शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

भाषा परीक्षा उत्तीर्ण नसताना वेतनवाढ, पदोन्नती अधिकारी-कर्मचा-यांना नियमबाह्य लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 19:01 IST

राज्यात प्रशासकीय सेवेत समाविष्ट झाल्यानंतर अधिकारी, कर्मचा-यांनी एका वर्षाच्या आत मराठी, हिंदी विषयाची भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असते. मात्र, बहुतांश विभागांमध्ये भाषा परीक्षा न देता अनेक अधिकारी-कर्मचा-यांना वेतनवाढ आणि पदोन्नती देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अमरावती : राज्यात प्रशासकीय सेवेत समाविष्ट झाल्यानंतर अधिकारी, कर्मचा-यांनी एका वर्षाच्या आत मराठी, हिंदी विषयाची भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असते. मात्र, बहुतांश विभागांमध्ये भाषा परीक्षा न देता अनेक अधिकारी-कर्मचा-यांना वेतनवाढ आणि पदोन्नती देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे नियमबाह्य लाभ घेणाºयांवर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.सामान्य प्रशासन विभागाने ३० डिसेंबर १९८७ रोजी शासन आदेश निर्गमित करताना मुद्दा क्रमांक ५ नियम ५ (१) च्या टिपणी २ मध्ये अधिकारी, कर्मचाºयांना भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक केले आहे. भाषा परीक्षा उत्तीर्ण होत नाही अथवा नियम ४ नुसार सूट प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना वेतनवाढ किंवा पदोन्नती देऊ नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु, गत ३० वर्षांत राज्याच्या २७ विभागांमध्ये भाषा परीक्षा नियमावली गुंडाळली आहे. भाषा परीक्षा उत्तीर्ण न करताच अधिकारी-कर्मचाºयांना वेतनवाढ, पदोन्नती देण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे भाषा परीक्षांची नियमावली लागू होत नसताना विभागप्रमुख करतात काय, हा सवाल उपस्थित होत आहे. भाषा परीक्षा उत्तीर्ण न करता अधिकारी, कर्मचाºयांना देण्यात आलेली वेतनवाढ, पदोन्नती ही नियमबाह्य आणि चुकीची असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वनविभागाने भाषा परीक्षा नियमावली गुंडाळून अधिकारी-कर्मचाºयांना लाभाची मलाई वाटप केल्याचे वास्तव आहे.

अशी होते भाषा परीक्षापुणे येथील भाषा परीक्षा संचालनालयाकडून राज्यातील सर्वच आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचाºयांची भाषा परीक्षा घेतली जाते. यात मराठी, हिंदी भाषेचा समावेश राहत असून, अधिकारी, कर्मचाºयांना बोलता, वाचता आणि लिहिता यावे, या निकषावर ही परीक्षा घेतली जात असल्याची माहिती आहे.

सेवापुस्तिकेत नोंद नसताना लाभ कसा?अधिकारी-कर्मचा-यांनी भाषा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तशी नोंद सामान्य प्रशासन विभागाने संबंधितांच्या सेवापुस्तिकेत घेणे अनिवार्य आहे. मात्र, बहुतांश अधिकारी-कर्मचाºयांच्या सेवापुस्तिकेत भाषा परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद नसताना वेतनवाढ, कालबाह्य आणि नियमित पदोन्नतीचा लाभ देण्याची किमया करण्यात आली आहे. यात ब-यापैकी चिरीमिरी झाल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती