शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

अविश्वसनीय!

By admin | Updated: June 3, 2016 00:09 IST

गुरुवारी अविश्वसनीयच घडले. दिगंबर डहाके गेले. मुंबईत उपचारादरम्यान झालेल्या त्यांच्या अकाली मृत्यूची बातमी अंबानगरीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धडकली,

गुरुवारी अविश्वसनीयच घडले. दिगंबर डहाके गेले. मुंबईत उपचारादरम्यान झालेल्या त्यांच्या अकाली मृत्यूची बातमी अंबानगरीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धडकली, त्यावेळी ऐकणाऱ्या प्रत्येकाचे काळीजही धडकलेच. गरिबी, संघर्ष आणि कर्तृत्त्वातून साकार झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबर डहाके. वयाची जेमतेम पंचेचाळीशी गाठलेल्या या कार्यकर्त्याच्या लोकप्रियतेची उंची वयाच्या तुलनेत कैकपटीने अधिक होती. महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारीपदी राबलेल्या वडिलांच्या पोटी जन्मलेल्या दिगंबर यांनी त्याच महापालिकेचे उपमहापौरपद भूषविले. माळीपुऱ्यातील आठ बाय वीस क्षेत्रफळाच्या घरात तीन भाऊ आणि बहिणीसह लहानपण घालविलेल्या दिगंबर यांनी गरिबी जवळून अनुभवली होती. खेळण्या-बागडण्याच्या, खेळणी घेऊन मागण्यासाठी आईवडिलांकडे हट्ट धरण्याच्या वयात त्यांनी कुंकू आणि अगरबत्ती निर्मितीच्या कारखान्यात कष्ट उपसले. स्वत:च्या कर्तव्याची जाण या उमद्या तरुणाला त्या वयापासूनच होती. 'जगावे की शिकावे' या कात्रित आयुष्य सापडले. त्यांनी आयुष्याची शाळा निवडली. पुस्तकांच्या शाळेत ते १२ वी पर्यंतच शिकले. आयुष्याच्या शाळेत मात्र ते कायम गुणवत्ता यादीत राहिले. परिस्थिती नाही म्हणून रडत-कुढत आयुष्य जगण्याऐवजी परिस्थितीवर मात करून आयुष्य जिंकण्याच्या पर्यायाची निवड या लढवय्याने केली होती. विचारच माणसाच्या आयुष्याला आकार देतो. 'आयुष्य किती जगलात, यापेक्षा आयुष्य कसे जगलात', हे महत्त्वाचे सूत्र दिगंबरांच्या जगण्याची दिशा ठरवीत होते. किशोरवयात प्रभात मंडळाशी ते जुळले. त्याचकाळी प्रवीण हरमकर यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री झाली. या मंडळातूनच दिगंबर घडले. 'धाडस' हा दिगंबर यांचा 'रक्तगट'च. अन्याय दिसला की धमण्यांमधून वाहणारे रक्त उसळलेच म्हणून समजा. 'अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला साथ देणे' हे महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान हाडाचे शिवसैनिक असलेल्या दिगंबर यांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरले होते. स्वत:ची वैचारिक भूमिका मांडण्याइतपत आणि त्या भूमिकेच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याइतपत वैचारिक अधिष्ठान दिगंबरांनी कमविले होते. तारूण्यात अन्यायाविरुद्ध पेटून उठताना दिगंबर यांची आक्रमक ओळख अमरावतीला झाली. १९९४ साली इंद्रपुरीत उसळलेल्या दंगलीदरम्यान त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या 'अँग्री यंग मॅन'ला समाजमानात आगळी मान्यता मिळाली. पुढे ओघानेच हा तरुण राजकारणात ओढला गेला. विविध प्रभागांतून सलग पाचवेळा हा तरुण नगरसेवकपदी निवडून गेला. कॅम्पसारख्या उच्चविद्याविभूषित आणि उच्चभ्रु लोकांनी दिगंबर यांना दोनवेळा प्रतिनिधीत्त्व बहाल केले. आक्रमकतेसोबतच वैचारिकतेला मिळालेली ती मान्यता ठरली.