शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

अविश्वसनीय!

By admin | Updated: June 3, 2016 00:09 IST

गुरुवारी अविश्वसनीयच घडले. दिगंबर डहाके गेले. मुंबईत उपचारादरम्यान झालेल्या त्यांच्या अकाली मृत्यूची बातमी अंबानगरीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धडकली,

गुरुवारी अविश्वसनीयच घडले. दिगंबर डहाके गेले. मुंबईत उपचारादरम्यान झालेल्या त्यांच्या अकाली मृत्यूची बातमी अंबानगरीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धडकली, त्यावेळी ऐकणाऱ्या प्रत्येकाचे काळीजही धडकलेच. गरिबी, संघर्ष आणि कर्तृत्त्वातून साकार झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबर डहाके. वयाची जेमतेम पंचेचाळीशी गाठलेल्या या कार्यकर्त्याच्या लोकप्रियतेची उंची वयाच्या तुलनेत कैकपटीने अधिक होती. महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारीपदी राबलेल्या वडिलांच्या पोटी जन्मलेल्या दिगंबर यांनी त्याच महापालिकेचे उपमहापौरपद भूषविले. माळीपुऱ्यातील आठ बाय वीस क्षेत्रफळाच्या घरात तीन भाऊ आणि बहिणीसह लहानपण घालविलेल्या दिगंबर यांनी गरिबी जवळून अनुभवली होती. खेळण्या-बागडण्याच्या, खेळणी घेऊन मागण्यासाठी आईवडिलांकडे हट्ट धरण्याच्या वयात त्यांनी कुंकू आणि अगरबत्ती निर्मितीच्या कारखान्यात कष्ट उपसले. स्वत:च्या कर्तव्याची जाण या उमद्या तरुणाला त्या वयापासूनच होती. 'जगावे की शिकावे' या कात्रित आयुष्य सापडले. त्यांनी आयुष्याची शाळा निवडली. पुस्तकांच्या शाळेत ते १२ वी पर्यंतच शिकले. आयुष्याच्या शाळेत मात्र ते कायम गुणवत्ता यादीत राहिले. परिस्थिती नाही म्हणून रडत-कुढत आयुष्य जगण्याऐवजी परिस्थितीवर मात करून आयुष्य जिंकण्याच्या पर्यायाची निवड या लढवय्याने केली होती. विचारच माणसाच्या आयुष्याला आकार देतो. 'आयुष्य किती जगलात, यापेक्षा आयुष्य कसे जगलात', हे महत्त्वाचे सूत्र दिगंबरांच्या जगण्याची दिशा ठरवीत होते. किशोरवयात प्रभात मंडळाशी ते जुळले. त्याचकाळी प्रवीण हरमकर यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री झाली. या मंडळातूनच दिगंबर घडले. 'धाडस' हा दिगंबर यांचा 'रक्तगट'च. अन्याय दिसला की धमण्यांमधून वाहणारे रक्त उसळलेच म्हणून समजा. 'अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला साथ देणे' हे महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान हाडाचे शिवसैनिक असलेल्या दिगंबर यांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरले होते. स्वत:ची वैचारिक भूमिका मांडण्याइतपत आणि त्या भूमिकेच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याइतपत वैचारिक अधिष्ठान दिगंबरांनी कमविले होते. तारूण्यात अन्यायाविरुद्ध पेटून उठताना दिगंबर यांची आक्रमक ओळख अमरावतीला झाली. १९९४ साली इंद्रपुरीत उसळलेल्या दंगलीदरम्यान त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या 'अँग्री यंग मॅन'ला समाजमानात आगळी मान्यता मिळाली. पुढे ओघानेच हा तरुण राजकारणात ओढला गेला. विविध प्रभागांतून सलग पाचवेळा हा तरुण नगरसेवकपदी निवडून गेला. कॅम्पसारख्या उच्चविद्याविभूषित आणि उच्चभ्रु लोकांनी दिगंबर यांना दोनवेळा प्रतिनिधीत्त्व बहाल केले. आक्रमकतेसोबतच वैचारिकतेला मिळालेली ती मान्यता ठरली.