शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापन निधी होणार शासनतिजोरीत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा उद्रेक संपूर्ण देशात सुरू आहे. दरदिवसाला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत चालले आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी १४ एप्रिलपर्यंत होता, तो आता ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या काळात राज्यावर आर्थिक संकट हे भीषण रूप घेणार आहे. परिणामी शासनाने आपत्ती व्यवस्थापन निधीत वाढ करण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे.

ठळक मुद्देशासनाकडून माहिती गोळा : प्रवेश शुल्कातून प्रतिविद्यार्थी दहा रुपये जमा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठ स्तरावर जमा होणारा आपत्ती व्यवस्थापन निधी कोरोना कोविड -१९ उपाययोजनांसाठी शासन तिजोरीत जमा करण्याची तयारी राज्य शासनाने चालविली आहे. महाविद्यालय स्तरावर प्रवेशाच्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याकडून १० रुपये आपत्ती व्यवस्थापन निधीकरिता घेतले जातात. त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात ३० लाखांचा निधी गोळा केला आहे.कोरोना विषाणूचा उद्रेक संपूर्ण देशात सुरू आहे. दरदिवसाला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत चालले आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी १४ एप्रिलपर्यंत होता, तो आता ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या काळात राज्यावर आर्थिक संकट हे भीषण रूप घेणार आहे. परिणामी शासनाने आपत्ती व्यवस्थापन निधीत वाढ करण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. यासंदर्भाची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उद्य सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुलगुरूंसोबत संवाद साधताना दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गाविरूद्धच्या लढ्यात सर्वांचेच सहकार्य शासनाला अपेक्षित आहे. त्यानुसार पहिला टप्पा विद्यापीठांमध्ये जमा होणारा आपत्ती व्यवस्थापन निधी जमा करण्यावर शासन भर देत आहे. असे असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा सर्वंकष निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी जिल्हानिहाय केली जात आहे. राज्यभरातील विद्यापीठांना आपत्ती व्यवस्थापन निधी जमा करावा लागणार असल्याचे वास्तव आहे.आपत्ती व्यवस्थापन केंद्रात साहित्य खरेदीअमरावती विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन केंद्र अगोदचर सुरू झाले आहे. या केंद्रात आवश्यक वस्तू, साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. १५ लाखांचे विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांची प्रशिक्षण, शिबिरे घेण्यात आली. विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांत चार लाख विद्यार्थी संख्या आहे.दरवर्षी सुमारे ३० लाख रूपये आपत्ती व्यवस्थापन निधीत गोळा होते. यंदा केंद्र स्थापन करण्यात आले असून, आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले आहे. असे असले तरी कुलगुरू, वित्त व लेखाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करून अखर्चित निधी शासन तिजोरीत गोळा करण्यात येईल.- राजेश बुरंगे, सन्मवयक, राष्ट्रीय सेवा योजना, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठ