शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

परतवाडा - अमरावती रस्त्याचे दुर्दैव, चौपदरीकरणाचे काम इतरत्र वळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:12 IST

परतवाडा : एडीबी या खासगी बँकेच्या अर्थसहाय्याने, अमरावती-परतवाडा या प्रमुख राज्य महामार्गाचे होणारे चौपदरीकरणाचे काम, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ...

परतवाडा : एडीबी या खासगी बँकेच्या अर्थसहाय्याने, अमरावती-परतवाडा या प्रमुख राज्य महामार्गाचे होणारे चौपदरीकरणाचे काम, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या क्षेत्रात वळविले.

अमरावती-परतवाडा प्रमुख राज्य महामार्गाचे 54 किलोमीटर लांबीचे काम सन २०१८ मध्ये, एशियन डेवलपमेंट बँकेकडे (एडीबी) देण्यात आले होते. एडीबीने या प्रमुख रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला तत्त्वतः मान्यताही दिली होती. रस्त्याच्या सर्वेक्षणाकरिता १२ सप्टेंबर २०१९ ला भोपाळ येथील आयकॉन इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे दिला. कंपनीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. त्याचा डीपीआरही बनविला. जवळपास साडेसहाशे कोटी त्यावर खर्च अपेक्षित होता. यातच हे रस्त्याचे काम सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात होते. दरम्यान २५ दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात असलेले हे काम त्यांनी काढून आपल्याकडे वळते केले. यात अमरावती जिल्ह्यात एडीबीला अधिक लांबीचे रस्ते दिल्या गेल्याचे कारण पुढे केले गेले.

पालकमंत्र्यांचे आग्रही प्रतिपादन

बांधकाम मंत्र्यांनी घेतलेल्या या सभेला पालकमंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. परतवाडा -अमरावती हा रस्ता महत्त्वाचा असून, दोन राज्यांना जोडणारा आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम एडीबीकडेच राहू द्यावे, असे आग्रही प्रतिपादन यशोमती ठाकूर यांनी सभेत केले. तेव्हा या रस्त्याचे काम आपण हायब्रीड डायझेशनमध्ये प्रस्तावित करा, असे सांगितले गेले. त्यामुळे आता हे काम रेंगाळलेले.

नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न

परतवाडा-अमरावती या ब्रिटिशकालीन मार्गाचे आयुष्य संपुष्टात आले आहे. १८७५ ते १८८० च्या दरम्यान या रस्त्याचे बांधकाम झाले आहे. ब्रिटिशकालीन या मार्गाला १९६७ मध्ये राज्य महामार्गाचा दर्जा मिळाला. २०१५ मध्ये या मार्गाच्या दुपदरीकरणासह दर्जावाढ आणि राष्ट्रीय महामार्ग बाबत प्रस्तावित केल्या गेले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत सर्वेक्षण पूर्ण करून डीपीआरही मंजूर केला गेला. पण पुढे हा प्रस्ताव मागे पडला. सन २०१८ मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे हा रस्ता दिला गेला. ही बँक अर्थसहाय्य द्यायला तयार असतानाच २०२१ मध्ये बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हा रस्ता एडीबी बँकेसह आपल्या क्षेत्रात वळविला.