शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

विनापरवानगी शाळांची चौकशी

By admin | Updated: December 20, 2015 00:09 IST

शासनस्तरावर २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची हालचाली सुरू आहेत.

जिल्हा परिषद : स्थायी समितीत सदस्यांची मागणीअमरावती : शासनस्तरावर २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची हालचाली सुरू आहेत. त्या पार्श्वभूमिवर ज्या खासगी शाळांनी एका शाळेची मान्यता घेऊन त्याच मान्यतेवर अन्य ठिकाणी वर्ग तुकड्या सुरू केल्यात, अशा शाळा आणि संस्थाना अभय का, असा प्रश्न शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सुधीर सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. '२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर' या मथळयाखाली 'लोकमत'ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित करताच याची दखल घेण्यात आली. स्थायी समितीत या मुद्यावर सदस्यांनी अधिकाऱ्यांवर प्रशनांची सरबत्ती केली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण व महापालिका क्षेत्रातील २० पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर येणार आहे. त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मोजक्या आणि गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी कुठे जायचे , खासगी शाळांचे अवाढव्य शुल्कही ते भरू शकत नाही. आरटीईनुसार आर्थिक, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवले जाते. जिल्ह्यात अशी विदारक स्थिती असताना जिल्हा व शहरात जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत काही खासगी शिक्षण संस्थांनी एका शाळेची मान्यता घेऊन याच आधारावर दुसऱ्या ठिकाणीही शाखा सुरू केल्या आहेत. यावर शिक्षण विभाग कारवाई करत नाही. त्यामुळे अशा शाळांची चौकशी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली आहे.दरम्यान याचमुद्यावर काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुखांनी सदस्यांच्या मागणीला समर्थन देत शिक्षण विभागाने आतापर्यत अशा किती शाळांना मान्यता दिली, याची यादी स्थायी समितीच्या पुढील बैठकीत ठेवावी. तथा विनापरवानगी सुरू असलेल्या खासगी संस्थांच्या या मुजोरीवर अंकुश घालावा. प्रशासनाने यासंदर्भातील सं्ूर्ण चौकशी अहवाल सभागृहासमोर ठेवावा, अशी त्यांनी सूचना केली. पिठासीन सभापतींनी त्याला होकार दर्शविला. (प्रतिनिधी)