शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

भाषा परीक्षा उत्तीर्ण नसताना वेतनवाढ, पदोन्नती अधिकारी-कर्मचा-यांना नियमबाह्य लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 19:01 IST

राज्यात प्रशासकीय सेवेत समाविष्ट झाल्यानंतर अधिकारी, कर्मचा-यांनी एका वर्षाच्या आत मराठी, हिंदी विषयाची भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असते. मात्र, बहुतांश विभागांमध्ये भाषा परीक्षा न देता अनेक अधिकारी-कर्मचा-यांना वेतनवाढ आणि पदोन्नती देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अमरावती : राज्यात प्रशासकीय सेवेत समाविष्ट झाल्यानंतर अधिकारी, कर्मचा-यांनी एका वर्षाच्या आत मराठी, हिंदी विषयाची भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असते. मात्र, बहुतांश विभागांमध्ये भाषा परीक्षा न देता अनेक अधिकारी-कर्मचा-यांना वेतनवाढ आणि पदोन्नती देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे नियमबाह्य लाभ घेणाºयांवर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.सामान्य प्रशासन विभागाने ३० डिसेंबर १९८७ रोजी शासन आदेश निर्गमित करताना मुद्दा क्रमांक ५ नियम ५ (१) च्या टिपणी २ मध्ये अधिकारी, कर्मचाºयांना भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक केले आहे. भाषा परीक्षा उत्तीर्ण होत नाही अथवा नियम ४ नुसार सूट प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना वेतनवाढ किंवा पदोन्नती देऊ नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु, गत ३० वर्षांत राज्याच्या २७ विभागांमध्ये भाषा परीक्षा नियमावली गुंडाळली आहे. भाषा परीक्षा उत्तीर्ण न करताच अधिकारी-कर्मचाºयांना वेतनवाढ, पदोन्नती देण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे भाषा परीक्षांची नियमावली लागू होत नसताना विभागप्रमुख करतात काय, हा सवाल उपस्थित होत आहे. भाषा परीक्षा उत्तीर्ण न करता अधिकारी, कर्मचाºयांना देण्यात आलेली वेतनवाढ, पदोन्नती ही नियमबाह्य आणि चुकीची असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वनविभागाने भाषा परीक्षा नियमावली गुंडाळून अधिकारी-कर्मचाºयांना लाभाची मलाई वाटप केल्याचे वास्तव आहे.

अशी होते भाषा परीक्षापुणे येथील भाषा परीक्षा संचालनालयाकडून राज्यातील सर्वच आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचाºयांची भाषा परीक्षा घेतली जाते. यात मराठी, हिंदी भाषेचा समावेश राहत असून, अधिकारी, कर्मचाºयांना बोलता, वाचता आणि लिहिता यावे, या निकषावर ही परीक्षा घेतली जात असल्याची माहिती आहे.

सेवापुस्तिकेत नोंद नसताना लाभ कसा?अधिकारी-कर्मचा-यांनी भाषा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तशी नोंद सामान्य प्रशासन विभागाने संबंधितांच्या सेवापुस्तिकेत घेणे अनिवार्य आहे. मात्र, बहुतांश अधिकारी-कर्मचाºयांच्या सेवापुस्तिकेत भाषा परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद नसताना वेतनवाढ, कालबाह्य आणि नियमित पदोन्नतीचा लाभ देण्याची किमया करण्यात आली आहे. यात ब-यापैकी चिरीमिरी झाल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती