शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

समाजनिर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची - पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 17:00 IST

देशात उच्चशिक्षणामध्ये झालेली वाढ कौतुकास्पद आहे. आज आणि उद्याच्या समाजनिर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असून, त्याअनुषंगाने शिक्षणाची पायाभरणी करावी, असे आवाहन शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले.

अमरावती : देशात उच्चशिक्षणामध्ये झालेली वाढ कौतुकास्पद आहे. आज आणि उद्याच्या समाजनिर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असून, त्याअनुषंगाने शिक्षणाची पायाभरणी करावी, असे आवाहन शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षांत समारंभात त्यांनी बीजभाषण केले.दीक्षांत समारंभाच्या व्यासपीठावर कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, प्राचार्य एफ.सी. रघुवंशी, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख, लेखा व वित्त अधिकारी भारत कराड, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक डी.व्ही. जाधव, अधिष्ठाता डी.डब्लू. निचित, एस.आर. देशमुख, एम.पी. काळे, पी.ए. वाडेगावकर आदी उपस्थित होते. डॉ. के. कस्तुरीरंगन पुढे म्हणाले, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने समाजाभिमुख शिक्षणक्रमावर भर द्यावा. उच्चस्तरावरील संशोधन करून योगदान दिल्यास हीच खरी संत गाडगेबाबांना आदरांजली राहील. विद्यापीठाचा दृष्टिकोन हा विद्यार्थिकेंद्रित असावा. प्रशिक्षित व्यावसायिक, आदर्श नागरिक, शैक्षणिक नेतृत्व, वैश्विक उद्योजक आणि आव्हानाचे संधीमध्ये रूपांतर करू शकेल, असे विद्यार्थी घडविले पाहिजे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विशेष व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ला पुढे घेऊन जात आहे. आजचा विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ आहे. त्याला वैश्विक आव्हान खुणावतेय. त्यावर सर्जनशीलता, प्रतिभेने स्वार व्हा, असे त्यांनी आवूर्जन सांगितले. पंतप्रधान  नरेंद्र मोदींनी मानव अंतरिक्ष उड्डाण कार्यक्रम ‘ज्ञानगंगा’ जाहीर केला असून, सन २०२२ मध्ये भारतीय अवकाशात झेपावेल. यातून देशाचा आत्मविश्वास वाढेल आणि बळ मिळेल, असा विश्वास डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले. संचालन हेमंत खडके व अल्का गायकवाड यांनी केले.

गुणवत्तेत मुली सरस३५ व्या दीक्षांत समारंभात सुवर्ण, रौप्यपदकांसह रोख पारितोषिकांमध्ये मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या. त्यांनी १४९ पदके, पारितोषिकांपैकी १२७ पदके, पारितोषिके मुलींनी पटकाविली. बहि:शाल विद्यार्थिनी सोनाली दामोदर खडसे हिने सहा सुवर्ण व एक पारितोषिक पटकाविले.     ४० हजार २९९ विद्यार्थी सन्मानितसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षांत समारंभात ३७८ संशोधकांना आचार्य पदवी, १०५ सुवर्णपदके, २२ रौप्यपदके, २४ रोख पारितोषिके आणि ३९ हजार ७३० विद्यार्थ्यांना पदवी, तर ४० विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Amravatiअमरावती