (१) च्या टिपणी २ मध्ये अधिकारी, कर्मचाºयांना भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक केले आहे. भाषा परीक्षा उत्तीर्ण होत नाही अथवा नियम ४ नुसार सूट प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना वेतनवाढ किंवा पदोन्नती देऊ नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु, गत ३० वर्षांत राज्याच्या २७ विभागांमध्ये भाषा परीक्षा नियमावली गुंडाळली आहे. भाषा परीक्षा उत्तीर्ण न करताच अधिकारी-कर्मचाºयांना वेतनवाढ, पदोन्नती देण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे भाषा परीक्षांची नियमावली लागू होत नसताना विभागप्रमुख करतात काय, हा सवाल उपस्थित होत आहे. भाषा परीक्षा उत्तीर्ण न करता अधिकारी, कर्मचाºयांना देण्यात आलेली वेतनवाढ, पदोन्नती ही नियमबाह्य आणि चुकीची असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वनविभागाने भाषा परीक्षा नियमावली गुंडाळून अधिकारी-कर्मचाºयांना लाभाची मलाई वाटप केल्याचे वास्तव आहे.

अशी होते भाषा परीक्षापुणे येथील भाषा परीक्षा संचालनालयाकडून राज्यातील सर्वच आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचाºयांची भाषा परीक्षा घेतली जाते. यात मराठी, हिंदी भाषेचा समावेश राहत असून, अधिकारी, कर्मचाºयांना बोलता, वाचता आणि लिहिता यावे, या निकषावर ही परीक्षा घेतली जात असल्याची माहिती आहे.

सेवापुस्तिकेत नोंद नसताना लाभ कसा?अधिकारी-कर्मचा-यांनी भाषा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तशी नोंद सामान्य प्रशासन विभागाने संबंधितांच्या सेवापुस्तिकेत घेणे अनिवार्य आहे. मात्र, बहुतांश अधिकारी-कर्मचाºयांच्या सेवापुस्तिकेत भाषा परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद नसताना वेतनवाढ, कालबाह्य आणि नियमित पदोन्नतीचा लाभ देण्याची किमया करण्यात आली आहे. यात ब-यापैकी चिरीमिरी झाल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती