शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

अमरावती शहरासाठी १,७१८ कोटींची भुयारी गटार योजना प्रस्तावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:01 IST

सुलभा खोडके यांचा पाठपुरावा : सुधारित कृती आराखड्यात समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहरी भुयारी गटार योजनेच्या अनुषंगाने अमृत टप्पा-१ अंतर्गत रखडलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांचा आता केंद्र पुरस्कृत अमृत टप्पा दोनच्या सुधारित कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. याकरिता १ हजार ७१८ कोटी रुपये प्रस्तावित करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच हा प्रस्ताव मंजूर करून आणून अमरावती शहरात भुयारी गटार योजनेच्या कामांना गती देणार असल्याची माहिती आमदार सुलभा खोडके यांनी दिली आहे.

अमरावती शहरात रखडलेल्या भुयारी गटार योजनेकरिता माननीय उच्च न्यायालयात रिपिटिशनल याचिका स्वीकृत झाली आहे. त्यामुळे सदर भुयारी गटार योजनेच्या अनुषंगाने सध्याच्या स्थितीविषयी आमदार सुलभा खोडके यांनी माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र पुरस्कृत अमृत अभियानअंतर्गत टप्पा-१ योजना सन २०१८ मध्ये मंजूर झाली होती. परंतु निधीअभावी ही थंडबस्त्यातच होती. दरम्यान, २०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ६ डिसेंबर २०१९ रोजी अमृत एक अंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेसंदर्भात मजीप्रा कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. यावेळी तत्कालीन उपविभागीय अभियंता यांनी भुयारी गटार योजनेचे २८ टक्के काम पूर्ण झाले व २०.३१ कोटी इतका निधी खर्च झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर २५ एप्रिल २०२२ रोजीही बैठक घेतली. यामध्ये शहराच्या वाढत्या लोकसंख्येचे अनुमान लक्षात घेता तसेच योजनेचे आयुर्मान (कालावधी) संदर्भातसुद्धा नियोजन नसल्याने ही योजना आगामी दृष्टीने परिपूर्ण नसल्याचे बैठकीतून समोर आले होते. त्यामुळे अमृत टप्पा- १ मधील भुयारी गटार योजनेतील उर्वरित कामांना अमृत टप्पा दोनमध्ये समाविष्ट करण्यात यावे तसेच वर्ष २०५४ पर्यंतची शहराची लोकसंख्या गृहीत धरून तसा परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मजिप्राला दिल्या होत्या. त्यानंतर मजीप्रा प्रशासनाच्यावतीने परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. योजनेला गती देण्याच्या अनुषंगाने १० डिसेंबर २०२४ रोजी मजिप्रात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सुलभा खोडके यांच्या सुचनेनुसार अमृत टप्पा २०.३१२ चा सुधारित कृती आराखडा तयार करून यामध्ये १ हजार ७१८ कोटी प्रस्तावित रक्कम आहे. हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केल्याची माहिती सुलभा खोडके यांनी दिली. 

उच्च न्यायालयात रिपिटिशन दाखल करणाऱ्यांना उत्तर शहर भुयारी गटार योजनेसंदर्भात उच्च न्यायालयात रि-पिटिशन दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुलभा खाडके यांनी उत्तर देत प्रतिप्रश्न केला आहे. याचिकाकर्ते हे वर्ष १९९९ ते २००९ पर्यंत ते आमदार व राज्यमंत्री दर्जा असताना तसेच २०१४ मध्ये ते पुन्हा आमदार झाले असताना काहीच पाठपुरावा का केला नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच वर्ष २०१८ मध्ये केंद्र पुरस्कृत अमृत टप्पा एक मंजूर करण्यात आला. यामध्ये महापालिकेला वर्ष २०१९ पूर्वी आपला स्वहिस्सा देणे गरजेचे होते. तेव्हा महापालिकेवर योजनेचा भार न पडता शासनाकडून निधी मिळविण्यासाठी याचिकाकर्त्यांनी प्रयत्न केला नसल्याचे सुलभा खोडके यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती