शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापन निधी होणार शासनतिजोरीत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा उद्रेक संपूर्ण देशात सुरू आहे. दरदिवसाला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत चालले आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी १४ एप्रिलपर्यंत होता, तो आता ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या काळात राज्यावर आर्थिक संकट हे भीषण रूप घेणार आहे. परिणामी शासनाने आपत्ती व्यवस्थापन निधीत वाढ करण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे.

ठळक मुद्देशासनाकडून माहिती गोळा : प्रवेश शुल्कातून प्रतिविद्यार्थी दहा रुपये जमा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठ स्तरावर जमा होणारा आपत्ती व्यवस्थापन निधी कोरोना कोविड -१९ उपाययोजनांसाठी शासन तिजोरीत जमा करण्याची तयारी राज्य शासनाने चालविली आहे. महाविद्यालय स्तरावर प्रवेशाच्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याकडून १० रुपये आपत्ती व्यवस्थापन निधीकरिता घेतले जातात. त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात ३० लाखांचा निधी गोळा केला आहे.कोरोना विषाणूचा उद्रेक संपूर्ण देशात सुरू आहे. दरदिवसाला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत चालले आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी १४ एप्रिलपर्यंत होता, तो आता ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या काळात राज्यावर आर्थिक संकट हे भीषण रूप घेणार आहे. परिणामी शासनाने आपत्ती व्यवस्थापन निधीत वाढ करण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. यासंदर्भाची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उद्य सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुलगुरूंसोबत संवाद साधताना दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गाविरूद्धच्या लढ्यात सर्वांचेच सहकार्य शासनाला अपेक्षित आहे. त्यानुसार पहिला टप्पा विद्यापीठांमध्ये जमा होणारा आपत्ती व्यवस्थापन निधी जमा करण्यावर शासन भर देत आहे. असे असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा सर्वंकष निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी जिल्हानिहाय केली जात आहे. राज्यभरातील विद्यापीठांना आपत्ती व्यवस्थापन निधी जमा करावा लागणार असल्याचे वास्तव आहे.आपत्ती व्यवस्थापन केंद्रात साहित्य खरेदीअमरावती विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन केंद्र अगोदचर सुरू झाले आहे. या केंद्रात आवश्यक वस्तू, साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. १५ लाखांचे विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांची प्रशिक्षण, शिबिरे घेण्यात आली. विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांत चार लाख विद्यार्थी संख्या आहे.दरवर्षी सुमारे ३० लाख रूपये आपत्ती व्यवस्थापन निधीत गोळा होते. यंदा केंद्र स्थापन करण्यात आले असून, आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले आहे. असे असले तरी कुलगुरू, वित्त व लेखाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करून अखर्चित निधी शासन तिजोरीत गोळा करण्यात येईल.- राजेश बुरंगे, सन्मवयक, राष्ट्रीय सेवा योजना, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठ